शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळेच अपघात

By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST

नीलम गोऱ्हे ; पंढरपूर येथे पत्रकार परिषद

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख दिंड्यांकडेच शासनाचे लक्ष असते; अन्य छोट्या दिंड्यांना शासन सुरक्षा देत नसल्याने भाविकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आल्या असता पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़आढीव (ता. पंढरपूर) येथील विसाव्याजवळ अमरावतीवरून पायी आलेल्या दिंडीत कार घुसल्याने जखमी झालेल्या वारकऱ्यांना पाहण्यासाठी गोऱ्हे पंढरपूरला आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख संदीप केंदळे, शहर उपप्रमुख ओंकार बसवंती उपस्थित होते. आषाढी यात्रेसाठी अनेक दिंड्या येत असतात. सोलापूरचा हाय-वे बनवताना पालख्यांसाठी एक ट्रॅक बनवला असता तर वारकऱ्यांची सोय झाली असती. यात्रा कालावधीनंतर तो ट्रॅक दुचाकी सायकल व मोटरसायकलवाल्यांना वापरता आला असता. आषाढी यात्रा ही प्रत्येक वर्षी असते. यात्रेचे वेळापत्रक हे फार पूर्वीच जाहीर होते़ तरीही शहरातील महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत. ऐन यात्रा कालावधीतच कामे घाईघाईने केली जातात. यावरून विभागीय आयुक्त निष्क्रियच आहेत, असेही त्या म्हणाल्या.पंढरपूर, शिर्डी, जेजुरी व अन्य ज्या ठिकाणी देवस्थाने आहेत त्या ठिकाणी नगरपालिका व मंदिर मिळून विकास आराखडा तयार केल्याने तेथे विकास झाला आहे. पंढरीतही नगरपालिका व मंदिर समितीने समन्वय साधून विकास केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. -------------------------------शौचालये खराबआषाढी यात्रेत स्वच्छता रहावी यासाठी उच्च न्यायालयाने पंढरीत ४५०० शौचालये बांधण्याचे आदेश दिले. यात्रेपूर्वी शौचालयांची सोय व्हावी, यासाठी तरटांचे शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु ही शौचालये ५ ते ७ वेळा वापरल्यास खराब होतील, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.