शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अबब...! विंगरमध्ये आढळली ५० मुले, सोलापूर धोकादायक विद्यार्थी वाहतूक

By admin | Updated: June 21, 2017 11:27 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : धोकादायकरीत्या रिक्षा व कारमधून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या १७ वाहनांवर आरटीओ व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी कारवाई केली. पथकाच्या तपासणीत मारुती व्हॅनमध्ये २५ तर विंगरमध्ये ५० विद्यार्थी आढळले. ‘लोकमत’च्या ‘हॅलो सोलापूर’मध्ये ‘विद्यार्थी वाहतूक सुरक्षा वाऱ्यावर’ या मथळ्याखाली १९ जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. मनपा परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्याने निर्माण झालेल्या समस्येचे चित्रण यात मांडले आहे. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी घेतली. धोकादायकरित्या होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश वाहतूक विभागाला दिले. यावर पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, सहायक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्यासमवेत बैठक घेतली व कारवाईच्या सूचना दिल्या. आरटीओ व वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी मार्केट पोलीस चौकी व सिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वारासमोर थांबून शाळांकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. सकाळी साडेसात ते साडेनऊ या दोन तासांत १७ वाहनांवर पथकाने कारवाई केली. शाळेसमोर रिक्षा थांबल्यावर त्यातून उतरणारे विद्यार्थी पोलिसांनी मोजले. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. यात १२ रिक्षा, एक विंगर, चार मारुती ओम्नी व्हॅनचा समावेश आहे. विंगरमध्ये ५० तर एका ओम्नी व्हॅनमध्ये २५ विद्यार्थी आढळले. पोलिसांनी अवैधपणे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणी क्षमतेपेक्षा जादा सीटाप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाचालक संतप्त झाले. त्यांनी कारवाईची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे काही जण तेथे आले व कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे तेथे सायकलवरून आले व त्यांनी तक्रारदारांना कायदेशीर बाबींची माहिती दिली. वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे याही कारवाईच्या ठिकाणी हजर झाल्या. कारवाईत वाहतूक नियंत्रण विभागाचे फौजदार चौगुले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, मोटार वाहन निरीक्षक नंदकुमार काळे, अर्चना घाणेगावकर, अनुपमा पुजारी, हजारे यांनी भाग घेतला. अशी तपासणी मोहीम शहरात विविध भागात अचानकपणे घेण्यात येणार आहे.----------------------मुख्याध्यापकांनी भाडे ठरवावेपालक रिक्षाचालकांना महिन्याला भाडे कमी देतात. त्यामुळे जादा विद्यार्थी घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी व्यक्त केली. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ही वस्तुस्थिती असली तरी कायद्याप्रमाणेच प्रवासी घ्यावे लागतील. रिक्षा किंवा स्कूलबसचे भाडे ठरविण्याचे अधिकार शालेय समितीचे अध्यक्ष या नात्याने मुख्याध्यापकांना आहेत. मुख्याध्यापक, पालक व स्कूलबस चालकांनी एकत्रित बसून विशिष्ट भाडे ठरविल्यास त्याला मान्यता दिली जाईल. मुख्याध्यापकांनी कायदेशीर अडचण लक्षात घेता रिक्षाचालकांना भाडे वाढवून देण्याबाबत भूमिका घ्यावी व सुरक्षित वाहतुकीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. -----------------------------चालकाचे परवाने निलंबितक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विंगर व मारुती ओम्नी कारच्या चालकाचा वाहनपरवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांनी दिले आहेत. दोषी ठरलेल्या वाहनांमध्ये आसनरचनेत बदल केल्याचे आढळले. जादा विद्यार्थी बसावेत या उद्देशाने मारुती ओम्नी व विंगरचे आसन आडव्याऐवजी उभ्या स्थितीत मांडल्याचे दिसले. अशी वाहतूक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे याबाबत संबंधित वाहनधारकांना दंड करण्यात येणार आहे.