शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! विंगरमध्ये आढळली ५० मुले, सोलापूर धोकादायक विद्यार्थी वाहतूक

By admin | Updated: June 21, 2017 11:27 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : धोकादायकरीत्या रिक्षा व कारमधून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या १७ वाहनांवर आरटीओ व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी कारवाई केली. पथकाच्या तपासणीत मारुती व्हॅनमध्ये २५ तर विंगरमध्ये ५० विद्यार्थी आढळले. ‘लोकमत’च्या ‘हॅलो सोलापूर’मध्ये ‘विद्यार्थी वाहतूक सुरक्षा वाऱ्यावर’ या मथळ्याखाली १९ जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. मनपा परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्याने निर्माण झालेल्या समस्येचे चित्रण यात मांडले आहे. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी घेतली. धोकादायकरित्या होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश वाहतूक विभागाला दिले. यावर पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, सहायक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्यासमवेत बैठक घेतली व कारवाईच्या सूचना दिल्या. आरटीओ व वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी मार्केट पोलीस चौकी व सिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वारासमोर थांबून शाळांकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. सकाळी साडेसात ते साडेनऊ या दोन तासांत १७ वाहनांवर पथकाने कारवाई केली. शाळेसमोर रिक्षा थांबल्यावर त्यातून उतरणारे विद्यार्थी पोलिसांनी मोजले. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. यात १२ रिक्षा, एक विंगर, चार मारुती ओम्नी व्हॅनचा समावेश आहे. विंगरमध्ये ५० तर एका ओम्नी व्हॅनमध्ये २५ विद्यार्थी आढळले. पोलिसांनी अवैधपणे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणी क्षमतेपेक्षा जादा सीटाप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाचालक संतप्त झाले. त्यांनी कारवाईची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे काही जण तेथे आले व कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे तेथे सायकलवरून आले व त्यांनी तक्रारदारांना कायदेशीर बाबींची माहिती दिली. वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे याही कारवाईच्या ठिकाणी हजर झाल्या. कारवाईत वाहतूक नियंत्रण विभागाचे फौजदार चौगुले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, मोटार वाहन निरीक्षक नंदकुमार काळे, अर्चना घाणेगावकर, अनुपमा पुजारी, हजारे यांनी भाग घेतला. अशी तपासणी मोहीम शहरात विविध भागात अचानकपणे घेण्यात येणार आहे.----------------------मुख्याध्यापकांनी भाडे ठरवावेपालक रिक्षाचालकांना महिन्याला भाडे कमी देतात. त्यामुळे जादा विद्यार्थी घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी व्यक्त केली. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ही वस्तुस्थिती असली तरी कायद्याप्रमाणेच प्रवासी घ्यावे लागतील. रिक्षा किंवा स्कूलबसचे भाडे ठरविण्याचे अधिकार शालेय समितीचे अध्यक्ष या नात्याने मुख्याध्यापकांना आहेत. मुख्याध्यापक, पालक व स्कूलबस चालकांनी एकत्रित बसून विशिष्ट भाडे ठरविल्यास त्याला मान्यता दिली जाईल. मुख्याध्यापकांनी कायदेशीर अडचण लक्षात घेता रिक्षाचालकांना भाडे वाढवून देण्याबाबत भूमिका घ्यावी व सुरक्षित वाहतुकीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. -----------------------------चालकाचे परवाने निलंबितक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विंगर व मारुती ओम्नी कारच्या चालकाचा वाहनपरवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांनी दिले आहेत. दोषी ठरलेल्या वाहनांमध्ये आसनरचनेत बदल केल्याचे आढळले. जादा विद्यार्थी बसावेत या उद्देशाने मारुती ओम्नी व विंगरचे आसन आडव्याऐवजी उभ्या स्थितीत मांडल्याचे दिसले. अशी वाहतूक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे याबाबत संबंधित वाहनधारकांना दंड करण्यात येणार आहे.