शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारामुळे जिल्ह्यातील ९३३ गावे समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST

सोलापूर : अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ९३३ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली. यामुळे जिल्ह्यातील बरीच गावे ही ...

सोलापूर : अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ९३३ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली. यामुळे जिल्ह्यातील बरीच गावे ही ७० टक्के ओलिताखाली आली असून, बागायतीचे क्षेत्र वाढले आहे. अनेक गावांची समृद्धी झाली आहे. या योजनेवर जिल्ह्यात ७०६ काेटी रुपये खर्ची झाले आहेत. काेणत्याही गावात ही कामे प्रलंबित राहिली नसल्याने या गावांचा कायापालट व्हायला सुुरुवात झाली आहे.

यंदा उन्हाळ्यात टँकर बंद झाले. गावागावांत पाणी मुरले आहे. ऊस, केळी, डाळिंबाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याही पुढे जाऊन काही गावांनी जलपुनर्भरणाची कामे हाती घेतली आहेत. पुढील ५० वर्षांत या गावांना पाणीटंचाई जाणवणार नाही. काही गावांत नवीन सिमेंट बंधारे बांधायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता विकासकामांनाही गती आली आहे. याचा नकळतपणे अनेक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.

-----

भागाईवाडी

जलयुक्त शिवार योजनेमुळे गावात बागायतीबरोबर नगदी पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाझर तलाव दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येथील हिरवी मिरची, सिमला मिरची बेंगलोर, पुण्याला जातेय. हाताने पाणी घेता येईल एवढ्या विहिरी भरल्या आहेत. इतर जलसाठ्यांची क्षमता वाढली असून, गावाची समृद्धी झाली आहे.

-----

पाणीपातळी वाढली

नागझरी नदीवर एक कोटी १६ लाखांचा को.प. बंधारा मंजूर झाला आहे. आता ७० टक्के क्षेत्रफळ ओलिताखाली आले आहे.

कविता घोडके-पाटील, सरपंच

-----

जलयुक्त शिवार आणि इतर कामांमुळे भागाईवाडीतील बागायत क्षेत्र ३ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आले आहे. गावातील भाजीपाला पुणे, बेंगलोरला जातोय.

लहू घोडके, कृषिमित्र, भागाईवाडी

---

बऱ्हाणपूर

अक्कलकोट तालुक्याला सातत्याने पाणीप्रश्न भेडसावत होता. तालुक्यात बऱ्हाणपूर गावात नाला खोलीकरण, ओढ्याची कामे झाली. विहिरी पुनर्भरणाचीही कामे झाली आहेत. तत्पूर्वी दोन वर्षे पाण्याचा प्रश्न अधिकच त्रासदायी ठरला. या भागात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यापुढे गावाला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.

जलयुक्त शिवारांतर्गत बऱ्हाणपूरमध्ये ६९६ हेक्टरवर कामे झाली. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत झालेल्या कामांमुळे भूजलपातळी वाढली आहे.

- इमामोद्दीन पिरजादे, उपसरपंच

--

स्वत:ची शेती कोरडवाहू होती. ज्वारी, तूर आदी पिके घेत होतो. शेताजवळ ओढ्याचे खोलीकरण झाल्याने आता सात एकर ऊस लागवड करता आला.

डाॅ. नासीर पिरजादे, गावकरी

---

वांगी

जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील पाणीपातळी वाढली. अनेक ठिकाणच्या बंद विहिरींना पाणी आले. उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी गाव हे प्रथम क्रमांकाचे गाव ठरले. ही कामे राबविण्यापूर्वी गावात दोन दिवसांना टँकरने पाणीपुरवठा व्हायचा तो आता पूर्णत: थांबला आहे. गाव समृद्धतेच्या वाटेवार आहे.

---

जलयुक्तमुळे गाव समृद्ध झाले. एक तास चालणारा बोअर आता दोन तास चालतोय. गावात वृक्षलागवड आणि जलपुनर्भरणाची कामे नियोजित आहेत. तेही लवकरच मार्गी लागतील. - सरस्वती भोसले-सरपंच, वांगी

--

समृद्ध ग्राम योजना पुढचे नियोजन आहे. जलयुक्त आणि वॅाटरकप अंतर्गत बक्षिसातून काही रक्कम जमा झाली असून, दहा लाखांचे दुसरे काम मंजूर झाले आहे.

- विलास पाटील, गावकरी