शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

जलयुक्त शिवारामुळे जिल्ह्यातील ९३३ गावे समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST

सोलापूर : अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ९३३ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली. यामुळे जिल्ह्यातील बरीच गावे ही ...

सोलापूर : अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ९३३ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली. यामुळे जिल्ह्यातील बरीच गावे ही ७० टक्के ओलिताखाली आली असून, बागायतीचे क्षेत्र वाढले आहे. अनेक गावांची समृद्धी झाली आहे. या योजनेवर जिल्ह्यात ७०६ काेटी रुपये खर्ची झाले आहेत. काेणत्याही गावात ही कामे प्रलंबित राहिली नसल्याने या गावांचा कायापालट व्हायला सुुरुवात झाली आहे.

यंदा उन्हाळ्यात टँकर बंद झाले. गावागावांत पाणी मुरले आहे. ऊस, केळी, डाळिंबाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याही पुढे जाऊन काही गावांनी जलपुनर्भरणाची कामे हाती घेतली आहेत. पुढील ५० वर्षांत या गावांना पाणीटंचाई जाणवणार नाही. काही गावांत नवीन सिमेंट बंधारे बांधायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता विकासकामांनाही गती आली आहे. याचा नकळतपणे अनेक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.

-----

भागाईवाडी

जलयुक्त शिवार योजनेमुळे गावात बागायतीबरोबर नगदी पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाझर तलाव दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येथील हिरवी मिरची, सिमला मिरची बेंगलोर, पुण्याला जातेय. हाताने पाणी घेता येईल एवढ्या विहिरी भरल्या आहेत. इतर जलसाठ्यांची क्षमता वाढली असून, गावाची समृद्धी झाली आहे.

-----

पाणीपातळी वाढली

नागझरी नदीवर एक कोटी १६ लाखांचा को.प. बंधारा मंजूर झाला आहे. आता ७० टक्के क्षेत्रफळ ओलिताखाली आले आहे.

कविता घोडके-पाटील, सरपंच

-----

जलयुक्त शिवार आणि इतर कामांमुळे भागाईवाडीतील बागायत क्षेत्र ३ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आले आहे. गावातील भाजीपाला पुणे, बेंगलोरला जातोय.

लहू घोडके, कृषिमित्र, भागाईवाडी

---

बऱ्हाणपूर

अक्कलकोट तालुक्याला सातत्याने पाणीप्रश्न भेडसावत होता. तालुक्यात बऱ्हाणपूर गावात नाला खोलीकरण, ओढ्याची कामे झाली. विहिरी पुनर्भरणाचीही कामे झाली आहेत. तत्पूर्वी दोन वर्षे पाण्याचा प्रश्न अधिकच त्रासदायी ठरला. या भागात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यापुढे गावाला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.

जलयुक्त शिवारांतर्गत बऱ्हाणपूरमध्ये ६९६ हेक्टरवर कामे झाली. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत झालेल्या कामांमुळे भूजलपातळी वाढली आहे.

- इमामोद्दीन पिरजादे, उपसरपंच

--

स्वत:ची शेती कोरडवाहू होती. ज्वारी, तूर आदी पिके घेत होतो. शेताजवळ ओढ्याचे खोलीकरण झाल्याने आता सात एकर ऊस लागवड करता आला.

डाॅ. नासीर पिरजादे, गावकरी

---

वांगी

जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील पाणीपातळी वाढली. अनेक ठिकाणच्या बंद विहिरींना पाणी आले. उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी गाव हे प्रथम क्रमांकाचे गाव ठरले. ही कामे राबविण्यापूर्वी गावात दोन दिवसांना टँकरने पाणीपुरवठा व्हायचा तो आता पूर्णत: थांबला आहे. गाव समृद्धतेच्या वाटेवार आहे.

---

जलयुक्तमुळे गाव समृद्ध झाले. एक तास चालणारा बोअर आता दोन तास चालतोय. गावात वृक्षलागवड आणि जलपुनर्भरणाची कामे नियोजित आहेत. तेही लवकरच मार्गी लागतील. - सरस्वती भोसले-सरपंच, वांगी

--

समृद्ध ग्राम योजना पुढचे नियोजन आहे. जलयुक्त आणि वॅाटरकप अंतर्गत बक्षिसातून काही रक्कम जमा झाली असून, दहा लाखांचे दुसरे काम मंजूर झाले आहे.

- विलास पाटील, गावकरी