शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पल्स घोटाळ्यात सोलापूरचे ९०० कोटी,माजी संचालकांचा दाव

By admin | Updated: July 8, 2017 13:04 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : पल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशनच्या चिटफंड (पीएसीएल) घोटाळ्यात सोलापुरातील ४.८३ लाख गुंतवणूकदारांचे सुमारे ९०० कोटी रुपये अडकले असून, १९९६ ते २०१४ या कालावधीत येथे पैसे गुंतविण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे राज्यातील ७८ लाख; तर देशातील सहा कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत, असा दावा या कंपनीचे माजी संचालक अनिल चौधरी यांनी आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केला. या घोटाळ्यातील गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी जनशक्ती फाउंडेशन नावाची संघटना स्थापन करण्यात आली असून, या माध्यमातून तपासात मदत करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.चौधरी म्हणाले, ‘पीएसीएल’ कंपनीचे संस्थापक निर्मलसिंग बांगू आणि अन्य संचालकांना या घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर यावर देशभर चर्चा सुरू झाली. या घोटाळ्यात देशातील ६ कोटी गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. त्यांचे साधारणत: ५० हजार कोटी रुपये अडकले आहेत; कंपनीचे संस्थापक आणि संचालकांच्या अटकेनंतर गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयाने या कंपनीची मालमत्ता विकण्यासाठी लोढा समितीही नेमली. सहा महिन्यात गुंतवणूकदारांना पैसे मिळावेत, ही अपेक्षा होती; पण अद्याप पैसे देणे सुरू नाही.गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी चौधरी हे लढा देत आहेत. यासाठी जनशक्ती फाउंडेशनची स्थापना करून दिल्लीतील रामलीला मैदानात जनआक्रोश रॅलीही घेण्यात आली. याशिवाय लोढा समितीला माहिती देण्याचे काम ‘जनशक्ती’च्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र सरकारने या घोटाळ्याप्रकरणी तपासाला आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या कामाला गती द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. कंपनीच्या संस्थापकाने हे पैसे दाबून ठेवले आहेत. पैसे सर्व देशातच आहेत. कारवाईला गती मिळाल्यास गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळतील, असे चौधरी म्हणाले. यावेळी ‘जनशक्ती’चे उपाध्यक्ष नरेंद्र पटेल, रामचंद्र अवधानी, सोलापूरचे समन्वयक सतीश वारद उपस्थित होते.------------------------कोण आहेत चौधरीअनिल चौधरी हे ‘पीएसीएल’ या कंपनीचे संचालक होते. कंपनीच्या पुनरुज्जीवनाची योजना घेऊन ते कंपनीत दाखल झाले होते; पण घोटाळा झाल्यानंतर त्यांनी कंपनी सोडून दिली अन् गुंतवणूकदारांच्या हितासाठी ते कार्यरत झाले. आपण सध्या याप्रकरणी सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलने करीत आहोत. शिवाय कंपनीच्या एजंटांना रोजगार मिळवून देण्यासाठीही ‘जनशक्ती’ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.