शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पल्स घोटाळ्यात सोलापूरचे ९०० कोटी,माजी संचालकांचा दाव

By admin | Updated: July 8, 2017 13:04 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : पल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशनच्या चिटफंड (पीएसीएल) घोटाळ्यात सोलापुरातील ४.८३ लाख गुंतवणूकदारांचे सुमारे ९०० कोटी रुपये अडकले असून, १९९६ ते २०१४ या कालावधीत येथे पैसे गुंतविण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे राज्यातील ७८ लाख; तर देशातील सहा कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत, असा दावा या कंपनीचे माजी संचालक अनिल चौधरी यांनी आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केला. या घोटाळ्यातील गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी जनशक्ती फाउंडेशन नावाची संघटना स्थापन करण्यात आली असून, या माध्यमातून तपासात मदत करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.चौधरी म्हणाले, ‘पीएसीएल’ कंपनीचे संस्थापक निर्मलसिंग बांगू आणि अन्य संचालकांना या घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर यावर देशभर चर्चा सुरू झाली. या घोटाळ्यात देशातील ६ कोटी गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. त्यांचे साधारणत: ५० हजार कोटी रुपये अडकले आहेत; कंपनीचे संस्थापक आणि संचालकांच्या अटकेनंतर गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयाने या कंपनीची मालमत्ता विकण्यासाठी लोढा समितीही नेमली. सहा महिन्यात गुंतवणूकदारांना पैसे मिळावेत, ही अपेक्षा होती; पण अद्याप पैसे देणे सुरू नाही.गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी चौधरी हे लढा देत आहेत. यासाठी जनशक्ती फाउंडेशनची स्थापना करून दिल्लीतील रामलीला मैदानात जनआक्रोश रॅलीही घेण्यात आली. याशिवाय लोढा समितीला माहिती देण्याचे काम ‘जनशक्ती’च्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र सरकारने या घोटाळ्याप्रकरणी तपासाला आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या कामाला गती द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. कंपनीच्या संस्थापकाने हे पैसे दाबून ठेवले आहेत. पैसे सर्व देशातच आहेत. कारवाईला गती मिळाल्यास गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळतील, असे चौधरी म्हणाले. यावेळी ‘जनशक्ती’चे उपाध्यक्ष नरेंद्र पटेल, रामचंद्र अवधानी, सोलापूरचे समन्वयक सतीश वारद उपस्थित होते.------------------------कोण आहेत चौधरीअनिल चौधरी हे ‘पीएसीएल’ या कंपनीचे संचालक होते. कंपनीच्या पुनरुज्जीवनाची योजना घेऊन ते कंपनीत दाखल झाले होते; पण घोटाळा झाल्यानंतर त्यांनी कंपनी सोडून दिली अन् गुंतवणूकदारांच्या हितासाठी ते कार्यरत झाले. आपण सध्या याप्रकरणी सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलने करीत आहोत. शिवाय कंपनीच्या एजंटांना रोजगार मिळवून देण्यासाठीही ‘जनशक्ती’ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.