शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पल्स घोटाळ्यात सोलापूरचे ९०० कोटी,माजी संचालकांचा दाव

By admin | Updated: July 8, 2017 13:04 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : पल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशनच्या चिटफंड (पीएसीएल) घोटाळ्यात सोलापुरातील ४.८३ लाख गुंतवणूकदारांचे सुमारे ९०० कोटी रुपये अडकले असून, १९९६ ते २०१४ या कालावधीत येथे पैसे गुंतविण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे राज्यातील ७८ लाख; तर देशातील सहा कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत, असा दावा या कंपनीचे माजी संचालक अनिल चौधरी यांनी आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केला. या घोटाळ्यातील गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी जनशक्ती फाउंडेशन नावाची संघटना स्थापन करण्यात आली असून, या माध्यमातून तपासात मदत करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.चौधरी म्हणाले, ‘पीएसीएल’ कंपनीचे संस्थापक निर्मलसिंग बांगू आणि अन्य संचालकांना या घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर यावर देशभर चर्चा सुरू झाली. या घोटाळ्यात देशातील ६ कोटी गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. त्यांचे साधारणत: ५० हजार कोटी रुपये अडकले आहेत; कंपनीचे संस्थापक आणि संचालकांच्या अटकेनंतर गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयाने या कंपनीची मालमत्ता विकण्यासाठी लोढा समितीही नेमली. सहा महिन्यात गुंतवणूकदारांना पैसे मिळावेत, ही अपेक्षा होती; पण अद्याप पैसे देणे सुरू नाही.गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी चौधरी हे लढा देत आहेत. यासाठी जनशक्ती फाउंडेशनची स्थापना करून दिल्लीतील रामलीला मैदानात जनआक्रोश रॅलीही घेण्यात आली. याशिवाय लोढा समितीला माहिती देण्याचे काम ‘जनशक्ती’च्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र सरकारने या घोटाळ्याप्रकरणी तपासाला आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या कामाला गती द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. कंपनीच्या संस्थापकाने हे पैसे दाबून ठेवले आहेत. पैसे सर्व देशातच आहेत. कारवाईला गती मिळाल्यास गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळतील, असे चौधरी म्हणाले. यावेळी ‘जनशक्ती’चे उपाध्यक्ष नरेंद्र पटेल, रामचंद्र अवधानी, सोलापूरचे समन्वयक सतीश वारद उपस्थित होते.------------------------कोण आहेत चौधरीअनिल चौधरी हे ‘पीएसीएल’ या कंपनीचे संचालक होते. कंपनीच्या पुनरुज्जीवनाची योजना घेऊन ते कंपनीत दाखल झाले होते; पण घोटाळा झाल्यानंतर त्यांनी कंपनी सोडून दिली अन् गुंतवणूकदारांच्या हितासाठी ते कार्यरत झाले. आपण सध्या याप्रकरणी सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलने करीत आहोत. शिवाय कंपनीच्या एजंटांना रोजगार मिळवून देण्यासाठीही ‘जनशक्ती’ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.