शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

किसान रेल्वेच्या भाडेदरात मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ...

सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के दर कमी केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू झाली. नाशवंत शेतीमालाची कमी वेळेत आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. महाराष्ट्रातून डाळिंब, केळी, संत्रा, पेरू, सिमला मिरची, खरबूज, कलिंगड, द्राक्ष या फळपिकांच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे किसान रेल्वे प्रचंड लोकप्रिय झाली.

कमी वेळेत, कमी भाडे दरात जास्त अंतर पार करण्यासाठी बळीराजाकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत गेला.

यानंतर ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ३१ मार्च २०२२ पर्यंत दिला आहे.

---

५० कोटींची तरतूद

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल अंतर्गत शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या भाडेदरात ५० टक्के सवलत देण्यासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही सवलत ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे कायम ठेवली आहे. अर्थसंकल्पात आणखी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

---

किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याने आणखी काही वर्षे भाडे दरात सवलत देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन किसान रेल्वेच्या भाडेदरात ३१ मार्च २०२२ पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

- चेतनसिंह केदार-सावंत

भाजप तालुकाध्यक्ष, सांगोला