शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेल्वेच्या भाडेदरात मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ...

सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के दर कमी केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू झाली. नाशवंत शेतीमालाची कमी वेळेत आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. महाराष्ट्रातून डाळिंब, केळी, संत्रा, पेरू, सिमला मिरची, खरबूज, कलिंगड, द्राक्ष या फळपिकांच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे किसान रेल्वे प्रचंड लोकप्रिय झाली.

कमी वेळेत, कमी भाडे दरात जास्त अंतर पार करण्यासाठी बळीराजाकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत गेला.

यानंतर ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ३१ मार्च २०२२ पर्यंत दिला आहे.

---

५० कोटींची तरतूद

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल अंतर्गत शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या भाडेदरात ५० टक्के सवलत देण्यासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही सवलत ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे कायम ठेवली आहे. अर्थसंकल्पात आणखी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

---

किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याने आणखी काही वर्षे भाडे दरात सवलत देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन किसान रेल्वेच्या भाडेदरात ३१ मार्च २०२२ पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

- चेतनसिंह केदार-सावंत

भाजप तालुकाध्यक्ष, सांगोला