शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

किसान रेल्वेच्या भाडेदरात मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ...

सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के दर कमी केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू झाली. नाशवंत शेतीमालाची कमी वेळेत आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. महाराष्ट्रातून डाळिंब, केळी, संत्रा, पेरू, सिमला मिरची, खरबूज, कलिंगड, द्राक्ष या फळपिकांच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे किसान रेल्वे प्रचंड लोकप्रिय झाली.

कमी वेळेत, कमी भाडे दरात जास्त अंतर पार करण्यासाठी बळीराजाकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत गेला.

यानंतर ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ३१ मार्च २०२२ पर्यंत दिला आहे.

---

५० कोटींची तरतूद

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल अंतर्गत शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या भाडेदरात ५० टक्के सवलत देण्यासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही सवलत ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे कायम ठेवली आहे. अर्थसंकल्पात आणखी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

---

किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याने आणखी काही वर्षे भाडे दरात सवलत देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन किसान रेल्वेच्या भाडेदरात ३१ मार्च २०२२ पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

- चेतनसिंह केदार-सावंत

भाजप तालुकाध्यक्ष, सांगोला