शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी 'त्या' वाट्टेल ते करताहेत सोलापुरातून ४१ मुली गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2023 13:57 IST

अनैतिक संबंधाचंही कारण: पोलिसांनी घरी १९४ जणींना आणलं

विलास जळकोटकर

सोलापूर - तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुली बाह्य आकर्षणाला तर विवाहित महिला मानसिक भुलून तर छळ, अनैतिक 5 संबंधातून, नवऱ्याशी भांडण अशा कारणावरून गेल्या सहा महिन्यात २३५ जणी गायब झाल्या. यातील १९४ जणींना त्यांच्याशी सुसंवाद साधून पोलिसांनी त्यांच्या घरी पाठवून त्यांचे जीवन सुसहा केले. अद्याप ४१ जणी गायब असून, त्यांचा शोध सुरू आहे. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात शहरातील विविध भागातून अल्पवयीन मुलींपासून ते विवाहित प्रौढ महिलाही गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.

तरुण मुलींमध्ये मोबाईलवरील चॅटिंग, त्यातून निर्माण होणाऱ्या आकर्षणातून अशा घटना वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शाळा-महाविद्यालयात वाटणाऱ्या बाह्य आकर्षणातून प्रेमासाठी अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या. कालांतराने त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली. काही पळून जाण्यापूर्वी अल्पवयीन असतात. लग्न करून संसार थाटतात. पोलिसांच्या शोधानंतर त्यांना वास्तवतेची जाणीव करून दिली जाते, मुलगी आणि आई-वडिलांशी स निर्माण करून त्यांचा स्थिरस्थावर करण्याची भूमिका बजावावी लागते. वैवाहिक जीवनातून पळून गेलेल्यांनाही कायद्याची जाणीव करून देत विस्कटलेली आयुष्याची व्यवस्थित करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, असा अनुभव पोलिस आयुक्तालयातील सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. 

आम्ही काय करतो?

शाळा-महाविद्यालयातील मुली एका वळणावर उभे असतात. अशांसाठी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये सुसंवाद, जबाबदारीचे जाणीव करुन देण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं. कायद्याबदलच ज्ञान देऊन हितगुज साधण्यावर भर देतो. यामुळे बहुतांश मुलींचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे सुरक्षा शाखेकडून सांगण्यात आले.

मोबाईलचा वाढत्या वापर आणि सोशल मीडियावर विविध घटनांचा नकळपणे मुलीवर परिणाम होतो. आई-वडिलांनी आपली मिका मुलगी काय दिवसभर काय करते. तिचे आजूबाजूचे मित्र कोण आहेत या बाबीवर तिच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवून सुसंवाद वाढवावा, भलेबुरे काय याची जाणीव द्यावी. यामुळे अशा घटनांना प्रतिबंध घालता येऊ शकतो. विजय कबाडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ)

काय आहेत पळून जाण्याची कारणें

■ १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली बाह्य सौंदर्याला भुलून मुलांकडे आकर्षित होतात.

■ वास्तव जगाचा विचार न करता आकंठ प्रेमात बुडतात. आई-वडिलांनी तळहाताप्रमाणे जपल्याचे विसरतात.

■ विवाहित महिला सासरी होणाया त्रासातून टोकाचे पाऊल उचलतात

■परिस्थिती, नक्यांशी सातत्याने होणाऱ्या भांडणातून आसरा शोधतात. 

पालकांनी अन् मुलांची जबाबदारी पालकांनी मुलांना आणि मुलांनी पालकांशी असणारा सुसंवाद वाढवण्याची गरज आहे. आपले मुला-मुलींशी असलेले नाते मित्रत्वाचे असले पाहिजे. प्रत्येक गोष्टी दोघांनीही शेअर केल्या पाहिजेत. मुलींना गरजेनुसार मोबाईल देताना ती कोणाशी बोलते यावर नियंत्रण ठेवा, तिला न रागवता जाणून घ्या. आई- वडिलांचेही मुलीसमोरचे वागणे संस्कारक्षम असले पाहिजे.

त्या एकेचाळीस जणींचा शोध जारी..

२३५ गायब झालेल्या मुली व महिलांपैकी १९४ जणींचा | शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याने त्या आपल्या घरी परतल्या. लवकरच त्या ४१ जणींचाही शोध घेऊन त्यांना सुखरूप स्वगृही पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. 

अन् त्यांचा संसार फुलला

पुण्याची अल्पवयीन मुलगी मुलाबरोबर पळून गेली होती. तिला परत आणून सोलापुरात मामाकडे सोडले. दरम्यान आई-वडिलांनी तिचे लग्न जमविण्याची खटपट सुरू केली. याकाळात ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. लग्न केले. तपासात दोघंही सापडली. पोलिसांनी आई-वडिलांना समजावून सांगितले. आता दोघांचाही संसार सुखाने सरु आहे.