शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

प्रेमासाठी 'त्या' वाट्टेल ते करताहेत सोलापुरातून ४१ मुली गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2023 13:57 IST

अनैतिक संबंधाचंही कारण: पोलिसांनी घरी १९४ जणींना आणलं

विलास जळकोटकर

सोलापूर - तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुली बाह्य आकर्षणाला तर विवाहित महिला मानसिक भुलून तर छळ, अनैतिक 5 संबंधातून, नवऱ्याशी भांडण अशा कारणावरून गेल्या सहा महिन्यात २३५ जणी गायब झाल्या. यातील १९४ जणींना त्यांच्याशी सुसंवाद साधून पोलिसांनी त्यांच्या घरी पाठवून त्यांचे जीवन सुसहा केले. अद्याप ४१ जणी गायब असून, त्यांचा शोध सुरू आहे. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात शहरातील विविध भागातून अल्पवयीन मुलींपासून ते विवाहित प्रौढ महिलाही गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.

तरुण मुलींमध्ये मोबाईलवरील चॅटिंग, त्यातून निर्माण होणाऱ्या आकर्षणातून अशा घटना वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शाळा-महाविद्यालयात वाटणाऱ्या बाह्य आकर्षणातून प्रेमासाठी अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या. कालांतराने त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली. काही पळून जाण्यापूर्वी अल्पवयीन असतात. लग्न करून संसार थाटतात. पोलिसांच्या शोधानंतर त्यांना वास्तवतेची जाणीव करून दिली जाते, मुलगी आणि आई-वडिलांशी स निर्माण करून त्यांचा स्थिरस्थावर करण्याची भूमिका बजावावी लागते. वैवाहिक जीवनातून पळून गेलेल्यांनाही कायद्याची जाणीव करून देत विस्कटलेली आयुष्याची व्यवस्थित करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, असा अनुभव पोलिस आयुक्तालयातील सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. 

आम्ही काय करतो?

शाळा-महाविद्यालयातील मुली एका वळणावर उभे असतात. अशांसाठी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये सुसंवाद, जबाबदारीचे जाणीव करुन देण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं. कायद्याबदलच ज्ञान देऊन हितगुज साधण्यावर भर देतो. यामुळे बहुतांश मुलींचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे सुरक्षा शाखेकडून सांगण्यात आले.

मोबाईलचा वाढत्या वापर आणि सोशल मीडियावर विविध घटनांचा नकळपणे मुलीवर परिणाम होतो. आई-वडिलांनी आपली मिका मुलगी काय दिवसभर काय करते. तिचे आजूबाजूचे मित्र कोण आहेत या बाबीवर तिच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवून सुसंवाद वाढवावा, भलेबुरे काय याची जाणीव द्यावी. यामुळे अशा घटनांना प्रतिबंध घालता येऊ शकतो. विजय कबाडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ)

काय आहेत पळून जाण्याची कारणें

■ १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली बाह्य सौंदर्याला भुलून मुलांकडे आकर्षित होतात.

■ वास्तव जगाचा विचार न करता आकंठ प्रेमात बुडतात. आई-वडिलांनी तळहाताप्रमाणे जपल्याचे विसरतात.

■ विवाहित महिला सासरी होणाया त्रासातून टोकाचे पाऊल उचलतात

■परिस्थिती, नक्यांशी सातत्याने होणाऱ्या भांडणातून आसरा शोधतात. 

पालकांनी अन् मुलांची जबाबदारी पालकांनी मुलांना आणि मुलांनी पालकांशी असणारा सुसंवाद वाढवण्याची गरज आहे. आपले मुला-मुलींशी असलेले नाते मित्रत्वाचे असले पाहिजे. प्रत्येक गोष्टी दोघांनीही शेअर केल्या पाहिजेत. मुलींना गरजेनुसार मोबाईल देताना ती कोणाशी बोलते यावर नियंत्रण ठेवा, तिला न रागवता जाणून घ्या. आई- वडिलांचेही मुलीसमोरचे वागणे संस्कारक्षम असले पाहिजे.

त्या एकेचाळीस जणींचा शोध जारी..

२३५ गायब झालेल्या मुली व महिलांपैकी १९४ जणींचा | शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याने त्या आपल्या घरी परतल्या. लवकरच त्या ४१ जणींचाही शोध घेऊन त्यांना सुखरूप स्वगृही पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. 

अन् त्यांचा संसार फुलला

पुण्याची अल्पवयीन मुलगी मुलाबरोबर पळून गेली होती. तिला परत आणून सोलापुरात मामाकडे सोडले. दरम्यान आई-वडिलांनी तिचे लग्न जमविण्याची खटपट सुरू केली. याकाळात ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. लग्न केले. तपासात दोघंही सापडली. पोलिसांनी आई-वडिलांना समजावून सांगितले. आता दोघांचाही संसार सुखाने सरु आहे.