शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत शेतीपंपाची ३५१ कोटी, तर घरगुती, औद्योगिकची १३ कोटी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:20 IST

दीपक लहामगे म्हणाले, बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपाचे २८ हजार २४६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३४८ कोटी ४० लाख एवढी ...

दीपक लहामगे म्हणाले, बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपाचे २८ हजार २४६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३४८ कोटी ४० लाख एवढी थकबाकी आहे. त्यात ९३ कोटी रुपये महावितरण सूट देणार आहे. तर ३५ कोटी रुपये विलंब आकार आणि दंड आहे. तो ही कमी केला जाणार आहे. सर्व वगळता २१९ कोटींची थकबाकी असून चालू बाकी १७ कोटी रुपये आहे.

शहर हद्दीत ३०५ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ही २ कोटी ८२ लाख थकबाकी आहे.

शासनाने या थकीत ग्राहकांसाठी सुरू केलेली कृषी संजीवनी योजना सुरू आहे. यात सप्टेंबर आणि डिसेंबरची चालू बिल भरावयाची आहेत. जुन्या बिलांमध्ये सूट व विलंब आकार अशी ६० टक्के सूट मिळणार आहे.

मार्चएन्डच्या पार्श्वभूमीवर आणि वसुलीचा आकडा मोठा असल्याने सर्व कर्मचारी, ऑपरेटर, अधिकारी वसुलीच्या कामात तैनात केले आहेत. त्यासाठी कनेक्शन कट करण्याची ही मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांनी सध्या सुरू असलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक असे १५ हजार ५२०, तर ग्रामीण भागात २२ हजार ५२५ ग्राहक आहेत. यात शहरात ७ कोटी ४५ लाख तर ग्रामीण भागात ६ कोटी १५ लाख रुपये बाकी आहे.

ट्रान्सफॉर्मर बंद न करता थकीत शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडावे

सर्व प्रकारची वसुली करण्यासाठी ग्रामीण भागात एका शेतकऱ्यांचे कनेक्शन कट न करता ट्रान्सफॉर्मरवरील वीज बंद केली जात आहे. त्यामुळे ज्यांची बाकी नाही अशा शेतकऱ्यांना ही याचा फटका बसत आहे. त्यासाठी महावितरणने सरसकट ट्रान्सफॉर्मर बंद न करता ज्याचे थकीत आहे. त्याला वीजबिल भरण्यासाठी प्रवृत्त करावे. बाकी शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे यांनी केली आहे.

शासकीय कार्यालयांना फटका

शहरात वीज कट करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे हे काम करताना सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा फटका शासकीय कार्यालयांना बसत आहे. त्यामुळे कनेक्शन कट करण्यासाठी सतत ट्रान्सफॉर्मर बंद न करता एकाच दिवशी म्हणजे ज्या दिवशी वीज कामानिमित्त बंद असते, त्या बुधवारी अशी थकीत असलेल्याची कनेक्शन कट करून इतरांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करून वीजबिल भरा

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेकडे ही मोठ्या प्रमाणात वीजबिल थकीत आहे. त्या वसुलीसाठी तालुक्यातील ३९ पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन महावितरणने कट केले आहे. त्याची गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीने गावातील थकीत असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी तातडीने वसूल करून महावितरणचे बिल भरावे, अशा सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत.