शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

३१७ मि.मी. अवकाळी, गारपीट पावसाची नोंद

By admin | Updated: June 4, 2014 00:44 IST

पंढरपूर तालुका: इतिहासातील सर्वात मोठ्या गारपिटीची नोंद

 पंढरपूर: पंढरपूर तालुक्यात गेल्या चार महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची तालुक्यात आजवरच्या इतिहासात सर्वाधिक अवकाळी पाऊस अशी नोंद झाली आहे. तालुक्यात हाहाकार माजवून कोट्यवधी रूपयांचे नुकसान करणारा हा अवकाळी पाऊस तालुक्यातील पुळूज परिमंडलामध्ये सर्वाधिक ६४.९ मी.मी. तर करकंब परिमंडलात सर्वात कमी ५.२ मी. मी तर तालुक्यात तब्बल ३१७.२ मी. मी अशी नोंद झाली आहे. वादळी वारा, तुफानी गारपिटीसह झालेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. पंढरपूर तालुक्यात एकूण नऊ ठिकाणी असणार्‍या परिमंडळाव्दारे पावसाचे पर्जन्यमापन केले जाते. यामध्ये फेब्रुवारी ते मे २०१४ पर्यंत या चार महिन्यात पंढरपूर शहर परिमंडलामध्ये २९.४, चळे ३८.१४, पटवर्धन कुरोली ३४.४, पुळूज ६४.९ , तुंगत ६४.६, भाळवणी २६, कासेगाव ३१.१, भंडीशेगाव २३.६, कारकंब ५.२ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील काही भागात यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होण्याची आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. पंढरपूर तालुक्यात वादळीवार्‍यासह तुफानी गारपीट झाली होती. यामध्ये सर्वाधिक पाऊस पुळूज, तुंगत, पटवर्धन कुरोली, चळे सर्कलमध्ये झाला होता. या अवकाळी पावसामुळे या परिसरातील शेतकर्‍यांचे द्राक्ष, डाळिंब, ऊस, गहू , मका, निंंबोणी , हरभरा आदी पिके व फळबागांचे मोठे नुकसान होऊन शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड होऊन अनेक सर्वसामान्य नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. याशिवाय हा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जनावरांनाही मोठा फटका बसून शेकडो जनावरे दगावली होती. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या भीषण दुष्काळातून सावरू पाहणार्‍या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. या झालेल्या अवकाळी पावसामुळे आता सुरू होत असलेल्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस पडेल का, याबाबत अनेक तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. तसे झाल्यास सर्वसामान्य शेतकर्‍यांसमोर पुढील हंगामात आपली पिके वाचविण्याचे मोठे आव्हान आसणार आहे.

सर्वात मोठी गारपीट

मागील तीन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसात गारपिटीचा मोठा समावेश होता. या अवकाळी पावसात झालेली गारपीट ही गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात कधीही झालेली नाही. त्यामुळे आजवरची सर्वात मोठी गारपीट म्हणून या गारपिटीची सरकार दरबारी नोंद झाली आहे.