शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

३१७ मि.मी. अवकाळी, गारपीट पावसाची नोंद

By admin | Updated: June 4, 2014 00:44 IST

पंढरपूर तालुका: इतिहासातील सर्वात मोठ्या गारपिटीची नोंद

 पंढरपूर: पंढरपूर तालुक्यात गेल्या चार महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची तालुक्यात आजवरच्या इतिहासात सर्वाधिक अवकाळी पाऊस अशी नोंद झाली आहे. तालुक्यात हाहाकार माजवून कोट्यवधी रूपयांचे नुकसान करणारा हा अवकाळी पाऊस तालुक्यातील पुळूज परिमंडलामध्ये सर्वाधिक ६४.९ मी.मी. तर करकंब परिमंडलात सर्वात कमी ५.२ मी. मी तर तालुक्यात तब्बल ३१७.२ मी. मी अशी नोंद झाली आहे. वादळी वारा, तुफानी गारपिटीसह झालेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. पंढरपूर तालुक्यात एकूण नऊ ठिकाणी असणार्‍या परिमंडळाव्दारे पावसाचे पर्जन्यमापन केले जाते. यामध्ये फेब्रुवारी ते मे २०१४ पर्यंत या चार महिन्यात पंढरपूर शहर परिमंडलामध्ये २९.४, चळे ३८.१४, पटवर्धन कुरोली ३४.४, पुळूज ६४.९ , तुंगत ६४.६, भाळवणी २६, कासेगाव ३१.१, भंडीशेगाव २३.६, कारकंब ५.२ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील काही भागात यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होण्याची आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. पंढरपूर तालुक्यात वादळीवार्‍यासह तुफानी गारपीट झाली होती. यामध्ये सर्वाधिक पाऊस पुळूज, तुंगत, पटवर्धन कुरोली, चळे सर्कलमध्ये झाला होता. या अवकाळी पावसामुळे या परिसरातील शेतकर्‍यांचे द्राक्ष, डाळिंब, ऊस, गहू , मका, निंंबोणी , हरभरा आदी पिके व फळबागांचे मोठे नुकसान होऊन शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड होऊन अनेक सर्वसामान्य नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. याशिवाय हा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जनावरांनाही मोठा फटका बसून शेकडो जनावरे दगावली होती. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या भीषण दुष्काळातून सावरू पाहणार्‍या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. या झालेल्या अवकाळी पावसामुळे आता सुरू होत असलेल्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस पडेल का, याबाबत अनेक तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. तसे झाल्यास सर्वसामान्य शेतकर्‍यांसमोर पुढील हंगामात आपली पिके वाचविण्याचे मोठे आव्हान आसणार आहे.

सर्वात मोठी गारपीट

मागील तीन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसात गारपिटीचा मोठा समावेश होता. या अवकाळी पावसात झालेली गारपीट ही गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात कधीही झालेली नाही. त्यामुळे आजवरची सर्वात मोठी गारपीट म्हणून या गारपिटीची सरकार दरबारी नोंद झाली आहे.