शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अक्कलकोट तालुक्यात २८२ कोटींचे वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST

शेतीपंपाचे बिल अनेक शेतकरी वेळेवर भरण्यास दुर्लक्ष करतात. यामुळे अगदी अल्पभूधारकांचेही बिल किमान लाखाच्या घरात आहे. शासनाकडून नेहमी कृषी ...

शेतीपंपाचे बिल अनेक शेतकरी वेळेवर भरण्यास दुर्लक्ष करतात. यामुळे अगदी अल्पभूधारकांचेही बिल किमान लाखाच्या घरात आहे. शासनाकडून नेहमी कृषी क्षेत्राला सहानुभूती असते. यामुळे महावितरणकडून नेहमीच घरगुती, व्यापारी, उद्योगधंदे या क्षेत्राप्रमाणे शेतीसाठी कडक धोरण घेतले जात नाही. शेतकऱ्यांनी वेळीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

सध्या अक्कलकोट तालुक्यातील एकूण शेतीपंपधारकांची संख्या २३ हजार ५३१ इतकी आहे. त्या सर्वांचे मिळून २८२ कोटी ६७ लाख वीजबिल थकीत आहे. यामधून किमान पन्नास टक्केपेक्षा अधिक रकमेची सूट मिळण्यासाठी शासनाने महावितरणकडून निर्लेखनाद्वारे ‘कृषीपंप वीजधोरण-२०२०’ योजना सुरू केली आहे. या माध्यमांतून एकूण बिलातून दंड, विलंब आकार, व्याज, यासह पन्नास टक्केपेक्षा अधिक रकमेची सूट मिळणार आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

कोट :

अक्कलकोट तालुक्यात कृषीपंपाच्या क्षमतेपेक्षा अधिक वीजबिल रक्कम थकीत राहिलेली आहे. सध्या २८२ कोटी ६७ लाख इतकी रक्कम प्रलंबित आहे. त्यासाठी शासनाने कृषीपंप वीजधोरण योजना आणली आहे. या माध्यमातून प्रत्येक ग्राहकांना पन्नास टक्केपेक्षा अधिक रकमेची सूट मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांनी केले आहे.

----