शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाएकरात २५ टन कांद्याचं उत्पादन; मात्र भाव नसल्याने साठवला चाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

अनगर येथे डॉ. नित्यानंद थिटे व प्रा. पत्नी स्वाती थिटे हे दोघे वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांनी ...

अनगर येथे डॉ. नित्यानंद थिटे व प्रा. पत्नी स्वाती थिटे हे दोघे वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सव्वाएकरात उन्हाळी कांद्याचे विकमी २५ टन उत्पादन घेतले.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, एकूण क्षेत्रापैकी सव्वाएकरमध्ये मशागतीनंतर ५ ट्रॉली शेणखत पसरवून टाकले. रेन पाइपच्या साहाय्याने सर्व क्षेत्र भिजवून घेऊन वाफशावर पुणे फुरसुंगीच्या ३ किलो बियाण्यांची पेरणी उपळाई येथील कांदापेरणीतज्ज्ञ शेतकरी सागर माळी यांच्याकडून कांदा पेरून घेतला. पेरणीनंतर २१ दिवसांनी तणनाशक विप सुपर व कांदा मोठा होण्यासाठी गोलची फवारणी केली. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने महिला मजुरांकरवी खुरपणी करून घेतली.

यानंतर मिश्र खतांच्या ४ पिशव्या, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या २ पिशव्या, पांढऱ्या पोटॅश पावडरच्या २ पिशव्या, याबरोबरच केरन या सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला रेन पाइपचा वापर करत प्रत्येक वेळी फक्त रात्रीच पाणी दिले. द्रवामधून फॉस्फरस व पोटॅश सोडले, रासायनिक खते, सेंद्रिय तंत्रज्ञान व शेणखत या त्रिसूत्रीचा वापर, कीटकनाशक, बुरशीनाशकाची एकदाच फवारणी करूनही कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. कांद्याला रात्री मोजकेच गरजेएवढेच रेन पाइपने पावसाप्रमाणे पाणी दिल्याने कांदा तिखट न होता त्याला आकर्षक गोलाई, आकर्षक गुलाबी रंग येऊन पीक जोमदार आल्याने विक्रमी भरघोस उत्पादन मिळाले. पेरणीनंतर साडेतीन ते चार महिन्यांत कांदा काढणीस आला आहे; पण त्याला सध्या बाजारपेठेत भाव नसल्याने तो दर वाढेपर्यंत टिकून राहील, अशी आधुनिक कांदा चाळ उभारून त्यात तो साठविला आहे.

कांद्याच्या काढणीनंतर जमिनीत बेऊड (सुपीकता) तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी कांद्याचे पीक घ्यावे. यासाठी आम्हाला माझे मामा कृषिभूषण दादा बोडके यांचे मार्गदर्शन व सुहास पासले, प्रकाश थिटे, कांदा बीज उत्पादक शेतकरी अनिल गवळी यांचे सहकार्य मिळाले.

----

मी यावर्षी डिसेंबरमध्ये उन्हाळी, पुणे फुरसुंगी कांदा पेरल्याने यामध्ये माझी मोठी बचत झाली आणि रेन पाइपने तो भिजवल्याने त्यामध्ये तण जास्त न येता माल मोठा झाला. कांदा हा जीवनावश्यक घटकामध्ये येत असल्याने शेतकऱ्यांना परवडेल असा दर राहण्यासाठी त्यावर सरकारचे नियंत्रण हवे, तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी अपेक्षा नित्यानंद थिटे यांनी व्यक्त केली आहे.

---

१४अनगर

अनगर येथील उच्चविद्याविभूषित शेतकरी डॉ. नित्यानंद थिटे यांनी उत्पादित केलेला कांदा, भाव नसल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीने उभारलेल्या कांदा चाळीत साठवला आहे.

----

===Photopath===

140521\img-20210507-wa0045.jpg

===Caption===

अनगर येथील उच्च विद्याविभूषित डाॅ. नित्यानंद थिटे व प्रा. स्वाती थिटे यानी तयार केलेली कांदा चाळ