शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

सव्वाएकरात २५ टन कांद्याचं उत्पादन; मात्र भाव नसल्याने साठवला चाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

अनगर येथे डॉ. नित्यानंद थिटे व प्रा. पत्नी स्वाती थिटे हे दोघे वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांनी ...

अनगर येथे डॉ. नित्यानंद थिटे व प्रा. पत्नी स्वाती थिटे हे दोघे वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सव्वाएकरात उन्हाळी कांद्याचे विकमी २५ टन उत्पादन घेतले.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, एकूण क्षेत्रापैकी सव्वाएकरमध्ये मशागतीनंतर ५ ट्रॉली शेणखत पसरवून टाकले. रेन पाइपच्या साहाय्याने सर्व क्षेत्र भिजवून घेऊन वाफशावर पुणे फुरसुंगीच्या ३ किलो बियाण्यांची पेरणी उपळाई येथील कांदापेरणीतज्ज्ञ शेतकरी सागर माळी यांच्याकडून कांदा पेरून घेतला. पेरणीनंतर २१ दिवसांनी तणनाशक विप सुपर व कांदा मोठा होण्यासाठी गोलची फवारणी केली. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने महिला मजुरांकरवी खुरपणी करून घेतली.

यानंतर मिश्र खतांच्या ४ पिशव्या, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या २ पिशव्या, पांढऱ्या पोटॅश पावडरच्या २ पिशव्या, याबरोबरच केरन या सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला रेन पाइपचा वापर करत प्रत्येक वेळी फक्त रात्रीच पाणी दिले. द्रवामधून फॉस्फरस व पोटॅश सोडले, रासायनिक खते, सेंद्रिय तंत्रज्ञान व शेणखत या त्रिसूत्रीचा वापर, कीटकनाशक, बुरशीनाशकाची एकदाच फवारणी करूनही कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. कांद्याला रात्री मोजकेच गरजेएवढेच रेन पाइपने पावसाप्रमाणे पाणी दिल्याने कांदा तिखट न होता त्याला आकर्षक गोलाई, आकर्षक गुलाबी रंग येऊन पीक जोमदार आल्याने विक्रमी भरघोस उत्पादन मिळाले. पेरणीनंतर साडेतीन ते चार महिन्यांत कांदा काढणीस आला आहे; पण त्याला सध्या बाजारपेठेत भाव नसल्याने तो दर वाढेपर्यंत टिकून राहील, अशी आधुनिक कांदा चाळ उभारून त्यात तो साठविला आहे.

कांद्याच्या काढणीनंतर जमिनीत बेऊड (सुपीकता) तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी कांद्याचे पीक घ्यावे. यासाठी आम्हाला माझे मामा कृषिभूषण दादा बोडके यांचे मार्गदर्शन व सुहास पासले, प्रकाश थिटे, कांदा बीज उत्पादक शेतकरी अनिल गवळी यांचे सहकार्य मिळाले.

----

मी यावर्षी डिसेंबरमध्ये उन्हाळी, पुणे फुरसुंगी कांदा पेरल्याने यामध्ये माझी मोठी बचत झाली आणि रेन पाइपने तो भिजवल्याने त्यामध्ये तण जास्त न येता माल मोठा झाला. कांदा हा जीवनावश्यक घटकामध्ये येत असल्याने शेतकऱ्यांना परवडेल असा दर राहण्यासाठी त्यावर सरकारचे नियंत्रण हवे, तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी अपेक्षा नित्यानंद थिटे यांनी व्यक्त केली आहे.

---

१४अनगर

अनगर येथील उच्चविद्याविभूषित शेतकरी डॉ. नित्यानंद थिटे यांनी उत्पादित केलेला कांदा, भाव नसल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीने उभारलेल्या कांदा चाळीत साठवला आहे.

----

===Photopath===

140521\img-20210507-wa0045.jpg

===Caption===

अनगर येथील उच्च विद्याविभूषित डाॅ. नित्यानंद थिटे व प्रा. स्वाती थिटे यानी तयार केलेली कांदा चाळ