शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

२,४५२ शेतकऱ्यांचे शेततळ्याचे १२ कोटी १ लाखांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST

सांगोला : तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ४७० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ मिळाला. ...

सांगोला : तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ४७० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ मिळाला. परंतु शासनाकडून शेततळ्यासाठी मिळणारे अनुदान बंद झाले आहे. दोन वर्षात जिल्ह्यातील २ हजार ४५२ शेतकऱ्यांचे सुमारे १२ कोटी १ लाख २४८ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित राहिले आहे. त्यामुळे लाभार्थी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे.

सन २०१६ -१७ ते २०१९-२० आणि २०२०-२१ या काळात शासनाने राबविलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेला सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यासाठी ८ हजार शेततळ्यांचा उद्दिष्ट असताना १२ हजार ४७० शेतकऱ्यांनी शेततळी पूर्ण केली. शासनाने ४५ कोटी ७९ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित केले. मात्र, गेल्या दोन वर्षांत उर्वरित अनुदान शासनाकडे प्रलंबित राहिले आहे.

या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात केलेल्या २ हजार ४५२ शेततळ्यांचे ११ कोटी १ लाख ४८ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. मागील मार्चपासून या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्याची प्रक्रियाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्वीच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही अन नवीन शेतकऱ्यांना शेततळे मिळत नाही, अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे.

---

लाभार्थी अन तालुके

दक्षिण सोलापूर तालुक्‍यात १०७ शेतकऱ्यांचे ४७ लाख ५३ हजार, मोहोळ तालुक्‍यात ३१० शेतकऱ्यांचे १ कोटी ५१ लाख ९० हजार, अक्कलकोट तालुक्यात १०० शेतकऱ्यांचे ४९ लाख, बार्शी तालुक्‍यात १२२ शेतकऱ्यांचे ५९ लाख ७८ हजार, माढा तालुक्‍यात ५२४ शेतकऱ्यांचे २ कोटी ५६ लाख ७६ हजार, करमाळा तालुक्‍यात ७९ शेतकऱ्यांचे ३८ लाख ७१ हजार, पंढरपूर तालुक्‍यात ४६९ शेतकऱ्यांचे २ कोटी २९ लाख ८१ हजार, सांगोला तालुक्‍यात ३८९ शेतकऱ्यांचे १ कोटी ९० लाख ८१ हजार, मंगळवेढा तालुक्‍यात १६० शेतकऱ्यांचे ७८ लाख ४० हजार, माळशिरस तालुक्‍यात २०२ शेतकऱ्यांचे ९८ लाख ९८ हजार अशा एकूण २ हजार ४५२ शेतकऱ्यांचे १२ कोटी १ लाख ४९८ हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडे प्रलंबित आहे.