शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

एसटीच्या उत्पन्नात २० कोटींची वार्षिक घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे २२ मार्चला देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने २२ मार्च ते २० ऑगस्ट या काळात ...

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे २२ मार्चला देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने २२ मार्च ते २० ऑगस्ट या काळात बससेवा बंद ठेवली. या कालावधीत परप्रांतीयांना सोडण्यासाठी बससेवा सुरू होती. २० ऑगस्टनंतर बससेवा सुरू झाली, परंतु ५० टक्के प्रवासी संख्येची मर्यादा घालण्यात आली.

अकलूज आगाराच्या बस १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षात ७२ लाख ८० हजार कि. मी. धावून २७ कोटी ३७ लाख रु.चे उत्पन्न मिळाले होते. त्याच्या तुलनेत १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या वर्षात कोरोनामुळे फक्त २३ लाख ४६ हजार कि. मी. बसेस धावून ७ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अकलूज आगाराच्या बस ४९ लाख ४४ हजार कि.मी. कमी धावून आगाराचे २० कोटी २० लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे.

विद्यार्थ्यांचे प्रवास पास झाले बंद

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून शिक्षण घेतल्याने सवलत दरातील विद्यार्थ्यांचे प्रवास पास बंद राहिले. जसजसा कोरोना प्रभाव कमी झाला तसे निर्बंध उठविण्यात आले. मात्र ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना व १० वर्षांखालील बालकांना बस प्रवास मनाई करण्यात आली. त्यामुळे कोरोना महामारीच्या वर्षभरात राज्य परिवहन महामंडळास अर्थिक फटका बसला आहे.

कोट :::::::::::::::::::::::::::::

कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात सर्व पल्ल्यांच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. फक्त परप्रांतीयांसाठी बस सेवा सुरू होती. लाॅकडाऊन संपल्यानंतर बससेवा सुरू केली, पण प्रवासी संख्या कमी राहिली. कोरोनाचा प्रभाव कमी झाला तशी प्रवाशांची संख्या वाढली. लांब, मध्यम व जवळ पल्ल्याच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रति कि.मी. १८ रुपये उत्पन्न देणाऱ्या बस सुरू ठेवल्या. आगाराला मोठा अर्थिक फटका बसणार नाही. कोरोना महामारीत परप्रांतीयांना त्यांच्या राज्य सीमेपर्यत सोडण्याचे कर्तव्य आगारातील वाहक व चालकांनी केले. मुंबईकरांना बेस्टच्या माध्यमातून आजही सेवा देत आहेत.

- तानाजीराव पवार,

आगारप्रमुख, अकलूज