शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

आंबे गावात प्रसादातून विषबाधा १७० जण रुग्णालयात दाखल: दोघे गंभीर

By admin | Updated: May 7, 2014 22:45 IST

०७पंड०२,०३

चळे : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगानिमित्त (धार्मिक भोजन) दिलेल्या प्रसादातून १७० जणांना विषबाधा झाली. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ११८ रुग्णांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात, दोघांना पंढरपुरातील खासगी तर ५० जणांना आंबे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांचा समावेश आहे.आंबे येथील राजाराम विठोबा पुजारी यांनी सोमवारी (५ मे) दर्लिंग देवाच्या वालगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. वालगानिमित्त महाप्रसादामध्ये बुंदीचे लाडू, पुरी, भात, भाजी व मठ्ठा या पदार्थांचा समावेश होता. सोमवारी सायंकाळपर्यंत जेवण केलेल्या लोकांना मध्यरात्रीनंतर मळमळ, डोकेदुखी, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला; मात्र उन्हाच्या त्रासामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजून लोकांनी गावातील डॉक्टरांकडे किरकोळ उपचार घेतले. गावातील डॉक्टरांकडे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांनी भोजनातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवून डॉ. प्रसाद अंकुशराव, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, डॉ. विशांत पाटील यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्णांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.नागरिकांचे सहकार्यआंबे ग्रामस्थांना विषबाधा होऊन त्रास होऊ लागल्यानंतर सरपंच भारत गायकवाड, आण्णा शिंदे, सचिन पाटील, अरुण शिंदे, तानाजी सावंत, नागनाथ सावंत, अर्जुन कोळी, संभाजी शिंदे या ग्रामस्थांनी खासगी वाहनातून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शासनाच्या व खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांमधून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.काय आहे वालगा?पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे व तारापूर येथे दर्लिंग देवाची मंदिरे असून चैत्र शु. पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा होतात. यात्रेनंतर आपापल्या कुवतीनुसार परिसरातील भाविक या देवांच्या पालख्या आपल्या घरी बोलावून त्यांचे मानकरी व पुजार्‍यांसह नातेवाईक, ग्रामस्थांना गोड जेवण देतात. या जेवणातूनच विषबाधा झाली असल्याचे सिद्ध झाले आहे.आंबे गावात भीतीवालगानिमित्त देण्यात येणार्‍या भोजनासाठी गावातील प्रत्येक घरातून माणूस निमंत्रित करण्यात येतो. सोमवारी राजाराम पुजारी यांच्या घरी झालेल्या वालगासाठी गावातील प्रत्येक घरातील माणूस जेवल्याने त्या सर्वांनाच त्रास होत असून, या घटनेमुळे गावात भीती पसरली आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांना घटना समजल्यानंतर पंढरपूरकडे धाव घेतली.