शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

आंबे गावात प्रसादातून विषबाधा १७० जण रुग्णालयात दाखल: दोघे गंभीर

By admin | Updated: May 7, 2014 22:45 IST

०७पंड०२,०३

चळे : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगानिमित्त (धार्मिक भोजन) दिलेल्या प्रसादातून १७० जणांना विषबाधा झाली. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ११८ रुग्णांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात, दोघांना पंढरपुरातील खासगी तर ५० जणांना आंबे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांचा समावेश आहे.आंबे येथील राजाराम विठोबा पुजारी यांनी सोमवारी (५ मे) दर्लिंग देवाच्या वालगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. वालगानिमित्त महाप्रसादामध्ये बुंदीचे लाडू, पुरी, भात, भाजी व मठ्ठा या पदार्थांचा समावेश होता. सोमवारी सायंकाळपर्यंत जेवण केलेल्या लोकांना मध्यरात्रीनंतर मळमळ, डोकेदुखी, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला; मात्र उन्हाच्या त्रासामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजून लोकांनी गावातील डॉक्टरांकडे किरकोळ उपचार घेतले. गावातील डॉक्टरांकडे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांनी भोजनातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवून डॉ. प्रसाद अंकुशराव, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, डॉ. विशांत पाटील यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्णांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.नागरिकांचे सहकार्यआंबे ग्रामस्थांना विषबाधा होऊन त्रास होऊ लागल्यानंतर सरपंच भारत गायकवाड, आण्णा शिंदे, सचिन पाटील, अरुण शिंदे, तानाजी सावंत, नागनाथ सावंत, अर्जुन कोळी, संभाजी शिंदे या ग्रामस्थांनी खासगी वाहनातून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शासनाच्या व खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांमधून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.काय आहे वालगा?पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे व तारापूर येथे दर्लिंग देवाची मंदिरे असून चैत्र शु. पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा होतात. यात्रेनंतर आपापल्या कुवतीनुसार परिसरातील भाविक या देवांच्या पालख्या आपल्या घरी बोलावून त्यांचे मानकरी व पुजार्‍यांसह नातेवाईक, ग्रामस्थांना गोड जेवण देतात. या जेवणातूनच विषबाधा झाली असल्याचे सिद्ध झाले आहे.आंबे गावात भीतीवालगानिमित्त देण्यात येणार्‍या भोजनासाठी गावातील प्रत्येक घरातून माणूस निमंत्रित करण्यात येतो. सोमवारी राजाराम पुजारी यांच्या घरी झालेल्या वालगासाठी गावातील प्रत्येक घरातील माणूस जेवल्याने त्या सर्वांनाच त्रास होत असून, या घटनेमुळे गावात भीती पसरली आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांना घटना समजल्यानंतर पंढरपूरकडे धाव घेतली.