शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रातील १४ तासाची वादळाशी झुंज ठरली यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

मंगळवेढा : ‘टायटॅनिक’ सिनेमामध्ये जे दृष्य ...

मंगळवेढा : ‘टायटॅनिक’ सिनेमामध्ये जे दृष्य दाखवण्यात आले, त्यापेक्षा अत्यंत विदारक आणि क्लेशदायक चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने साडेचौदा तास अरबी समुद्रामध्ये तग धरून राहिल्यानंतर भारतीय नौदलाने येऊन त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे भारतीय नौदल त्यांच्यासाठी देवदूतच ठरले.

हा थरारक अनुभव मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील विश्वजित बंडगर या तरुणाला आला. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजित बंडगर या तरुणाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण करून सोलापूर येथे आयटीआयचा कोर्स केला. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात मुंबईला गेला. वेल्डिंग क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करत असल्याने त्याला मुंबई येथील कंपनीमध्ये नोकरी मिळाली.

आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २७ वर्षीय विश्वजितला मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित वेल्डर म्हणून कच्चे इंधन समुद्रतळातून बाहेर काढणाऱ्या जहाज कंपनीतील बार्जमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र स्वत:च्या आयुष्यात भयंकर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार, याची कसलीही कल्पना त्याला नव्हती. या घटनेने त्याला जबर धक्का बसला.

दरम्यान, या ठिकाणी तीनशेहून अधिक लोक काम करत होते. ज्याक्षणी हे वादळ येऊन धडकले, त्यावेळी समुद्राशी जोडून ठेवणाऱ्या त्या जहाजाच्या साधनाचे मोठे नुकसान झाले. साक्षात मृत्यूच डोळ्यासमोर उभा राहिल्याचे सहकाऱ्यांचे धाबे दणाणले.

समुद्रातल्या वादळामध्ये १४ तासापेक्षा अधिक काळ तरंगत राहताना जीवनरक्षक जॅकेटचा एक भाग तुटून गेला. डोक्याला जखम झाली. सोबत असणाऱ्या एका मित्राचे जॅकेट निघून गेले. त्याच्या हाताला हात देऊन लढा सुरू ठेवला. मृत्यूचे तांडव आणि जीव वाचविण्यासाठी सुरू असलेल्या मंगळवेढ्यातील या तरुणाच्या धडपडीपासून घरातले लोक अनभिज्ञ होते. दरम्यान, विश्वजितचा भाऊ विनोद याने चक्रीवादळाची कल्पना आल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला होता.

--

अन्‌ समुद्रात उड्या घेतल्या

अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्ये जीवनरक्षक जॅकेट घालून उड्या घेतल्या. काहीजण त्या चक्रीवादळाच्या तडाख्यात गायब झाले. अशात विश्वजितने हिंमत सोडली नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांना त्याने, काही होणार नाही, हे संकट काही काळासाठी आहे, असे सांगत जीवनरक्षक जॅकेट अंगावर चढवत समुद्रामध्ये उड्या घेतल्या. इथूनच त्यांच्या जीवन-मरणाचा संघर्ष सुरू झाला.

---

हेलिकॉप्टर अन्‌ बचावकार्य

घडलेली घटना भारतीय नौदल विभागापर्यंत समजल्यानंतर त्यांच्याकडून मदतकार्य सुरू झाले.

समुद्रापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि बचावकार्य करणारे पथक जहाजांच्या माध्यमातून पोहोचले. ७० फूटहूनही जास्त उंची असणारे नौदलाचे जहाज व नौदलातील सैन्याने जहाजातून रस्सी खाली टाकून आम्हाला जहाजात चढण्यासाठी प्रेरित केले. सतत चौदा तासापेक्षा जास्त काळ पाण्यात असल्यामुळे अंगात कोणत्याही प्रकारचा त्राण शिल्लक राहिला नव्हता.