शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

अरबी समुद्रातील १४ तासाची वादळाशी झुंज ठरली यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

मंगळवेढा : ‘टायटॅनिक’ सिनेमामध्ये जे दृष्य ...

मंगळवेढा : ‘टायटॅनिक’ सिनेमामध्ये जे दृष्य दाखवण्यात आले, त्यापेक्षा अत्यंत विदारक आणि क्लेशदायक चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने साडेचौदा तास अरबी समुद्रामध्ये तग धरून राहिल्यानंतर भारतीय नौदलाने येऊन त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे भारतीय नौदल त्यांच्यासाठी देवदूतच ठरले.

हा थरारक अनुभव मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील विश्वजित बंडगर या तरुणाला आला. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजित बंडगर या तरुणाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण करून सोलापूर येथे आयटीआयचा कोर्स केला. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात मुंबईला गेला. वेल्डिंग क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करत असल्याने त्याला मुंबई येथील कंपनीमध्ये नोकरी मिळाली.

आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २७ वर्षीय विश्वजितला मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित वेल्डर म्हणून कच्चे इंधन समुद्रतळातून बाहेर काढणाऱ्या जहाज कंपनीतील बार्जमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र स्वत:च्या आयुष्यात भयंकर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार, याची कसलीही कल्पना त्याला नव्हती. या घटनेने त्याला जबर धक्का बसला.

दरम्यान, या ठिकाणी तीनशेहून अधिक लोक काम करत होते. ज्याक्षणी हे वादळ येऊन धडकले, त्यावेळी समुद्राशी जोडून ठेवणाऱ्या त्या जहाजाच्या साधनाचे मोठे नुकसान झाले. साक्षात मृत्यूच डोळ्यासमोर उभा राहिल्याचे सहकाऱ्यांचे धाबे दणाणले.

समुद्रातल्या वादळामध्ये १४ तासापेक्षा अधिक काळ तरंगत राहताना जीवनरक्षक जॅकेटचा एक भाग तुटून गेला. डोक्याला जखम झाली. सोबत असणाऱ्या एका मित्राचे जॅकेट निघून गेले. त्याच्या हाताला हात देऊन लढा सुरू ठेवला. मृत्यूचे तांडव आणि जीव वाचविण्यासाठी सुरू असलेल्या मंगळवेढ्यातील या तरुणाच्या धडपडीपासून घरातले लोक अनभिज्ञ होते. दरम्यान, विश्वजितचा भाऊ विनोद याने चक्रीवादळाची कल्पना आल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला होता.

--

अन्‌ समुद्रात उड्या घेतल्या

अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्ये जीवनरक्षक जॅकेट घालून उड्या घेतल्या. काहीजण त्या चक्रीवादळाच्या तडाख्यात गायब झाले. अशात विश्वजितने हिंमत सोडली नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांना त्याने, काही होणार नाही, हे संकट काही काळासाठी आहे, असे सांगत जीवनरक्षक जॅकेट अंगावर चढवत समुद्रामध्ये उड्या घेतल्या. इथूनच त्यांच्या जीवन-मरणाचा संघर्ष सुरू झाला.

---

हेलिकॉप्टर अन्‌ बचावकार्य

घडलेली घटना भारतीय नौदल विभागापर्यंत समजल्यानंतर त्यांच्याकडून मदतकार्य सुरू झाले.

समुद्रापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि बचावकार्य करणारे पथक जहाजांच्या माध्यमातून पोहोचले. ७० फूटहूनही जास्त उंची असणारे नौदलाचे जहाज व नौदलातील सैन्याने जहाजातून रस्सी खाली टाकून आम्हाला जहाजात चढण्यासाठी प्रेरित केले. सतत चौदा तासापेक्षा जास्त काळ पाण्यात असल्यामुळे अंगात कोणत्याही प्रकारचा त्राण शिल्लक राहिला नव्हता.