शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सोलापूर आरोग्य यंत्रणेला औषध खरेदीसाठीचे दिलेले १.३५ कोटी परत

By admin | Updated: March 31, 2017 14:40 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाईन लोकमत सोलापूरराजकुमार सारोळे -

सोलापूर जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दिलेला १ कोटी ३५ लाखांचा निधी खर्ची न टाकता आल्यामुळे मार्च अखेर परत पाठविण्याची नामुष्की आली आहे. शासनाने जानेवारीमध्ये काढलेल्या नव्या अध्यादेशाचा फटका आरोग्य विभागाला बसला आहे. राज्य शासनाने गृहखाते वगळता सर्व खात्यांना ३१ मार्चपर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त खरेदी न करण्याचा आदेश १७ जानेवारी रोजी जारी केला आहे. याचा फटका आरोग्य खात्याला बसला आहे. आरोग्य विभागातर्फे विभागीय स्तरावर औषध पुरवठा केला जातो. असे असले तरी ऐनवेळी लागणारी तातडीची खरेदी करण्याचा त्या त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून डिसेंबरमध्ये १ कोटी ३५ लाख रुपये आले होते, पण ऐनवेळी जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे हे पैसे खर्ची टाकता आले नाहीत. त्यात जानेवारी महिन्यात जारी करण्यात आलेल्या नव्या अध्यादेशामुळे आरोग्य विभागाला तातडीची औषधे खरेदी करण्यास अडचण निर्माण झाली.जिल्ह्यात जिल्हा आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य केंद्रे व तालुकास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत असलेली तीन उपजिल्हा आणि १४ ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात पंढरपूर येथे १०० तर अकलूज व करमाळा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाली आणि आता मार्चमध्ये तापमान कमी-जास्त होत आहे. अशात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे व्हायरल फिव्हरचे (खोकला, सर्दी, अंगदुखी, थंडी, ताप) रुग्ण वाढले आहेत. अशात स्वाईन फ्लू संशयित रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे. असे असताना औषध खरेदीला अडचण निर्माण झाली. आता मार्च अखेर असल्याने निधी खर्ची न पडल्याने १ कोटी ३५ लाख जिल्हा नियोजनकडे परत पाठविण्यात आले आहेत. दरवेळेस मार्च एण्ड असल्याने शिल्लक असलेला निधी खर्ची टाकण्यास धावपळ उडते. पण यावेळेस मात्र गरज असूनही पैसे खर्च करता आले नाहीत, ही आरोग्य विभागाची शोकांतिका म्हणावी लागेल.---------------------आज मार्च एण्ड़़़़सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ३१ मार्च हा शेवटचा दिवस असल्यामुळे कोषागार कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती यासह ट्रेझरीच्या जिल्ह्यातील बहुतांश शाखा तसेच विविध सरकारी कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरु राहतील़ ऐनवेळी रात्री बारा वाजता जिल्ह्यासाठी करोडो रुपये मिळतात त्याप्रमाणे आज किती निधी ऐनवेळी मिळतो याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे़ -----------------औषधाची गरज...जिल्ह्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असल्याने औषधासाठी निधीची आवश्यकता आहे. तिजोरीत पैसे असूनही खर्च करता आले नाहीत. आरोग्य विभागाचा निधी परत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अध्यादेशात दुरुस्ती होईल म्हणून अधिकारी प्रतीक्षेत राहिले, पण शासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. ------------------पहिल्या टप्प्यातील ३४ लाख निधीतून वार्षिक औषध खरेदी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख आले, पण नव्या अध्यादेशात खर्चाची मर्यादा ५० हजार घालण्यात आल्याने निधी खर्च करता आलेला नाही. सध्या पुरेसा औषध साठा आहे. एप्रिलमध्ये नव्याने निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत. -डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक