शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा परिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा

By admin | Updated: June 10, 2016 00:13 IST

राजन तेली : पंकजा मुंडे यांच्याकडे करणार तक्रार, पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक निकृष्ट काम

सावंतवाडी : जिल्हा परिषदेवर कुणाचाही अंकुश नसल्याने पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक निकृष्ट कामे होत आहेत. याबाबत जिल्हापरिषदेविरूद्ध अनेक तक्रारी वाढल्या असल्याने जिल्हा परिषद भष्ट्राचाराचा अड्डा बनत आहे, अशी टिका भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेतून केली. येथील पर्णकुटी विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, यशवंत आठलेकर, शहराध्यक्ष आनंद नेवगी, महिला तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, परिणीता वर्तक, निशांत तोरसकर, राजू गावडे, विराग मडकईकर आदी उपस्थित होते. यावेळी तेली म्हणाले, जिल्हा परिषदेचे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून विहिरी अस्तित्वात नसतानाही बिले काढली जात आहेत. तर कृषी विभागातील खरेदीही टेंडरशिवाय केली, नवीन अंगणवाडीत उभारल्या पण आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठा सारख्या सोयी मात्र दिल्या नाहीत. अशा अनेक कामात जिल्हा परिषद अपयशी ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक कामांसाठी शासन निधी देऊनही विकासाला खिळ बसली आहे. याबाबत संबंधित खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे तेली यांनी सांगितले. तसेच वेळ पडली तर जिल्हा परिषदेविरूद्ध जन आंदोलन करणार असल्याचा इशारा तेली यांनी दिला. पालकमंत्र्यांवर आपला कोणताही रोष नसून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीच्या नियोजनासाठी बैठका घ्याव्यात. तसेच अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा. अधिकारी ऐकत नसेल तर कारवाई करावी. तरच विकासकामे होऊ शकतात, अन्यथा काहीही होऊ शकत नाही. तसेच विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार नारायण राणे व रविंद्र फाटक यांचे अभिनंदन राजन तेली यांनी यावेळी केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी राजन तेली विषारी सर्प असल्याचा उल्लेख केला होता. यावर दत्ता सामंत हे राजकारणात माझा कार्यआपण चिल्लर कार्यकर्त्यांना उत्तरे देत नाही, अशी प्रतिक्रिया राजन तेली यांनी पत्रकार परिषदेतून दिली. (वार्ताहर)स्वत:च योजना लाटणारे सदस्य काही जिल्हा परिषद सदस्यांनी शासनाच्या काही योजनांचा स्वत:हून लाभ घेतला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा सदस्याला अशाप्रकारे लाभ घेता येऊ शकत नाही. त्याचे सदस्यपद रद्द होऊ शकते. आतापर्यंत दोन सदस्यांनी लाभ घेतलेल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही राजन तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.