शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा कृषी महोत्सव’१९ पासून

By admin | Updated: January 23, 2015 23:38 IST

सुधीर सावंत यांची माहिती : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन

सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळावे, शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास व्हावा, हे उद्दिष्ट्य समोर ठेवून १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथे ‘युवा कृषी महोत्सव २०१५’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, किर्लोसचे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडीअर सावंत बोलत होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश परुळेकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. मंदार गीते, विलास सावंत, आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना ब्रिगेडीअर सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान शिवजयंतीचे औचित्य साधून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेटी, शिवार फेरी, यशोगाथा, कृषी प्रदर्शन, चर्चासत्रे, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, महिला सक्षमीकरण तसेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक, कला व क्रीडाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी शिवमुद्रा ही स्मरणिका प्रसारित करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातर्फे यावर्षी दोन हजार शेतकरी, महिला, युवक, युवती व विस्तार कार्यकर्ते यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानार्जन केले आहे.कृषी महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी कृषी कॉलेजचे विद्यार्थी पहाटे ४.३० वाजता शिवज्योत घेऊन ओरोस ते मालवणकिल्ल्यावर जाणार आहेत. नंतर दुपारी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बलियान, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत कोकणातील कृषी विकासावर मार्गदर्शन तसेच रांगोळी स्पर्धा, ५ ते ७ या वेळेत आकाश दर्शन आणि सायंकाळी ७ ते १० या वेळेत गोविंदराव पानसरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील व्याख्यान.२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत छत्रपती एकता दौड, सकाळी ११ ते दुपारी १.३० कोकण विकासावर चर्चासत्र, कोकण रेल्वेच्या विषयावर चर्चासत्र, दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत जलतरण स्पर्धा, सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत भजनाची डबलबारी, आदी कार्यक्रम होतील.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ पाककला स्पर्धा तसेच ग्रामीण विकासावर चर्चा, कृषी उद्योग विकासावर चर्चा, कृषी बँकिंगवर चर्चा, दुपारी २ ते ३ या वेळेत फुगडी स्पर्धा, दुपारी ३ ते ५ या वेळेत हरवलेले पालकत्व व भरकटलेले विद्यार्थी यावर मार्गदर्शन, सायंकाळी ५ ते रात्री १० महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शेतकरी मेळावा, दुपारी २ ते ३ या वेळेत स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा व दुपारी ३ वाजता कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे, अशी माहिती ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिली.(प्रतिनिधी)