शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

युवकांनी ‘स्टार्ट अप इंडिया’चा लाभ घ्यावा

By admin | Updated: June 23, 2016 01:18 IST

अरूणा कौलगुड : सिंधुदुर्गनगरीत उद्योजकता जागृती कार्यशाळा

ओरोस : जिल्ह्यात उद्योग सुरु करण्याची कल्पना डोक्यात असूनही केवळ आर्थिक पाठबळाअभावी उद्योग सुरु न करणाऱ्यांना शासनाने ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या योजनांतर्गत एक नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेंतर्गत उद्योजकतेचा विकास व त्यासाठी पोषक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी लाभ घेऊन विदेश पातळीवरील उद्योजक बना, असे आवाहन डॉ. अरुणा कौलगुड यांनी स्टार्ट अप इंडिया व उद्योजकता जागृती कार्यशाळेत बोलताना केले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुणे व सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शरद कृषी भवनात आयोजित स्टार्ट अप इंडिया आणि उद्योजकता जागृती कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. अरुणा कौलगुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद जठार, मार्गदर्शक विवेक अत्रे, एम.आय.डी.सी असोसिएशनचे अमित वळंजू आदी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविकात प्रमोद जठार म्हणाले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार दररोज ७९ लहान उद्योग आर्थिकदृष्ट्या अस्थिर होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत भारतीय तरुण, महिलांमध्ये नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. देशातील तरुणांनी उद्योजकतेकडे प्रोत्साहित व्हावे आणि त्यासाठी पोषक यंत्रणा निर्माण व्हावी यासाठी स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया योजना शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.डॉ. अरुणा कौलगुड म्हणाल्या की, येथे सौंदर्याचे नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य आहे. मोठी साधनसंपत्ती आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्योजक होण्यास मोठा वाव आहे. त्यामुळे येथील तरुण-तरुणींमध्ये उद्योग सुरु करण्याची कल्पना डोक्यात येते. परंतु त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसल्याने ते उद्योग सुरु होत नाहीत. त्यांना उद्योग सुरु करता यावा यासाठी शासनाने स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उद्योजकांना बँक कर्जाची प्रक्रिया सोयीस्कर करणे आणि अनेक सवलती देण्यात येणार आहेत. विवेक अत्रे म्हणाले की, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया या योजनेतून ग्रामीण भागात विशेष करून दलित महिला, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केला जाणार आहे. योजनेसाठी आपण नाही तर योजना आपल्यासाठी आहेत असे समजून योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु करा. उद्योग सुरु करण्यासाठी इनोव्हेशन, डेव्हलपमेंट, प्रसार, प्रसिद्धी, प्रोसेस यावर महत्वाचा भर द्यावा, असे अत्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)आडाळी येथील २५० हेक्टर जागा अधिगृहीतदोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील २५० हेक्टर जागा शासनाने एमआयडीसीसाठी संपादित केली आहे. या एमआयडीसीत प्रदूषणविरहीत कंपन्यांना बोलविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांसमवेत लवकरच मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही एमआयडीसी पूर्ण होताच जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच नोकरीची संधी मिळणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.