शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तुम्ही मंत्रीपदी आहात मग कोणता विकास केलात? रूपेश राऊळ यांचा मंत्री केसरकरांना सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: February 2, 2024 15:26 IST

आपल्यासोबत कोणीच नाही समजल्यामुळे मंत्री केसरकरांना नैराश्य आल्याचेही आरोप

अनंत जाधव, सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतना कोकणला काय दिले हे विचारण्यापेक्षा तुम्ही मंत्रीपदाच्या काळात कोणता विकास केला? तो आधी सांगा नंतर उध्दव ठाकरेवर टिका करा आता तुमच्या सोबत कोण राहिले नाहीत म्हणून तुम्ही वैफल्यग्रस्त झाला आहात अशी जोरदार टिका शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, अशोक परब, अशोक धुरी, आबा केरकर आदी उपस्थित होते.

राऊळ म्हणाले, 4 फेब्रुवारीपासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे. तत्पूर्वी ते राज्यात काढण्यात येणार्‍या संवाद यात्रेची सावंतवाडीतून सुरुवात करणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीतील शिवसैनिकांच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. येथील गांधी चौकात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा दावा राऊळ यांनी केला.मंत्री  केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला ही त्यांनी प्रत्युत्तर दिले ठाकरेंनी अडीच वर्षात काय केले? हे विचारण्यापेक्षा तुम्हाला ठाकरेंनी च मंत्री केले हे विसरू नका आता गेली वीस महिने तुम्ही मंत्रीपदी आहात मग तुम्ही काय केले? याचे उत्तर जनतेला द्यावे.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला प्रश्न सोडवू शकला नाहीत,कुणाला किती रोजगार दिले ते सांगा, स्वतः मंत्री असलेल्या शिक्षण खात्यातील बेरोजगार युवकांना न्याय देवू शकलात नाहीत, कबुलायतदार गावकार प्रश्न सुटला असे जाहीर केले तरी तो प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे त्यांना आमच्या नेत्यांवर बोलण्याची नैतिकता नाही.असा सल्ला ही राऊळ यांनी दिला.

या ठिकाणी आपल्यासोबत आता कोणीच नाही हे समजल्यामुळे मंत्री केसरकरांना नैराश्य आले आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होवून ते टिका करीत सुटले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आल्यांनतर मंत्री केसरकर यांनी माझ्या विरोधात बोलले तर मी त्यांच्या मतदार संघात जावून बोलेन, असे सांगितले होते. तोच कित्ता आज ते गिरवत आहेत. मात्र ठाकरे कुटुंबाला बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही त्याच्या नादी लागू नका तुम्हाला धू-धू-धुतील असेही राऊळ म्हणाले.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी