शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लाटेत पुन्हा नौका उलटली

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

तळाशील येथील नौका : आठवड्यातील तिसरी घटना; चार मच्छिमार बचावले

मालवण, आचरा : गेल्या आठवड्याभरात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर नौका उलटल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. मालवण, वायरीपाठोपाठ तळाशील येथील बोट मुणगे किनारी उलटण्याची घटना घडली आहे. मुणगे आपेची येळ (ता. देवगड) समुद्र किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना जोरदार लाटांच्या माऱ्यात फायबर नौका (पात) उलटून त्यात असलेले चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. चारही मच्छिमारांनी पोहत समुद्र किनारा गाठला. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. तळाशील येथून लक्ष्मी विष्णू शेलटकर यांच्या मालकीची फायबर पात घेऊन मुणगेच्या दिशेने पहाटे चार वाजता प्रथमेश शेलटकर, परेश शेलटकर, अनिरुद्ध जुवाटकर, रामा मायबा हे मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी मुणगे आपेची येळ येथील किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान जोरदार लाटांच्या तडाख्यात पात उलटून खडकाळ भागात आदळल्याने पातीसह इंजिन व जाळ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मच्छिमारांनी दिली आहे. (प्रतिनिधी)२४ तासांतील दुसरी घटना : ११ बचावलेदरम्यान, नौका उलटण्याची घटना घडल्यावर जवळ मासेमारी करीत असलेल्या करण कांदळगावकर यांच्या नौकेतील मच्छिमारांनी तळाशील येथील मच्छिमारांना कल्पना दिली. त्यानंतर तळाशील येथील ८०-९० मच्छिमार बांधवांनी मुणगेच्या दिशेने धाव घेतली. मच्छिमारांनी खडकाळ भागात अडकलेली नौका बाहेर काढून किनाऱ्यावर आणली. या अपघातात पातीचे (नौका) मोठे नुकसान झाले आहे. पात चार दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आल्याचे समजते. अशाच पद्धतीची रापण नौका वायरी किनाऱ्यावर बुधवारी उलटण्याची घटना घडली होती. यात समुद्रात फेकले गेलेले सात मच्छिमार सुदैवाने बचावले होते. मासेमारी बंदी कालावधी ९० दिवासांचाच हवामासेमारी बंदी कालावधी हा प्रामुख्याने ९० दिवसांचा असावा, अशी मागणी गेली काही वर्षे मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. १ जून ते ३१ जुलै हा कालावधी जरी मासेमारी बंदी कालावधी म्हणून जाहीर असला, तरी १ आॅगस्टनंतरही समुद्रात वाऱ्याचा व लाटांचा प्रचंड वेग असतो. त्यामुळे मासळीच्या प्रजोत्पादनासाठी ९० दिवसांचा कालावधी गरजेचे आहे. तसेच बंदी कालावधी ९० दिवसांचा झाल्यास मच्छिमार बांधवांची सुरक्षाही अबाधित राहील. त्यामुळे बंदी कालावधी १५ मे ते १५ आॅगस्ट असा करण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले आहे.