शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

अण्णांचे लेखन कैफियत मांडणारे

By admin | Updated: January 18, 2015 00:37 IST

सतीश काळसेकर : अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाला सावंतवाडीत प्रारंभ

सिंधुदुर्ग : अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील माणसाविषयीचा लळा हा नेहमीच वरच्या पातळीवर नेणारा आहे. त्यांनी आयुष्यभर आपल्या लेखनातून समाजाची कैफियतच मांडली, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर यांनी काढले. आज, शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सहाव्या राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, तर उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. काळसेकर पुढे म्हणाले, अण्णा भाऊ साठेंनी लोकनाट्य, पोवाडे, वग, तमाशा, लावणी या पारंपरिक माध्यमांचा आपल्या परिवर्तनवादी संघर्षशील चळवळीसाठी उपयोग करून घेताना भरपूर काळजी घेतली आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनातून कैफियतवजा लेखन केले असून, त्यांच्या लेखनाला उपहासाची धार आहे; पण अनेकदा अभिजनांच्या लेखनात विनोदासोबत बहुजनांविषयी येणारा तुच्छतावाद त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवला.आपल्याकडे घटना आणि काळ यांच्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकणारा स्थल कालपट आपण उभारू शकलेलो नाही. त्याची गरज मात्र सतत जाणवत राहते, असे सांगत श्रमिक प्रतिष्ठानने याआधी काही महत्त्वाची कामे केली आहेत. त्यामुळेच त्यांना आणि सर्वांना भविष्यातही असेच काम करावे लागणार आहे. अण्णा भाऊंच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताचे आणि चारित्र्याचे तपशील अचूक व नेमकेपणाने यायला हवेत. कामाची जबाबदारी नव्या तरुण अभ्यासकांनी केवळ पीएच. डी. पदवी मिळविण्याच्या पातळीवर न घेता तसे संशोधन अधिक अभ्यासपूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.सध्याच्या राजकारणावर प्रकाश टाकताना केंद्रात व राज्यात आलेले भाजपचे सरकार स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या लोकशाहीशी जळवून घेईल असे आपणास वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंद पानसरे यांनी प्रास्ताविक, तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. प्रा. गोविंद काजरेकर यांनी आभार मानले. काळसेकर यांनी स्वीकारली सूत्रेसंमेलनाच्या प्रारंभानंतर संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे राजन गवस यांनी सतीश काळसेकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक राजन गवस, माजी आमदार जयानंद मठकर, प्रा. आनंद मेणसे, निवृत्त आयपीएस अधिकारी एस. डी. कांबळे, प्रा. प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, डॉ. गोविंद काजरेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, अफरोझ राजगुरू, कीर्ती बोंद्रे उपस्थित होते.