शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

तिलारी धरणक्षेत्र परिसराची बिकट अवस्था

By admin | Updated: January 19, 2017 00:04 IST

उन्नेयी बंधाऱ्यासह रॉक गार्डन भकास : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने परिसर ओसाड, लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ कागदावरच, पर्यटकांमधून नाराजी

वैभव साळकर ल्ल दोडामार्गतिलारी धरणाच्या पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या बाता राजकीय पुढाऱ्यांकडून मारल्या जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र तिलारी धरण परिसरातील बागबगिच्यांची अवस्था अत्यंत बिकट बनत चालली आहे. देखभाल दुरूस्तीचा अभाव आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची उदासिनता यामुळे एकेकाळी तिलारी धरणाची शोभा वाढविणारा तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याचा बगीचा आणि मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेल्या रॉक गार्डनची अवस्था भकास बनली आहे. राजकीय पुढाऱ्यांकडून तिलारी धरणाच्या पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या बाता मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्यच असल्याने राजकारण्यांच्या वल्गना म्हणजे ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कढी’ म्हणावी लागेल. केवळ अशा घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यास तालुक्याचा आणि पर्यायाने तिलारी धरणाचा पर्यटन विकास साधण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला तिलारी धरण प्रकल्प दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी जमेची बाजू आहे. भविष्यातील पर्यटन विकासाच्यादृष्टीने त्याचा विचार करून मुख्य धरणाच्या पायथ्याशी म्हैसूर येथील रॉक गार्डनच्या धर्तीवर बगीचा उभारण्यात आला. त्यासाठी त्यावेळी सुमारे १ कोटी रूपये खर्ची घालण्यात आले. त्यानंतर दरवर्षी त्या बगीचाची देखभाल-दुरूस्ती करण्याचे काम ठेकेदारी पध्दतीवर देण्यात आले. मुख्य धरणाच्या व्ह्यू पॉर्इंटवरील बगीच्याची देखील देखभाल दुरूस्ती करण्याचे काम याच पध्दतीने सुरू होते. त्यामुळे तिलारी धरणाच्या परिसराची शोभा निश्चितच वाढली होती. मुख्य धरणाला लागून असलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारासुध्दा आकर्षून घेत होता. याठिकाणचा बगीचादेखील हिरवागार व निसर्गसंपन्न असल्यामुळे त्याचा फायदा तालुक्याच्या पर्यटन विकासाकरीता होत होता. शैक्षणिक सहली तसेच देशी-विदेशी पर्यटकही तिलारी धरणाला भेट द्यायचे. मात्र, गेल्या दोन वर्षात या बगीचांची देखभाल दुरूस्ती न झाल्यामुळे मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेला आणिं तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यावरील बगीच्याची अवस्था भकास झाली आहे.तिलारी धरण हा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा संयुक्त प्रकल्प असल्याने धरणाला भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच पर्यटकही येत असतात. मात्र, धरण परिसराची भकासतेकडे चाललेली अवस्था पाहून भेट देणारे विद्यार्थी, पर्यटक यांचा हिरमोड होतो. त्यामुळे तिलारी धरणाचे पर्यटनात्मक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.