शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

बंधाऱ्यांच्या कामांचा दर्जा घसरला

By admin | Updated: June 19, 2014 01:12 IST

केंद्र शासनाची पाणलोट विकास योजना : अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याचा समित्यांचा आरोप

नीलेश मोरजकर ल्ल बांदा केंद्र शासनाच्या पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सुुरु असलेल्या पाणलोट बंधाऱ्यांच्या कामांची प्रतवारी घसरली आहे. योजनेअंतर्गत तालुक्यात विविध गावांमध्ये सुरु असलेले बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आल्याने पावसाळ्यात बंधारे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, कृषी विभागाच्या देखरेखेखालील पाणलोट योजनेच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांचेही हात ओले होत असल्याने ही कामे निकृष्ट करण्यात येत असल्याचा आरोप पाणलोट समितीमार्फत करण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यातील ५१ गावांमध्ये पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावांमध्ये पाण्याची पातळी वाढावी यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत पाणलोट बंधारे बांधण्यात येत आहेत. सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांची बंधाऱ्यांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांकडे कमिशनची मागणी होत असल्याने या कामांची प्रतवारी घसरल्याचे निदर्शनास येते. यामुळे पावसाळयात ठिकठिकाणी बंधारे फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. गावासाठी मंजूर असलेल्या एकूण निधीच्या ५६ टक्के निधी जलसंधारणासाठी वापरण्यात येतो. या कामांसाठी ठेकेदार नियुक्तीपासून कामाचे बिल अदा करण्याचे अधिकार हे कृषी खात्याला असल्याने या कामांमध्ये भरमसाठ कमिशन लाटण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. सिमेंट क्राँक्रिटीकरण करुन बंधारा बांधणे अंदाजपत्रकात सामाविष्ट असताना चक्क काळा दगड टाकून त्यावर सिमेंटचा लेप लावण्यात येत आहे. अशा पध्दतीचे बंधारे किती वर्ष टिकतील, हा प्रश्नच आहे. बंधाऱ्यासाठी लागणारे सिमेंटदेखील कृषी विभागाकडूनच खरेदी करण्यात येते. कागदोपत्री पाणलोट समिती करत असल्याचे दाखविण्यात येते. तसेच सिमेंट खरेदी केलेल्या एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम कृषी विभागाकडे जमा करण्याचे तोंडी आदेशही संबंधित समिती सचिवांना देण्यात आले आहेत. यामुळे अंदाजपत्रकानुसार कामे करण्यात येत नसल्याने पाणलोटची कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. सिमेंट, वाळूचा वापर कमी प्रमाणात करण्यात येत असल्याने पावसाळ्यात बंधारे फुटून बागायतीची नुकसानी होण्याची शक्यता असल्याने या कामाचा अधिकार हा पूर्णपणे पाणलोट व्यवस्थापन समितीला द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. पाणलोट योजनेविषयी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम २0१0-२0१५ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी आखण्यात आला आहे. डिसेंबर २0११ अखेर पाणलोट समित्यांची नोंद करण्यात आली. प्रेरक प्रवेश अंतर्गत सौरपथदीप खरेदी करण्यापासून कृषी वाचनालय, अंगणवाडी साहित्य, प्राथमिक शाळांसाठी बेंच खरेदी हे सर्व व्यवहार कृषी विभागाकडूनच करण्यात आले. या सर्व व्यवहारांमध्ये लाखो रुपयांचे थेट कमिशन लाटण्यात आल्याचा आरोप पाणलोट समित्यांनी केला आहे. पाणलोट समित्यांकडे अद्यापही या खर्चाची बिले व आकडेवारी देण्यात आली नाही.