शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तिलारीत कंत्राटी कामगारांचे उपोषण सुरु

By admin | Updated: November 14, 2014 23:19 IST

ठोस आश्वासन द्या : आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय

कसई-दोडामार्ग : तिलारी प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगारांना कामावरून अन्यायकारकरित्या कमी करण्यात आले. त्यांनी तिलारी कार्यालयासमोर सेवेत पुन्हा समाविष्ठ करण्याच्या मागणीकरिता शुक्रवार सकाळपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता आर. बी. कुरणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरुच होते.तिलारी येथील कामांवर काम करणाऱ्या व अन्यायकारकरित्या कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामावून न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे तिलारी प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष दत्ताराम नाईक यांनी तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना दिला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने संतोष नाईक यांच्यासह कंत्राटी कामगारांनी तिलारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तिलारी प्रकल्पग्रस्तांची घरे, जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यातील कंत्राटी कामगारांनी १९८५ ते १९९२ सालापर्यंत शासनाच्या हजेरी पटावर असताना कार्यकारी अभियंता तिलारी शीर्षकामे क्र. १ कोनाळकट्टा ता. दोडामार्ग या विभागात संपूर्ण जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध कामे केली आहेत. हजेरीपट बंद झाल्यानंतर ही कामे आमच्याकडून ठेकेदारी पध्दतीने करून घेण्यात येत आहेत. या कामासाठी कामगारांची आवश्यकता असताना कायमस्वरूपी हजर करून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, असे न पटणारे कारण सांगून काही कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.उर्वरित कामगारांना ३० नोव्हेंबर २०१४ पासून कमी करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. या आडमुठ्या धोरणामुळे गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रकल्पातील अधिकारी वर्गातील वर्गाकडून न पटणारी कारणे सांगून कामगारांना स्वत:च्या मनाने सेवेतून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कामगारांची मन:स्थिती ढासळली असून या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेने दिला होता. या उपोषणास बसणाऱ्यांमध्ये अध्यक्ष संतोष दत्ताराम नाईक यांच्यासह सुरेश फटी नाईक, बाळा लाडू लोंढे, सुनील विश्वनाथ शेटवे, सुनील हरिश्चंद्र गवस, महादेव भिकाजी गवस, नितीन गजानन सुतार, तुळशीदास गोपाळ घाडी, नारायण फटी गवस, सुधीर सुरेश पारकर, सुनील आत्माराम सावंत, उदय महादेव नाईक, गणपत भिकाजी गवस, दयानंद वासुदेव गवस, संतोष भिकाजी देसाई, गुरुदास विश्वनाथ शेटवे, सदाशिव महादेव सावंत आदींचा समावेश आहे. तिलारी विभागाकडून कोणतेच ठोस आश्वासन न मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत कामगारांचे आंदोलन सुरुच होते. (वार्ताहर)