शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटाराच्या कामाला मुहूर्तच नाही

By admin | Updated: August 20, 2016 22:54 IST

स्वच्छ रत्नागिरीची ऐशीतैशी : डासांचा उपद्रव वाढला

निवडणुकीचे नगारे - ४मनोज मुळ्ये -- रत्नागिरी --अपार्टमेंट आणि त्यामुळे लोकवस्ती वाढत असताना आवश्यक त्या सुविधा देण्यात रत्नागिरी नगर परिषद खूपच मागे राहिली आहे. गेली अनेक वर्षे शहरातील गटारे बंदिस्त करण्याचे स्वप्न लोकांना दाखवले जात असून, ते पूर्ण करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला मुहूर्तच सापडलेला नाही. कदाचित येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यासाठीचे आश्वासन नागरिकांच्या पदरात पडेल.रत्नागिरी शहरात मारूती मंदिरकडून एस्. टी. स्टँड, मांडवी भागाकडे तीव्र उतार आहे. गटारांमधील सांडपाणी थेट समुद्राकडे वाहून जात असल्याने हा उतार रत्नागिरीकरांसाठी फायद्याचा आहे. कोठेही सांडपाणी साचून राहत नाही. मात्र, त्याकडेही नगर परिषदेचे प्रशासन आणि आजवरच्या राजकीय लोकांनी गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारे उघडीच आहेत.सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी शिवसेनेकडून राजन साळवी रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले होते. तेव्हा त्यांनी भुयारी गटारे करण्याचा मुद्दा प्रथम मांडला होता. मात्र, तेव्हापासून अजूनपर्यंत गटारे भुयारी झाली नाहीतच, पण त्यावरील लाद्या बसवण्याचे कामही अत्यंत निकृष्ट झाले आहे.मुसळधार पावसामध्ये रत्नागिरीची ही गटार व्यवस्था चांगलीच उघडी पडते. जिल्हा परिषद, जयस्तंभ, एस्. टी. स्टँड, आठवडा बाजार परिसर यासारख्या भागात पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहतात. २००५ साली जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा केवळ रत्नागिरी शहरातच १२ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी जयस्तंभ परिसराला अक्षरश: महापूर आलेल्या नदीसारखी स्थिती होती. मात्र, त्या घटनेनंतरही नगर परिषदेला शहाणपण आलेले नाही. पाण्याचा निचरा होत असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येते आणि त्यामुळे रस्तेही खराब होतात. मात्र, खराब रस्ते दरवर्षी नव्याने दुरूस्त करण्यात अनेकांना स्वारस्य असल्याने गटारे बंदिस्त असावीत, याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत.उघड्या गटारांमुळे शहराच्या सर्वच भागांमध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. डासांवरील फवारणी हा देखील संशोधनाचाच विषय आहे. मात्र, भुयारी गटारे झाली तर डासांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल.रत्नागिरीचा विस्तार झपाट्याने होत असताना अशा गरजेच्या प्रश्नांकडे मात्र सर्वच राजकीय पक्षांनी डोळेझाक केली आहे. निदान येणाऱ्या निवडणुकांमध्ये या प्रश्नावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.लाद्या आवराशहराच्या मुख्य मार्गावर काही ठिकाणी गटारांचे काँक्रिट पद्धतीचे काम करण्यात आले आहे. त्यावर सिमेंटच्या लाद्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या कामाला चांगला दर्जा नसल्याने अनेक ठिकाणच्या लाद्या फुटल्या आहेत. त्यातून माणसे गटारात पडण्याचे प्रकारही झाले आहेत. पण नगर परिषदेने त्यात बदल केलेले नाहीत. आता बंदिस्त गटारे नकोत, पण लाद्या आवरा, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.अपेक्षा खूप आहेतयेणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षाची निवड थेट लोकांच्या मतदानातून होणार आहे. त्यांना काही काळ निर्धोकपणे या पदावर काम करण्याची संधी आहे. त्यामुळे या पदासाठी उभे राहणाऱ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.