शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

निर्मल ग्रामसाठी काम करा

By admin | Updated: December 26, 2014 23:51 IST

रणजित देसाई : कुडाळमधील बैठकीत आवाहन

कुडाळ : भारतातील पहिला निर्मल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग होण्यासाठी ३१ जानेवारी २०१५ पर्यंत निर्मल ग्रामयोजना जिल्ह्यातील गावांमध्ये योग्यप्रकारे राबवून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कुडाळ तालुक्याच्या निर्मल ग्राम योजनेअंतर्गत बैठकीत केले.शासनाची निर्मल ग्राम योजना सुरू झाली, तरी अजूनही कुडाळ तालुक्यातील २० गावे निर्मळ झाली नाहीत. या गावांना निर्मळ होण्यासाठी आवश्यक असलेली उद्दिष्ट्ये संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण केलीत की नाही, या संदर्भात माहिती समजून घेण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात या २० गावांतील ग्रामसेवक, सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, उपसभापती आर. के. सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून शौचालयाच्या बांधकामासंदर्भात दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण झाली की नाहीत, याची माहिती उपस्थित मान्यवरांनी घेतली. यावेळी ग्रामसेवकांनी सादर केलेल्या आकडेवारीत व अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीत काही ठिकाणी तफावत आढळली. त्यामुळे योग्यप्रकारे ही योजना सुरू आहे की फक्त कागदोपत्रीच आहे, असा प्रश्न पडला होता.यावेळी काही ग्रामसेवकांनी, गावातील त्यांच्या अख्यत्यारित असलेल्या गावातील शौचालयांची बांधणी मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे नेली नव्हती. यापुढे हे असे चालणार नाही. सर्व शौचालये येत्या ३१ जानेवारी २०१५ पर्यंत पूर्ण केलीच पाहिजेत, असे सुनावले.यावेळी काही ग्रामस्थांनी शौचालय बांधतेवेळी जमिनींचा तसेच इतर प्रश्न उद्भवतात, असे सांगितले. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या संदर्भातील बैठकीला तेथील लोकप्रतिनिधींना बोलवा, जेणेकरून त्यांच्याकरवी अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे सांगितले. जिल्हा राज्यात पुढे : देसाईआपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत निर्मळ ग्राम योजनेत खूप पुढे असल्याचे सांगून, निर्मळ जिल्हा म्हणून भारतात प्रथम येण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करूया, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)