शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

महिलांच्या एकीचे बळ कौतुकास्पद

By admin | Updated: March 11, 2017 21:12 IST

महादेव गावडे : कापसाळ येथील एकता महिला विकास समितीच्या कार्याचा गौरव

चिपळूण : आज समाज एकमेकांपासून दूर जात आहे. स्वार्थी वृत्ती बळावत आहे. अपप्रवृत्ती वाढत आहे. अशाही परिस्थितीमध्ये काही व्यक्ती, संस्था-संघटना समाज हितासाठी कार्यरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कापसाळ गावातील एकता महिला विकास समिती. शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नसताना स्वसामर्थ्य व एकीच्या बळावर या महिला समितीने केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी केले. कापसाळ येथील लक्ष्मीबाई माटे संकुल सभागृहात एकता समितीच्या पंचवार्षिक कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गावडे म्हणाले की, सामाजिक शांती, सुरक्षा व प्रगती यासाठी संघटनात्मक कामाची गरज आहे. अंधश्रध्देच्या माध्यमातून जनतेची लूट करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम रास्कर यांनी राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या चळवळीचा आढावा घेतला. कापसाळ गावात मागील पाच वर्षात एकता महिला समितीने स्वच्छतेपासून आर्थिक विकासापर्यंत न्यायासाठी संघर्ष करुन यश संपादन केले. जात, धर्म, पक्षविरहित कामातून विकासाला पोषक वातावरण तयार करुन गावात महिलांची चळवळ बांधली. आम्हाला मिळालेले यश हे महिलांच्या एकजुटीत असल्याचे एकता महिला गावसमिती, कापसाळ व सिमांतिनी महिला संघटनेच्या अध्यक्षा स्वाती साळवी म्हणाल्या. गाव व समाज आता एकसंघ राहिलेला नाही. घराघरात फूट पडली असून, माणुसकीचे व प्रेमाचे नाते दुर्मीळ झाले आहे. अशा परिस्थितीत एकता महिला समितीने केलेले समाज प्रबोधन व लोकविकासाचे काम गौरवास्पद असल्याचे परिवर्तनचे कार्यकारी संचालक अशोक कदम म्हणाले. यावेळी भीम रास्कर यांनी राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीचा धावता आढावा घेताना ग्रामपंचायतीच्या तसेच महिला संघटनेच्या माध्यमातून कामे करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याविषयी विवेचन केले. यावेळी पंचायत समिती सदस्या रिया कांबळे, कापसाळ सरपंच रावी मोरे, दीपक साळवी, सतीश मोरे, संजय चांदे, कृष्णदास नलावडे यांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या उपाध्यक्षा मंजुषा साळवी यांनी समितीच्या भविष्यातील योजनांबद्द माहिती दिली. यावेळी महिलांनी ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयावर सादर केलेला मूक अभिनय व ‘जात्यावरची ओवी’ हे कार्यक्रम विशेष आकर्षणाचे ठरले. कार्यवाह शामल कदम यांच्यासह महिलांनी हे सादरीकरण केले. यावेळी कार्याध्यक्ष मीनल बांदेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)पक्षविरहीत काम : महिलांची सक्षम चळवळकापसाळ गावी पाच वर्षात एकता महिला समितीने स्वच्छतेपासून आर्थिक विकासापर्यंत न्यायासाठी संघर्ष करून यश संपादन केले. जात, धर्म, पक्षविरहीत कामातून विकासाला पोषक वातावरण तयार करताना महिलांची सक्षम चळवळ बांधली, आम्हाला मिळालेले यश हे महिलांच्या एकजुटीत आहे, असे स्वाती साळवी म्हणाल्या.आज समाज एकमेकांपासून दूर जात आहे. स्वार्थी वृत्ती बळावत आहे.कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नसताना महिलांना केले कार्य.सामाजिक शांती, सुरक्षा व प्रगती यासाठी संघटनात्मक कामाची गरज.स्वच्छतेचे महत्त्व विषयावर मूक अभिनय सादर.