शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

महिलांच्या एकीचे बळ कौतुकास्पद

By admin | Updated: March 11, 2017 21:12 IST

महादेव गावडे : कापसाळ येथील एकता महिला विकास समितीच्या कार्याचा गौरव

चिपळूण : आज समाज एकमेकांपासून दूर जात आहे. स्वार्थी वृत्ती बळावत आहे. अपप्रवृत्ती वाढत आहे. अशाही परिस्थितीमध्ये काही व्यक्ती, संस्था-संघटना समाज हितासाठी कार्यरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कापसाळ गावातील एकता महिला विकास समिती. शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नसताना स्वसामर्थ्य व एकीच्या बळावर या महिला समितीने केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी केले. कापसाळ येथील लक्ष्मीबाई माटे संकुल सभागृहात एकता समितीच्या पंचवार्षिक कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गावडे म्हणाले की, सामाजिक शांती, सुरक्षा व प्रगती यासाठी संघटनात्मक कामाची गरज आहे. अंधश्रध्देच्या माध्यमातून जनतेची लूट करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम रास्कर यांनी राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या चळवळीचा आढावा घेतला. कापसाळ गावात मागील पाच वर्षात एकता महिला समितीने स्वच्छतेपासून आर्थिक विकासापर्यंत न्यायासाठी संघर्ष करुन यश संपादन केले. जात, धर्म, पक्षविरहित कामातून विकासाला पोषक वातावरण तयार करुन गावात महिलांची चळवळ बांधली. आम्हाला मिळालेले यश हे महिलांच्या एकजुटीत असल्याचे एकता महिला गावसमिती, कापसाळ व सिमांतिनी महिला संघटनेच्या अध्यक्षा स्वाती साळवी म्हणाल्या. गाव व समाज आता एकसंघ राहिलेला नाही. घराघरात फूट पडली असून, माणुसकीचे व प्रेमाचे नाते दुर्मीळ झाले आहे. अशा परिस्थितीत एकता महिला समितीने केलेले समाज प्रबोधन व लोकविकासाचे काम गौरवास्पद असल्याचे परिवर्तनचे कार्यकारी संचालक अशोक कदम म्हणाले. यावेळी भीम रास्कर यांनी राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीचा धावता आढावा घेताना ग्रामपंचायतीच्या तसेच महिला संघटनेच्या माध्यमातून कामे करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याविषयी विवेचन केले. यावेळी पंचायत समिती सदस्या रिया कांबळे, कापसाळ सरपंच रावी मोरे, दीपक साळवी, सतीश मोरे, संजय चांदे, कृष्णदास नलावडे यांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या उपाध्यक्षा मंजुषा साळवी यांनी समितीच्या भविष्यातील योजनांबद्द माहिती दिली. यावेळी महिलांनी ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयावर सादर केलेला मूक अभिनय व ‘जात्यावरची ओवी’ हे कार्यक्रम विशेष आकर्षणाचे ठरले. कार्यवाह शामल कदम यांच्यासह महिलांनी हे सादरीकरण केले. यावेळी कार्याध्यक्ष मीनल बांदेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)पक्षविरहीत काम : महिलांची सक्षम चळवळकापसाळ गावी पाच वर्षात एकता महिला समितीने स्वच्छतेपासून आर्थिक विकासापर्यंत न्यायासाठी संघर्ष करून यश संपादन केले. जात, धर्म, पक्षविरहीत कामातून विकासाला पोषक वातावरण तयार करताना महिलांची सक्षम चळवळ बांधली, आम्हाला मिळालेले यश हे महिलांच्या एकजुटीत आहे, असे स्वाती साळवी म्हणाल्या.आज समाज एकमेकांपासून दूर जात आहे. स्वार्थी वृत्ती बळावत आहे.कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नसताना महिलांना केले कार्य.सामाजिक शांती, सुरक्षा व प्रगती यासाठी संघटनात्मक कामाची गरज.स्वच्छतेचे महत्त्व विषयावर मूक अभिनय सादर.