शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दस्तनोंदणीसाठी आधारकार्ड ठरणार साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:10 IST

: जमीन व मालमता खरेदी विक्रीकरिता दस्तनोंदणी करताना साक्षीदार आणायचे कोठून अशी मोठीच पंचाईत होत असे. साक्षीदारांचे महत्त्व भलतेच वाढलेले होते. मात्र, आता असे व्यवहार करणाऱ्यांचे आधारकार्ड हेच ह्यसाक्षीदार म्हणून मान्य केले जाणार आहे.

ठळक मुद्देदस्तनोंदणीसाठी आधारकार्ड ठरणार साक्षीदारसर्व सत्यता तपासणार

प्रकाश वराडकर रत्नागिरी : जमीन व मालमता खरेदी विक्रीकरिता दस्तनोंदणी करताना साक्षीदार आणायचे कोठून अशी मोठीच पंचाईत होत असे. साक्षीदारांचे महत्त्व भलतेच वाढलेले होते. मात्र, आता असे व्यवहार करणाऱ्यांचे आधारकार्ड हेच ह्यसाक्षीदार म्हणून मान्य केले जाणार आहे.दस्तनोंदणीसाठी यापुढे साक्षीदारांची आवश्यकताच भासणार नाही. आधारकार्डद्वारे दस्त नोंदणीची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. परिणामी आता दुय्यम निबंधक कार्यालयांमधील साक्षीदारांची गर्दी कमी होणार आहे. तसेच अडथळे दूर होऊन दस्तनोंदणी वेगाने करणे शक्य होणार आहे.देशात आधारकार्ड नोंदणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झाली आहे. आधारकार्ड नाही, अशी व्यक्ती आता सापडणार नाही. आधारकार्ड हा कायदेशीर पुरावा म्हणून महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे अनेक व्यवहारांसाठी आधारकार्ड उपयोगात आणले जात आहे.

राज्यात जमीन खरेदी व विक्रीचे व्यवहार दररोज मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दररोज गर्दी होते. दस्तनोंदणीसाठी आतापर्यंत दोन साक्षीदार त्यांच्या ओळखीच्या कागदपत्रासह हजर करावे लागत होते. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयांमध्ये खरेदी व विक्री करणाऱ्यांबरोबरच साक्षीदारांनी कार्यालय भरून जात असे.

ही समस्या ओळखून साक्षीदारांची गर्दी कमी करण्यासाठी आता साक्षीदाराऐवजी आधारकार्डच्या आधारे दस्त नोंदणीचा निर्णय शासनाने घेतला असून, नोंदणी महानिरीक्षकांकडून तशा स्वरुपाच्या सूचना दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत.यापुढे ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांना दस्तनोंदणीसाठी साक्षीदारांना आणण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मालमत्ता खरेदी-विक्री करणाºया व्यक्तीची आधार क्रमांकावरून ओळख पटविण्याची जबाबदारी मुद्रांक नोंदणी विभागाच्या स्वतंत्र प्रणालीला देण्याचा प्रस्ताव भारतीय नागरिकांक प्राधिकरण अर्थात युआयडीएआयकडे सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.सर्व सत्यता तपासणारदस्तनोंदणीसाठी साक्षीदारांऐवजी आधारचा वापर करताना त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी बायोमेट्रिक मशीनद्वारे ठसे घेतले जाणार आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हे ठसे तपासले जाणार आहेत. बोटांचे ठसे नोंदणी विभागाच्या स्वतंत्र एमपीएलएसव्हिपीएन या नेटवर्कद्वारे पडताळले जाणार असून, हे नेटवर्क सुरक्षित आहे.कटकटीतून मुक्ततारत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी येथे दुय्यम उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय आहे तर जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये दस्तनोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज दस्तनोंदणीसाठी मोठी गर्दी होते. जमीन, मालमत्ता खरेदी-विक्री करणाºया प्रत्येकाची साक्षीदारांना आणणे, त्यांचे छायाचित्र, ओळखीचा पुरावा तसेच त्यांना स्वाक्षरी होईपर्यंत थांबवणे यासारख्या त्रासांमधून यापुढे आधारकार्डमुळे मुक्तता होणार आहे.निर्णयाचे स्वागतउपनिबंधक कार्यालयांमध्ये खरेदी व विक्री करणाऱ्यांबरोबरच साक्षीदारांनी कार्यालय भरून जात असे. मात्र आता ही गर्दी दिसणार नाही. आधारकार्डमध्ये त्या त्या व्यक्तीची सर्वच माहिती एकत्र करण्यात आल्याने आता आधारकार्ड असले की कोणत्याही साक्षीदाराची गरज भासणार नाही. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRatnagiriरत्नागिरी