शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

‘म्हाडा’च्या पाणीटंचाई लढ्याला न्याय मिळणार का ?

By admin | Updated: June 1, 2016 01:02 IST

प्रशासन जबाबदारी झटकतेय : पाणी, स्वच्छता, देखरेख आदींच्या विळख्यात अडकलीय म्हाडा वसाहत, शासनाने समस्या सोडविण्याची मागणी

सिद्धेश आचरेकर-- मालवण कुंभारमाठ येथील म्हाडा वसाहत अनेक समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत हक्काच्या घरात आलेल्या मुंबईस्थित नागरिकांना अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाण्याची फारच मोठी वानवा आहे. याबाबत स्थानिक ‘सिंधुदर्शन’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने सर्व संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच ममता रविकांत पालव यांनीही म्हाडा वसाहतीतील पाणी प्रश्नी २००५ पासून लढा सुरु केलाय. मात्र त्यांच्या या लढ्याला ना म्हाडा न्याय देत आहे ना ग्रामपंचायत. त्यामुळे आक्रमक बनलेल्या पालव यांनी म्हाडा वसाहतीतील समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मालवण शहरापासून चार किमी अंतरावरील कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन मार्गावर ‘म्हाडा’ गृहनिर्माण संस्था २००५ साली उभारण्यात आली. यात २७० सदनिका असून बरेच नागरिक हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा मे महिन्यात म्हाडा वसाहतीत वार्षिक सत्यनारायण महापूजा असते. यानिमित्त सर्व रहिवासी मुंबई येथून म्हाडा वसाहतीत उन्हाळी सुट्टीत राहण्यास येतात. मात्र म्हाडा वसाहतीला पाणी पुरवठा करणारी विंधन विहीर अक्षरक्ष: गाळाने भरली असल्याने मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथून नागरिकांना पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी म्हाडाचे अधिकारी तसेच कुंभारमाठ ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत प्रत्यक्ष भेट घेवून वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र ही दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवून जबादारी झटकत असल्याची बाब समोर आली आहे.आठ दिवसांपूर्वी कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावाच्या गाळ उपसाचा प्रारंभ करण्यासाठी आले होते. त्यावेळी म्हाडा वसाहतीला भेट देत समस्या जाणून घेतली असे वाटले होते. मात्र आमदारांनी आमचा भ्रमनिरास केल्याचाही ममता पालव यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरीत येथील रहिवाशांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.म्हाडाकडून देखभालीकडे दुर्लक्षमालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील म्हाडा वसाहतीतील २७० सदनिकांची घरपट्टी कुंभारमाठ ग्रामपंचायतीकडून आकारली जाते. नव्या नियमाप्रमाणे यावर्षी ९७६ रुपये इतकी घरपट्टी भरली आहे. तर म्हाडाकडून महिन्याला ३५७ रुपये इतका देखभाल कर (मेंटनन्स) आकाराला जातो. एक दिवस कर उशिरा भरल्यास नियमावर बोट ठेवत दंड आकाराला जातो. असे असताना ३५७ रुपयातील ५० रुपयांची देखभाल केली जात नाही. त्याचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.- ममता पालव,म्हाडा, रहिवासी