शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

‘म्हाडा’च्या पाणीटंचाई लढ्याला न्याय मिळणार का ?

By admin | Updated: June 1, 2016 01:02 IST

प्रशासन जबाबदारी झटकतेय : पाणी, स्वच्छता, देखरेख आदींच्या विळख्यात अडकलीय म्हाडा वसाहत, शासनाने समस्या सोडविण्याची मागणी

सिद्धेश आचरेकर-- मालवण कुंभारमाठ येथील म्हाडा वसाहत अनेक समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत हक्काच्या घरात आलेल्या मुंबईस्थित नागरिकांना अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाण्याची फारच मोठी वानवा आहे. याबाबत स्थानिक ‘सिंधुदर्शन’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने सर्व संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच ममता रविकांत पालव यांनीही म्हाडा वसाहतीतील पाणी प्रश्नी २००५ पासून लढा सुरु केलाय. मात्र त्यांच्या या लढ्याला ना म्हाडा न्याय देत आहे ना ग्रामपंचायत. त्यामुळे आक्रमक बनलेल्या पालव यांनी म्हाडा वसाहतीतील समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मालवण शहरापासून चार किमी अंतरावरील कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन मार्गावर ‘म्हाडा’ गृहनिर्माण संस्था २००५ साली उभारण्यात आली. यात २७० सदनिका असून बरेच नागरिक हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा मे महिन्यात म्हाडा वसाहतीत वार्षिक सत्यनारायण महापूजा असते. यानिमित्त सर्व रहिवासी मुंबई येथून म्हाडा वसाहतीत उन्हाळी सुट्टीत राहण्यास येतात. मात्र म्हाडा वसाहतीला पाणी पुरवठा करणारी विंधन विहीर अक्षरक्ष: गाळाने भरली असल्याने मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथून नागरिकांना पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी म्हाडाचे अधिकारी तसेच कुंभारमाठ ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत प्रत्यक्ष भेट घेवून वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र ही दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवून जबादारी झटकत असल्याची बाब समोर आली आहे.आठ दिवसांपूर्वी कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावाच्या गाळ उपसाचा प्रारंभ करण्यासाठी आले होते. त्यावेळी म्हाडा वसाहतीला भेट देत समस्या जाणून घेतली असे वाटले होते. मात्र आमदारांनी आमचा भ्रमनिरास केल्याचाही ममता पालव यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरीत येथील रहिवाशांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.म्हाडाकडून देखभालीकडे दुर्लक्षमालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील म्हाडा वसाहतीतील २७० सदनिकांची घरपट्टी कुंभारमाठ ग्रामपंचायतीकडून आकारली जाते. नव्या नियमाप्रमाणे यावर्षी ९७६ रुपये इतकी घरपट्टी भरली आहे. तर म्हाडाकडून महिन्याला ३५७ रुपये इतका देखभाल कर (मेंटनन्स) आकाराला जातो. एक दिवस कर उशिरा भरल्यास नियमावर बोट ठेवत दंड आकाराला जातो. असे असताना ३५७ रुपयातील ५० रुपयांची देखभाल केली जात नाही. त्याचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.- ममता पालव,म्हाडा, रहिवासी