शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रश्न सोडविणार

By admin | Updated: November 23, 2014 23:58 IST

उद्धव ठाकरे : शिवराजेश्वराचे सपत्नीक दर्शन ; दुरवस्थेकडे लक्ष वेधले

मालवण : ज्यांच्यापासून लढण्याची प्रेरणा घ्यावी, असे शिवरायांसारखे दुसरे दैवत नाही. त्यांचे यथोचित स्मारक व्हावयास हवे. त्यांनी इतिहास घडविताना जलदुर्ग आणि गडकिल्ले बांधले आहेत. हीसुद्धा त्यांची स्मारकेच आहेत. छत्रपतींच्या किल्ल्यांची निगा राखणे आमचे पहिले कर्तव्य आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या बाबतीतही अनेक अडचणी आणि व्यथा आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याबाबतच्या सर्व प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात कोकणापासून शनिवारी झाली. रविवारी ते मालवण येथे आले असताना त्यांनी पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासमवेत सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, श्रद्धा जाधव, रवींद्र फाटक, अरविंद सावंत,् नगरसेवक रविकिरण आपटे, नगरसेविका सेजल परब, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.सुरूवातीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शिवराजेश्वरांचे दर्शन घेतले. ठाकरे यांनी शिवराजेश्वरांना मानाचा जिरेटोप, शाल व पुष्पहार अर्पण केला. मंदिराचे मानकरी सयाजी सकपाळ यांनी शिवराजेश्वर मंदिराचा इतिहास सांगताना मंदिराच्या झालेल्या दुरवस्थेकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. सकपाळ म्हणाले, सन १६९५ला छत्रपती राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचे हे मंदिर बांधले आहे. या मंदिरातील शिवछत्रपतींची मूर्ती या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. कालौघात हे मंदिर जीर्ण झाले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. असंख्य शिवभक्तांनी निधी उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र शासनाच्या पुरातत्व विभागाची परवानगी नसल्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अडले आहे. आपण त्या परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.फोटोग्राफीचा मोह आवरला नाहीउद्धव ठाकरे स्वत: उत्तम फोटोग्राफर आहेत. किल्ला परिसराची पाहणी करताना त्यांनी एका फोटोग्राफरजवळील कॅमेरा घेत किल्ला परिसराचे काही फोटो टिपले. बोटीतून किल्ल्यावर येतानाही त्यांनी काही फोटो घेतले. त्यांचा फोटोग्राफीचा मोह कौतुकाचा विषय ठरला. (प्रतिनिधी)केंद्रात आणि राज्यात प्रश्न मांडणार४सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या जीर्ण झाल्या आहेत. किल्ल्यावर पाच ऐतिहासिक मंदिरे आहेत. पाण्याची तळी आहेत. या सर्वांची दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची सोय नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक व्हावी, असे निवेदन ठाकरे यांना सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघाकडून देण्यात आले. यावर शिवसेनेचे खासदार केंद्रात आणि आमदार राज्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रश्नांबाबत लक्ष घालतील. किल्ल्याच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.निगा राखणे आमचे कर्तव्यचसिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे लक्ष घालून त्याची निगा राखणे आमचे कर्तव्यच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन नेहमीच त्याची निगा राखणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडून किल्ल्याच्या समस्या ऐकणे गरजेचे होते. किल्ल्याची डागडुजी व्हावी, त्याची योग्यप्रकारे निगा राखावी ही आमची सुरूवातीपासूनची इच्छा आहे. यासाठीच आमच्याकडून योगदान म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी किल्ल्याला देणगी दाखल ५० लाख रूपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र या निधीचा विनियोग कशाप्रकारे केला जाईल, याची आम्हाला कोणीही कल्पना न दिल्यामुळे ५० लाखांचा निधी द्यायचा राहिला आहे. तो आम्ही लवकरच देऊ. मात्र, त्याचा विनियोग योग्यप्रकारे झाला पाहिजे.