शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडण्याचा प्रस्ताव पाठविणार

By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST

ई. रविंद्रन : हत्तींना रोखण्यासाठी उपाययोजना राबविणार

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असले तरी हत्ती किंवा जंगली प्राण्यांना झाडे उंच वाढल्याने खाद्य मिळत नाही आणि त्यामुळेच जंगली प्राणी जंगलाकडून नागरीवस्तीमध्ये प्रवेश करू लागले आहेत. यासाठी आता काही ४० वर्षे झालेली झाडे तोडल्यास त्यांना नव्याने फुटवे येवून हे खाद्य उपलब्ध होईल यासाठी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिली.याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्र वनखात्याच्या ताब्यात असून या क्षेत्रात जंगल आहे. या जंगलाची गेल्या ४० वर्षात तोड न झाल्याने झाडे उंच गेली आहेत. त्यामुळे हत्तींना जंगलात खाद्य मिळेनासे झाले आहे आणि त्यामुळेच या हत्तींनी जंगल सोडून नागरी वस्तीतील शेती, बागायतीत आपले खाद्य शोधले आहे. या जंगलामध्येच हत्तींना खाद्य उपलब्ध करून द्यायचे झाल्यास ४० वर्षे झालेल्या झाडांची काही प्रमाणात तोड करून किंवा नवीन झाडांच्या लागवडी करून ते खाद्य उपलब्ध होईल यासाठी वनविभागाने प्रयत्न करावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पट्ट्यात आणखी पाच हत्ती दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या पाचपैकी एका हत्तीचा माग वनविभागाने काढला असून हा सर्वात मोठा हत्ती आहे. हे वनविभागाला मिळालेल्या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे. तर जिल्ह्यात नव्याने आलेले हत्ती शोधण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहे तर यापूर्वी दाखल असलेल्या तीन हत्तींपैकी दोन हत्तींची कार्यपद्धतीत बदल झाला असून त्याचेही परीक्षण वनविभाग करीत आहे.कर्नाटकातून टीम येणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल असलेल्या हत्तींना पकडून त्यांना कर्नाटक राज्यात सोडण्यासाठी व त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी या जिल्ह्यात लवकरच हत्तींना प्रशिक्षित करणारी एक टीम येत आहे. येथील हत्तींना शोधून त्यांना खाद्यातून अथवा शुटींगद्वारे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येईल व पकडून त्यांना ही टीम घेऊन जाईल. म्हणून प्रथम सर्वेक्षणासाठी ही टीम येणार आहे असे यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सांगितले.भूसंपादन लवकरचमालवण येथील सी वर्ल्ड प्रकल्पासाठी ५० कोटीचा निधी पर्यटन विभागाकडे प्राप्त झाला आहे. हा निधी वर्ग होताच या प्रकल्पाच्या भू संपादनास प्रत्यक्ष प्रारंभ होईल. या क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली असून भू संपादनाचा प्रस्ताव तयार असल्याचेही जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)