शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविणार : मालवणकर

By admin | Updated: August 31, 2014 23:29 IST

हे अभियान यावर्षी राबविणार असल्याची माहिती जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली

वेंगुर्ले : येथील जागृती क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे ‘पाणी साठवा गाव वाचवा’ हे अभियान यावर्षी राबविणार असल्याची माहिती जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली.जागृती मंडळातर्फे याआधी वसुंधरा बचाव, तंटामुक्ती गाव मोहीम, लेक वाचवा, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रध्दा निर्मूलन, क्रीडा अभियान आदी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांना सहकार्य करण्यात आले आहे. कमी प्रमाणात पडणारा पाऊस, वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी यामुळे पाणीटंचाई वाढलेली आहे. याची जाणीव ठेवत पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करण्याबाबत जागृती जनमाणसात रुजविण्याकरिता जागृती मंडळ कार्य करणार आहे. या अभियानाचा शुभारंभ १0 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. पाणी वापरात समन्वय, एकसूत्रता आणण्याकरिता, जलसाठा संचलित करणे, पाणीटंचाईवर मात करणे यासाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याने जागृती मंडळातर्फे वेंगुर्ले तालुक्यात पाणी साठवून गाव वाचविण्याची मोहीम राबवून प्रचार व प्रसार गावागावात करण्यात येणार आहे. यासाठी रॅली, दौड, चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धेचाही प्रचारात वापर केला जाणार आहे. गावागावात पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गावागावात तेथील युवक मंडळे, महिला मंडळे, बचत गट, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून गावागावातील पाणीसाठ्याचा भविष्यात समान वापर तंत्रशद्ध पद्धतीने करतानाच विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीतून समन्वय राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीची गरज लोकांना पटवून देण्यात येणार आहे. जागृती मंडळाच्या या पाण्याच्या संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अध्यक्ष संजय मालवणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)