शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविणार : मालवणकर

By admin | Updated: August 31, 2014 23:29 IST

हे अभियान यावर्षी राबविणार असल्याची माहिती जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली

वेंगुर्ले : येथील जागृती क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे ‘पाणी साठवा गाव वाचवा’ हे अभियान यावर्षी राबविणार असल्याची माहिती जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली.जागृती मंडळातर्फे याआधी वसुंधरा बचाव, तंटामुक्ती गाव मोहीम, लेक वाचवा, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रध्दा निर्मूलन, क्रीडा अभियान आदी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांना सहकार्य करण्यात आले आहे. कमी प्रमाणात पडणारा पाऊस, वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी यामुळे पाणीटंचाई वाढलेली आहे. याची जाणीव ठेवत पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करण्याबाबत जागृती जनमाणसात रुजविण्याकरिता जागृती मंडळ कार्य करणार आहे. या अभियानाचा शुभारंभ १0 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. पाणी वापरात समन्वय, एकसूत्रता आणण्याकरिता, जलसाठा संचलित करणे, पाणीटंचाईवर मात करणे यासाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याने जागृती मंडळातर्फे वेंगुर्ले तालुक्यात पाणी साठवून गाव वाचविण्याची मोहीम राबवून प्रचार व प्रसार गावागावात करण्यात येणार आहे. यासाठी रॅली, दौड, चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धेचाही प्रचारात वापर केला जाणार आहे. गावागावात पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गावागावात तेथील युवक मंडळे, महिला मंडळे, बचत गट, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून गावागावातील पाणीसाठ्याचा भविष्यात समान वापर तंत्रशद्ध पद्धतीने करतानाच विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीतून समन्वय राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीची गरज लोकांना पटवून देण्यात येणार आहे. जागृती मंडळाच्या या पाण्याच्या संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अध्यक्ष संजय मालवणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)