शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

रत्नागिरी-चिपळूण मार्गावर धावणार ‘विनाथांबा; विनावाहक’ एस. टी.

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन २६ जानेवारीपासून देवरूख - रत्नागिरी मार्गावर विनाथांबा, विनावाहक एस. टी. सुरू करण्याचा निर्णय

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ ब्रीदवाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा देण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘विनाथांबा, विनावाहक’ एस. टी. सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन २६ जानेवारीपासून देवरूख - रत्नागिरी मार्गावर विनाथांबा, विनावाहक एस. टी. सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी सांगितले.सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत रत्नागिरी व चिपळूण येथून गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरीतून १२ व चिपळुणातून १२ मिळून एकूण २४ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी व चिपळूण बसस्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाडीच्या आरक्षणासाठी बसस्थानकात स्वतंत्र बुकिंग कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रत्नागिरी - चिपळूण मार्गावर सुरू असलेल्या अवैध, वडाप वाहतुकीमुळे एस. टी.चे होणारे नुकसान लक्षात घेता या मार्गावर विनाथांबा गाडी सुरू करण्यात येणार आहे. खेड, गुहागर तालुक्यातून रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. बऱ्याच वेळा थेट गाड्यांऐवजी गाड्या बदलून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नियमित चिपळूण - रत्नागिरी प्रवासासाठी अडीच तास लागतात. आता विनाथांबा बसमुळे अवघा एक तास ५० मिनिटे लागणार आहेत. विनाथांबा प्रवासासाठी ‘मिडी बस’ यशवंती सोडण्यात येणार आहे. विनाथांबा व विनावाहक बससाठी दिवसभर चार वाहक व १२ चालक कार्यरत राहणार आहेत. रत्नागिरी व चिपळुणात प्रत्येकी २ वाहक, तर ६ चालक कार्यरत राहणार असून, प्रत्येक चालक दिवसभरात दोन फेऱ्या मारणार आहे. वाहक मात्र बसस्थानकात आरक्षण कक्षातून आरक्षण उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे प्रवाशांची सोय होईल. रत्नागिरी विभागात मार्चअखेर एकूण १०० नवीन गाड्या उपलब्ध होणार असून, पैकी २५ नवीन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय ४४१ नवीन चालक हजर झाल्यामुळे चालकांवरील ताण कमी झाला आहे. या नव्या प्रयोगामुळे एस. टी.ची हा नवा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)२६ जानेवारीदेवरूख-रत्नागिरी मार्गावर विनाथांबा विचाराधीन.१ तास ५0 मि.चिपळूूण - रत्नागिरी अंतर कापणार.24मिडी बसेस सोडण्यात येणार.