शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

कामगारांना घरे मिळवून देणार $: प्रकाश नाईक

By admin | Updated: May 12, 2014 00:13 IST

कणकवली : गिरणी कामगारांच्या स्वप्नांना तिलांजली देण्याचा कामगारांच्या इतर संघटनांचा प्रयत्न आहे. सरकारशी हात मिळवणी केलेल्या नेत्यांच्या

कणकवली : गिरणी कामगारांच्या स्वप्नांना तिलांजली देण्याचा कामगारांच्या इतर संघटनांचा प्रयत्न आहे. सरकारशी हात मिळवणी केलेल्या नेत्यांच्या संघटना कामगारांचे भले करणार नाहीत. गिरणी कामगारांच्या भावनांशी खेळू नका. मुंबईतच घरे देणे सरकारला शक्य आहे. आम्ही या वर्षात गिरणी कामगारांना घरे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. इतर संघटनांनी कामगारांच्या जीवावर आखलेले षड्यंत्र हाणून पाडू, असा इशारा गिरणी कामगार वारसा उत्कर्ष महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी दिला. येथील भगवती मंगल कार्यालयात महासंघाचा मेळावा झाला. या मेळाव्याला कार्याध्यक्ष भगवान शिंदे, कोषाध्यक्ष दिपक कदम, सरचिटणीस आनंद मोरे, सहचिटणीस सुरेश वाईरकर, सदस्य बापू बागडी, सुरेश यादव, महिला संघटक अनिता ढवळ, सुचिता शिंदे, सिंधुुदुर्ग जिल्हाप्रमुख दिलीप कुडाळकर, वैभववाडी तालुका संघटक मनोहर दळवी, देवगड तालुका संघटक बाबाजी लोके, संदीप डामरे, कुडाळ तालुका संघटक विलास राऊळ, वेंगुर्लेचे शरद परब, मालवणचे बाळू परब, कणकवलीचे अनंत कांडर, दोडामार्गचे भाऊ राणे, सावंतवाडीचे मुकुंद परब, हेमंत परब आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, वारस उत्कर्ष महासंघ कामगारांच्या हातात हात घालून चालणार आहे. कामगार वयोवृद्ध होत चालले आहेत. कामगारांनी चळवळीत सामील व्हावे. दहा कलमी कार्यक्रम इतर संघटनांनी बाजूला ठेवून फक्त गिरणी कामगारांना बाहेर घालवण्याचा कार्यक्रम आखला आहे. मुंबईत घरे देऊ ही घोषणा हवेत विरली आहे. गिरणी कामगारांकडे वारसा प्रमाणपत्र मागून त्रास दिला जातोय. लॉटरीत घरे लागलेल्या बेकार झालेल्या कामगारांना कर्ज कोण देणार हा प्रश्न आहे. संघटनांच्या नादानपणाने कामगार आत्महत्या करत आहेत. संघटनांनी कामगारांच्या भावनांचा बाजार मांडला आहे. कामगारांनी काळाची पावले ओळखून जागे व्हा. सरचिटणीस आनंद मोरे म्हणाले की, इतर संघटनांनी भूलथापा मारून कामगारांना सतवले. त्यामुळे वारसा महासंघाची स्थापना करावी लागली. लॉटरीत ६९२५ जरांना घरे लागली. उर्वरितांनाही घरे मिळावीत यासाठी आम्ही न्यायालयात जाणार होतो. परंतु आम्हाला दाबण्यात आले. कल्याणकारी महासंघाने गिरणी मालक व सरकारशी संघटनांच्या नेत्यांनी संधान बांधले. सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख दिलीप पेडणेकर यांनी केले. ते म्हणाले की, कुठल्या तरी संघटनेच्या मागे धावू नका. (प्रतिनिधी)