शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

पावसासह वन्यप्राण्यांचा धुडगूस

By admin | Updated: October 21, 2015 21:52 IST

भात कापणीचा हंगाम : कडावल-हिर्लोक परिसरातील शेतकरी चिंतेत

सुरेश बागवे -कडावल व हिर्लोक परिसरात खरीप भात कापणीस सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी संकटात सापडले असून, अंतिम टप्प्यात आलेली शेती कशी वाचवायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हिर्लोक येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगार्इंनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका यंदा शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासूनच बसत आहे. तरवा लावणीच्यावेळी गरज असताना पाऊस गायब झाला. आता भातकापणीवेळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच वन्य प्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. पावसाचे अरिष्ट आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत कडावल परिसरातील शेतकरी सापडला आहे. परिसरात हळव्या जातीचे काही वाण गणेशोत्सव कालावधीतच कापणीयोग्य झाले होते. मात्र, गणेशोत्सव व त्यानंतर म्हाळवसाच्या धामधुमीमुळे शेतकऱ्यांना भातकापणीचा मुहूर्त करता आला नाही. आता काही प्रमाणात भातकापणीस सुरूवात झाली असली, तरी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पावसामुळे भातकापणीत वारंवार अडथळा येत आहे. याचा परिणाम भात उत्पादन व वैरण उत्पादनावर होणार आहे. भातलावणीनंतर कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गवे व वनगार्इंनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आणि आता भात कापणी हंगामातही हा उच्छाद सुरूच आहे. येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगाईनी उद्ध्वस्त केली असून, दत्ताराम बागवे, सीताराम सावंत, एकनाथ बागवे, प्रदीप साटम, सुवर्णा साटम तसेच इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराणशेतीवर पावसाचे संकट कायम असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. कडावल परिसरातील कडावल, आवळेगाव, पांग्रड, निरूखे आदी तर हिर्लोक पंचक्रोशीमधील किनळोस, हिर्लोक, कुसगाव, गिरगाव, नारूर, रांगणातुळसुली व निवजे आदी गावांमध्ये गवे व वनगार्इंचा उपद्रव वाढला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे तरवा लावणीपासून हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत वन्य प्राण्यांचा उपद्रव येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलायंदा निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासून बसत आहे. गरज असतेवेळी पाऊस गायब झाला. आता भातकापणीच्या हंगामात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यातच वन्यप्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, शेती वाचवायची कशी, या विवंचनेत सापडले आहेत.