शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

राणेंना रेडीपोर्टचा पुळका कशासाठी : काळसेकर

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

चौपदरीकरणाचा आराखडा २०११ मध्ये मंजूर होऊनही एकही काम राणे करू शकले नाहीत. इंदापूर-पळस्पे या टप्प्यासाठी राज्यशासन निधी देऊ शकले नाही. मात्र,

कणकवली : गेल्या सहा वर्षांत एक पैशाचा विकास न करणाऱ्या आणि कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या जॉन अर्नेस्ट कंपनीचा माजी पालकमंत्री नारायण राणे यांना पुळका येण्यामागे कारण काय? पोर्ट व्यवहारातील मलिदा कोणी खाल्ला आहे? असे प्रश्न उपस्थित करीत राणेंचे आरोप निराधार असून, सत्तेपासून दूर गेल्याने त्यांची तगमग बाहेर पडली आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. विकासाचे प्रकल्प बंद होत असल्याचे सांगून राणे यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीका केल्यासंदर्भात काळसेकर बोलत होते. रेडी बंदर जॉन अर्नेस्ट कंपनीला नारायण राणे यांनी शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून दिले. गेल्या सहा वर्षांत बंदरातून कोट्यवधींचे खनिज निर्यात झाले आणि कोट्यवधींच्या शुल्काला सरकार मुकले. राणे कुटुंबीयांकडूनच मडुरा की मळगाव असा रेल्वेस्थानकांचा वाद घातला गेला. भाजप सरकारने प्रकल्प लवकर सुरू करण्यावर भर देत कामाला सुरुवात केली. विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाचे श्रेय भाजप शासनाचेच आहे, असे काळसेकर म्हणाले.‘फोर सी’ प्रकारातील चिपी विमानतळाच्या ३४५० मीटर धावपट्टीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. दहाही इमारती पूर्ण झाल्या असून, पार्किंग सुविधेचे काम वेगाने होत आहे. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व २७२ हेक्टर जमीन वर्ग करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी पेन्सिलने नोंद केलेल्या जागेचा विचार करू नये. या विमानतळावर ४० टनांची बोर्इंग विमाने उतरू शकतात. चौपदरीकरणाचा आराखडा २०११ मध्ये मंजूर होऊनही एकही काम राणे करू शकले नाहीत. इंदापूर-पळस्पे या टप्प्यासाठी राज्यशासन निधी देऊ शकले नाही. मात्र, भाजप शासन सत्तेवर येताच सहा महिन्यांच्या आत पुलांची कामे सुरू झाली. भूसंपादनाची जमीन मोजणी ८० टक्के सुरू झाली आहे. सी-वर्ल्ड प्रकल्पाचे खरे नुकसान तडिपारीची भाषा करून राणेंनी केले. राणेंच्या वक्तव्यानंतर ग्रामस्थ प्रकल्पाच्या विरोधात गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जास्तीची जमीन परत करण्याची ग्वाही दिल्यानंतर प्रकल्पाचे वाटोळे होताना वाचले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात ३८ वर्षे रखडलेल्या तिलारी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटू शकले नव्हते. गोवा भाजप सरकारने ३८ कोटी रुपये वर्ग केले. महाराष्ट्राचे १२ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावावर भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी सही केली असून, १२०० लाभार्थ्यांसाठी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. राणे हा निधी आणू शकले नाहीत, असे काळसेकर यांनी सांगितले. यावेळी राजू राऊळ, राजश्री धुमाळे, प्रभाकर सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)