शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जनतेने परिवर्तन घडविले ते यासाठीच का? : सुभाष नाईक

By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत.

आरोंदा : गेल्या तीन वर्षांपासून आरोंद्यातील सर्वपक्षीय ९० टक्के जनता जेटीविरोधात लढा देत आहे. विनाशकारी प्रकल्पांना जनता साथ कशी देईल? भावी पिढीच्या भवितव्याचा काहीच विचार न करणारी तसेच केवळ संपत्तीची हाव असणाऱ्या फक्त १० टक्के जनतेने जेटीला समर्थन दिले, म्हणून काय विनाशकारी प्रकल्पांना साथ द्यायची? जनतेने सरकार परिवर्तन घडविले, ते यासाठीच का, असे सवाल भारतीय जनता पार्टी आरोंदा अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदस्य सुभाष नाईक यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना लेखी पत्राद्वारे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमधून आरोंदा जेटीसंदर्भात समर्थनाची प्रतिक्रिया दिल्यानंतर सुभाष नाईक यांनी हे पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, खरं पाहिलं गेलं, तर आपल्या भारत देशात तसेच भारतातील सर्व राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदवायची असेल, तर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत. तसेच आरोंद्यातील जनतेला धमकीसारखे शब्द वापरु नये. सिंधुदुर्गातील जुने निष्ठावंत भाजपचे पदाधिकारी आबा नाईक, विजय मराठे, अतुल काळसेकर, शाम काणेकर, यशवंत आठलेकर तसेच मंदार कल्याणकर, दादू कविटकर या पदाधिकाऱ्यांनी कधीही जनतेला भडकाविण्यासारखे वक्त व्य केले नाही. जठार यांच्याकडे सुध्दा शांतवृत्ती, तेजस्वी बुद्धिमत्ता व सोज्वळ विचारसरणी आहे. मग आपण आज नवीनच प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्याविषयी एवढी आत्मियता का? आणि ते सुद्धा खरी वस्तुस्थिती न पाहता. आम्ही तीस-पस्तीस वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. ते आपल्याला नकोसे झाले आहेत का? आरोंदा जेटीबाबत राजकीय खेळी खेळण्यापेक्षा सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरोंद्याच्या जतनेच्या हिताच्या दृष्टीकोनातून पावले उचलावीत. सध्या आरोंदा जेटी हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे जनतेच्या बाजूने न्यायालयात पाठपुरावा करावा, जेटीऐवजी पर्यटन दृष्टीकोनातून प्रकल्प आणावेत व आरोंदा गाव शांतताप्रिय बनवावा, अशी विनंतीही सुभाष नाईक यांनी प्रमोद जठार यांना पत्रातून के ली आहे. (प्रतिनिधी)