शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

जनतेने परिवर्तन घडविले ते यासाठीच का? : सुभाष नाईक

By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत.

आरोंदा : गेल्या तीन वर्षांपासून आरोंद्यातील सर्वपक्षीय ९० टक्के जनता जेटीविरोधात लढा देत आहे. विनाशकारी प्रकल्पांना जनता साथ कशी देईल? भावी पिढीच्या भवितव्याचा काहीच विचार न करणारी तसेच केवळ संपत्तीची हाव असणाऱ्या फक्त १० टक्के जनतेने जेटीला समर्थन दिले, म्हणून काय विनाशकारी प्रकल्पांना साथ द्यायची? जनतेने सरकार परिवर्तन घडविले, ते यासाठीच का, असे सवाल भारतीय जनता पार्टी आरोंदा अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदस्य सुभाष नाईक यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना लेखी पत्राद्वारे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमधून आरोंदा जेटीसंदर्भात समर्थनाची प्रतिक्रिया दिल्यानंतर सुभाष नाईक यांनी हे पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, खरं पाहिलं गेलं, तर आपल्या भारत देशात तसेच भारतातील सर्व राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदवायची असेल, तर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत. तसेच आरोंद्यातील जनतेला धमकीसारखे शब्द वापरु नये. सिंधुदुर्गातील जुने निष्ठावंत भाजपचे पदाधिकारी आबा नाईक, विजय मराठे, अतुल काळसेकर, शाम काणेकर, यशवंत आठलेकर तसेच मंदार कल्याणकर, दादू कविटकर या पदाधिकाऱ्यांनी कधीही जनतेला भडकाविण्यासारखे वक्त व्य केले नाही. जठार यांच्याकडे सुध्दा शांतवृत्ती, तेजस्वी बुद्धिमत्ता व सोज्वळ विचारसरणी आहे. मग आपण आज नवीनच प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्याविषयी एवढी आत्मियता का? आणि ते सुद्धा खरी वस्तुस्थिती न पाहता. आम्ही तीस-पस्तीस वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. ते आपल्याला नकोसे झाले आहेत का? आरोंदा जेटीबाबत राजकीय खेळी खेळण्यापेक्षा सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरोंद्याच्या जतनेच्या हिताच्या दृष्टीकोनातून पावले उचलावीत. सध्या आरोंदा जेटी हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे जनतेच्या बाजूने न्यायालयात पाठपुरावा करावा, जेटीऐवजी पर्यटन दृष्टीकोनातून प्रकल्प आणावेत व आरोंदा गाव शांतताप्रिय बनवावा, अशी विनंतीही सुभाष नाईक यांनी प्रमोद जठार यांना पत्रातून के ली आहे. (प्रतिनिधी)