शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जनतेने परिवर्तन घडविले ते यासाठीच का? : सुभाष नाईक

By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत.

आरोंदा : गेल्या तीन वर्षांपासून आरोंद्यातील सर्वपक्षीय ९० टक्के जनता जेटीविरोधात लढा देत आहे. विनाशकारी प्रकल्पांना जनता साथ कशी देईल? भावी पिढीच्या भवितव्याचा काहीच विचार न करणारी तसेच केवळ संपत्तीची हाव असणाऱ्या फक्त १० टक्के जनतेने जेटीला समर्थन दिले, म्हणून काय विनाशकारी प्रकल्पांना साथ द्यायची? जनतेने सरकार परिवर्तन घडविले, ते यासाठीच का, असे सवाल भारतीय जनता पार्टी आरोंदा अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदस्य सुभाष नाईक यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना लेखी पत्राद्वारे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमधून आरोंदा जेटीसंदर्भात समर्थनाची प्रतिक्रिया दिल्यानंतर सुभाष नाईक यांनी हे पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, खरं पाहिलं गेलं, तर आपल्या भारत देशात तसेच भारतातील सर्व राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदवायची असेल, तर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आणले पाहिजेत. तसेच आरोंद्यातील जनतेला धमकीसारखे शब्द वापरु नये. सिंधुदुर्गातील जुने निष्ठावंत भाजपचे पदाधिकारी आबा नाईक, विजय मराठे, अतुल काळसेकर, शाम काणेकर, यशवंत आठलेकर तसेच मंदार कल्याणकर, दादू कविटकर या पदाधिकाऱ्यांनी कधीही जनतेला भडकाविण्यासारखे वक्त व्य केले नाही. जठार यांच्याकडे सुध्दा शांतवृत्ती, तेजस्वी बुद्धिमत्ता व सोज्वळ विचारसरणी आहे. मग आपण आज नवीनच प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्याविषयी एवढी आत्मियता का? आणि ते सुद्धा खरी वस्तुस्थिती न पाहता. आम्ही तीस-पस्तीस वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. ते आपल्याला नकोसे झाले आहेत का? आरोंदा जेटीबाबत राजकीय खेळी खेळण्यापेक्षा सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरोंद्याच्या जतनेच्या हिताच्या दृष्टीकोनातून पावले उचलावीत. सध्या आरोंदा जेटी हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे जनतेच्या बाजूने न्यायालयात पाठपुरावा करावा, जेटीऐवजी पर्यटन दृष्टीकोनातून प्रकल्प आणावेत व आरोंदा गाव शांतताप्रिय बनवावा, अशी विनंतीही सुभाष नाईक यांनी प्रमोद जठार यांना पत्रातून के ली आहे. (प्रतिनिधी)