शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

...तर लंका अयोध्येच्या राज्यात असती

By admin | Updated: February 8, 2016 23:47 IST

चारूदत्त आफळे : चिपळूण येथील कीर्तनमालेला अखेरच्या दिवशी गर्दी

चिपळूण : बळीराजाने साम्राज्य वाढवण्याच्या ईर्ष्येने इतर देशातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. दुसऱ्याला त्रास देऊन साम्राज्य वाढवणे ही आसुरी प्रवृत्ती. इंग्रज, ख्रिश्चन, मुसलमान यांनीही साम्राज्य वाढीसाठीच प्रयत्न केले. पण हिंदूनी तसे कधीच केले नाही. जो दैवी गुणांनी युक्त असतो, तो असे वर्तन कधीच करत नाही. अन्यथा रावणाच्या वधानंतर प्रभू रामचंद्राने लंकेचे राज्य अयोध्येच्या राज्यात जोडले असते, असे प्रतिपादन चारुदत्त आफळे यांनी कीर्तन महोत्सवात केले. अण्णासाहेब खेडेकर संकुलामध्ये श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी वामनावतार व परशुरामावतार या विषयावर आफळेबुवा बोलत होते. प्रल्हादाचा नातू, विरांचनाचा मुलगा असलेला बळी हा असूर कुळात जन्मलेला. नृसिंहावतारात प्रल्हादाला भगवंतानी वर दिला होता की, तुझ्या कुळात कोणालाही मारणार नाही. त्यामुळे भगवंत वामनावतार घेऊन बळीच्या द्वारी गेले. त्यावेळी बळीराजाकडे यज्ञ चालला होता. भगवंतानी बळीकडे तीन पावले जमीन मागितली. वास्तविक वामनरुपातील भगवंताला बळीने ओळखले होते. दान देण्याचा शब्द दिला होता. याला कुलगुरु शुक्राचार्यांचा विरोध होता. पण तरीही बळीने दान दिले. बळीच्या भक्तीला प्रसन्न झालेल्या भगवंताने बळीला पाताळात सुतण लोकांत पाठवले व पुढील मन्वंतरात इंद्र करण्याचे आश्वासन दिले. आसुरी गुण कमी होऊन दैवी गुणांची वाढ होईपर्यंत सुतण लोकी ठेवले. परशुरामावतार हे आजच्या कीर्तनाचे प्रमुख आकर्षण होते. कारण अगदी अलिकडे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परशुरामाविषयी निर्माण झालेले वाद सर्वश्रुत होते. ज्याने ही भूमी निर्माण केली, असे ते म्हणाले. परशुराम हा क्षत्रियांचा वैरी असा समज पसरवला जातो. पण सहस्त्रार्जुनाने जर जमदग्नींची कामधेनू पळवली नसती तर? सहस्त्रार्जुनाने जमदग्नींचा वध केला म्हणून परशुरामाने त्याचा व त्याला पाठिंबा देणाऱ्या २१ क्षत्रिय कुळांचा विनाश केला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)