शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

...तर लंका अयोध्येच्या राज्यात असती

By admin | Updated: February 8, 2016 23:47 IST

चारूदत्त आफळे : चिपळूण येथील कीर्तनमालेला अखेरच्या दिवशी गर्दी

चिपळूण : बळीराजाने साम्राज्य वाढवण्याच्या ईर्ष्येने इतर देशातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. दुसऱ्याला त्रास देऊन साम्राज्य वाढवणे ही आसुरी प्रवृत्ती. इंग्रज, ख्रिश्चन, मुसलमान यांनीही साम्राज्य वाढीसाठीच प्रयत्न केले. पण हिंदूनी तसे कधीच केले नाही. जो दैवी गुणांनी युक्त असतो, तो असे वर्तन कधीच करत नाही. अन्यथा रावणाच्या वधानंतर प्रभू रामचंद्राने लंकेचे राज्य अयोध्येच्या राज्यात जोडले असते, असे प्रतिपादन चारुदत्त आफळे यांनी कीर्तन महोत्सवात केले. अण्णासाहेब खेडेकर संकुलामध्ये श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी वामनावतार व परशुरामावतार या विषयावर आफळेबुवा बोलत होते. प्रल्हादाचा नातू, विरांचनाचा मुलगा असलेला बळी हा असूर कुळात जन्मलेला. नृसिंहावतारात प्रल्हादाला भगवंतानी वर दिला होता की, तुझ्या कुळात कोणालाही मारणार नाही. त्यामुळे भगवंत वामनावतार घेऊन बळीच्या द्वारी गेले. त्यावेळी बळीराजाकडे यज्ञ चालला होता. भगवंतानी बळीकडे तीन पावले जमीन मागितली. वास्तविक वामनरुपातील भगवंताला बळीने ओळखले होते. दान देण्याचा शब्द दिला होता. याला कुलगुरु शुक्राचार्यांचा विरोध होता. पण तरीही बळीने दान दिले. बळीच्या भक्तीला प्रसन्न झालेल्या भगवंताने बळीला पाताळात सुतण लोकांत पाठवले व पुढील मन्वंतरात इंद्र करण्याचे आश्वासन दिले. आसुरी गुण कमी होऊन दैवी गुणांची वाढ होईपर्यंत सुतण लोकी ठेवले. परशुरामावतार हे आजच्या कीर्तनाचे प्रमुख आकर्षण होते. कारण अगदी अलिकडे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परशुरामाविषयी निर्माण झालेले वाद सर्वश्रुत होते. ज्याने ही भूमी निर्माण केली, असे ते म्हणाले. परशुराम हा क्षत्रियांचा वैरी असा समज पसरवला जातो. पण सहस्त्रार्जुनाने जर जमदग्नींची कामधेनू पळवली नसती तर? सहस्त्रार्जुनाने जमदग्नींचा वध केला म्हणून परशुरामाने त्याचा व त्याला पाठिंबा देणाऱ्या २१ क्षत्रिय कुळांचा विनाश केला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)