शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

...तर लंका अयोध्येच्या राज्यात असती

By admin | Updated: February 8, 2016 23:47 IST

चारूदत्त आफळे : चिपळूण येथील कीर्तनमालेला अखेरच्या दिवशी गर्दी

चिपळूण : बळीराजाने साम्राज्य वाढवण्याच्या ईर्ष्येने इतर देशातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. दुसऱ्याला त्रास देऊन साम्राज्य वाढवणे ही आसुरी प्रवृत्ती. इंग्रज, ख्रिश्चन, मुसलमान यांनीही साम्राज्य वाढीसाठीच प्रयत्न केले. पण हिंदूनी तसे कधीच केले नाही. जो दैवी गुणांनी युक्त असतो, तो असे वर्तन कधीच करत नाही. अन्यथा रावणाच्या वधानंतर प्रभू रामचंद्राने लंकेचे राज्य अयोध्येच्या राज्यात जोडले असते, असे प्रतिपादन चारुदत्त आफळे यांनी कीर्तन महोत्सवात केले. अण्णासाहेब खेडेकर संकुलामध्ये श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी वामनावतार व परशुरामावतार या विषयावर आफळेबुवा बोलत होते. प्रल्हादाचा नातू, विरांचनाचा मुलगा असलेला बळी हा असूर कुळात जन्मलेला. नृसिंहावतारात प्रल्हादाला भगवंतानी वर दिला होता की, तुझ्या कुळात कोणालाही मारणार नाही. त्यामुळे भगवंत वामनावतार घेऊन बळीच्या द्वारी गेले. त्यावेळी बळीराजाकडे यज्ञ चालला होता. भगवंतानी बळीकडे तीन पावले जमीन मागितली. वास्तविक वामनरुपातील भगवंताला बळीने ओळखले होते. दान देण्याचा शब्द दिला होता. याला कुलगुरु शुक्राचार्यांचा विरोध होता. पण तरीही बळीने दान दिले. बळीच्या भक्तीला प्रसन्न झालेल्या भगवंताने बळीला पाताळात सुतण लोकांत पाठवले व पुढील मन्वंतरात इंद्र करण्याचे आश्वासन दिले. आसुरी गुण कमी होऊन दैवी गुणांची वाढ होईपर्यंत सुतण लोकी ठेवले. परशुरामावतार हे आजच्या कीर्तनाचे प्रमुख आकर्षण होते. कारण अगदी अलिकडे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परशुरामाविषयी निर्माण झालेले वाद सर्वश्रुत होते. ज्याने ही भूमी निर्माण केली, असे ते म्हणाले. परशुराम हा क्षत्रियांचा वैरी असा समज पसरवला जातो. पण सहस्त्रार्जुनाने जर जमदग्नींची कामधेनू पळवली नसती तर? सहस्त्रार्जुनाने जमदग्नींचा वध केला म्हणून परशुरामाने त्याचा व त्याला पाठिंबा देणाऱ्या २१ क्षत्रिय कुळांचा विनाश केला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)