शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ पाच कोटी गेले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 23:46 IST

युवक काँग्रेसचा सवाल : गाळ उपसण्यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांचा निधी

कणकवली : गाळ उपशासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मागील वर्षी मंजूर झाला होता. मात्र, वर्षभरानंतरही या निधीतील कामे झाल्याचे दिसत नाहीत. या निधीतील कामे येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात यावीत, अन्यथा लघुपाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा युवक कॉँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. युवक कॉँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप मेस्त्री आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार समीर घारे यांची बुधवारी यासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले.तालुक्यातील जानवली, कलमठ, वरवडे या गावात दरवर्षी पावसामध्ये पूरस्थिति असते. याची दखल घेत तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे यांनी उपरोक्त गावातील नदीमध्ये असलेला गाळ उपशासाठी ५ कोटी निधी मंजूर केला होता. सन २०१५ मध्ये फक्त १५ दिवस काम करून पावसाळ्यानंतर उर्वरित काम करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, पावसाळा संपून ५ महिने लोटले तरी गाळ उपशाचे काम सुरु झालेले नाही. जानवली, कलमठ गावातील कलेश्वर नगर, महाजनी नगर, टेंबवाडी, वरवडे फणसनगर येथील २०० पेक्षा जास्त घरे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली असतात आणि लाखोंचे नुकसान होते. मात्र लघुपाटबंधारे कार्यालयामध्ये संपर्क केला असता सबंधित अधिकारी रत्नागिरी येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून तहसीलदार समीर घारे यांची युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष संदिप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. संबंधित अधिकाऱ्यांची आपण एकत्रित बैठक घेऊ, असे आश्वासन तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी समीर घारे यांनी दिले. यावेळी संदिप मेस्त्री, सुनील साळसकर, मंगेश सावंत, कमलेश नरे, महेश आंबेरकर, गौरव यादव, चानी जाधव, अपु देसाई, अविराज मराठे, आशीष सावंत, अभी लाड, भाई कदम, चेतन गवाणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारागाळ उपशाचे काम सुरू करताना तीन गावातील सरपंचांना कळवले होते का? गेल्या वर्षी झालेल्या कामाचे मूल्यांकन किती? काढलेला गाळ लिलाव पद्धतीने देणे बंधनकारक असताना लिलाव का झाला नाही? असे प्रश्न यावेळी उपस्थित केले. गाळ उपशाचे काम ८ दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि लघुपाटबंधारेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.