शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

कुठे नेऊन ठेवलाय गणवेश यांचा...

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रिक्षा वाहतूक करणाऱ्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार ६८६ रिक्षाचालकांना परवाना देण्यात आला आहे. रिक्षा चालकांसाठी गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परमीटमालकाला पांढरा, तर चालकाला खाकी रंगाचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. तत्कालिन वाहतूक अधीक्षक राजीव मुठाणे यांनी गणवेश सक्तीचा केला होता. त्यानुसार सर्व रिक्षा चालक - मालक गणवेशातच वाहतूक करताना दिसून येत होते. मुठाणे यांची बदली झाल्यानंतरही काही महिने रिक्षाचालक गणवेशात वाहतूक करीत होते. परंतु सध्या एकही रिक्षाचालक गणवेशात दिसून येत नाही.वाहतूक पोलीस सर्वत्र कार्यरत असताना, त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. गर्दीच्या वेळी शहराबरोबर शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावरही त्यांची तपासणी सुरू असते. असे असताना त्यांच्या पुढ्यातून रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यांना गणवेश न वापरणारे रिक्षा चालक दिसत नाहीत का? असा सवाल निर्माण होत आहे.चालकांसाठी गणवेशाबाबत नियम बनविला जात असेल तर तो शिथिल का केला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात. परंतु रत्नागिरीत नियमाचे काही दिवसच पालन केले जाते, तद्नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ प्रमाणे सुरू आहे.काही रिक्षाचालकांकडे चर्चा केली असता गणवेश सध्या कोणीच वापरत नसल्याचे कबूल केले. वाहतूक पोलीसदेखील सक्ती करीत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी रिक्षाचालक गणवेश परिधान करीत होते. रत्नागिरी शहरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असतात. दिवसाला रिक्षा व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न कमी आहे. पेट्रोल, बँक हप्ता, देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता रिक्षा चालकांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. खाकी गणवेश ठीक आहे. परंतु पांढरा गणवेश कच्च्या रस्त्यामुळे खराब होतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा गणवेश रद्द करून केवळ खाकी गणवेश करण्यात यावा. (प्रतिनिधी)