शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुठे नेऊन ठेवलाय गणवेश यांचा...

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रिक्षा वाहतूक करणाऱ्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार ६८६ रिक्षाचालकांना परवाना देण्यात आला आहे. रिक्षा चालकांसाठी गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परमीटमालकाला पांढरा, तर चालकाला खाकी रंगाचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. तत्कालिन वाहतूक अधीक्षक राजीव मुठाणे यांनी गणवेश सक्तीचा केला होता. त्यानुसार सर्व रिक्षा चालक - मालक गणवेशातच वाहतूक करताना दिसून येत होते. मुठाणे यांची बदली झाल्यानंतरही काही महिने रिक्षाचालक गणवेशात वाहतूक करीत होते. परंतु सध्या एकही रिक्षाचालक गणवेशात दिसून येत नाही.वाहतूक पोलीस सर्वत्र कार्यरत असताना, त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. गर्दीच्या वेळी शहराबरोबर शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावरही त्यांची तपासणी सुरू असते. असे असताना त्यांच्या पुढ्यातून रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यांना गणवेश न वापरणारे रिक्षा चालक दिसत नाहीत का? असा सवाल निर्माण होत आहे.चालकांसाठी गणवेशाबाबत नियम बनविला जात असेल तर तो शिथिल का केला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात. परंतु रत्नागिरीत नियमाचे काही दिवसच पालन केले जाते, तद्नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ प्रमाणे सुरू आहे.काही रिक्षाचालकांकडे चर्चा केली असता गणवेश सध्या कोणीच वापरत नसल्याचे कबूल केले. वाहतूक पोलीसदेखील सक्ती करीत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी रिक्षाचालक गणवेश परिधान करीत होते. रत्नागिरी शहरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असतात. दिवसाला रिक्षा व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न कमी आहे. पेट्रोल, बँक हप्ता, देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता रिक्षा चालकांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. खाकी गणवेश ठीक आहे. परंतु पांढरा गणवेश कच्च्या रस्त्यामुळे खराब होतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा गणवेश रद्द करून केवळ खाकी गणवेश करण्यात यावा. (प्रतिनिधी)