शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कुठे नेऊन ठेवलाय गणवेश यांचा...

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रिक्षा वाहतूक करणाऱ्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार ६८६ रिक्षाचालकांना परवाना देण्यात आला आहे. रिक्षा चालकांसाठी गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परमीटमालकाला पांढरा, तर चालकाला खाकी रंगाचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. तत्कालिन वाहतूक अधीक्षक राजीव मुठाणे यांनी गणवेश सक्तीचा केला होता. त्यानुसार सर्व रिक्षा चालक - मालक गणवेशातच वाहतूक करताना दिसून येत होते. मुठाणे यांची बदली झाल्यानंतरही काही महिने रिक्षाचालक गणवेशात वाहतूक करीत होते. परंतु सध्या एकही रिक्षाचालक गणवेशात दिसून येत नाही.वाहतूक पोलीस सर्वत्र कार्यरत असताना, त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. गर्दीच्या वेळी शहराबरोबर शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावरही त्यांची तपासणी सुरू असते. असे असताना त्यांच्या पुढ्यातून रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यांना गणवेश न वापरणारे रिक्षा चालक दिसत नाहीत का? असा सवाल निर्माण होत आहे.चालकांसाठी गणवेशाबाबत नियम बनविला जात असेल तर तो शिथिल का केला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात. परंतु रत्नागिरीत नियमाचे काही दिवसच पालन केले जाते, तद्नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ प्रमाणे सुरू आहे.काही रिक्षाचालकांकडे चर्चा केली असता गणवेश सध्या कोणीच वापरत नसल्याचे कबूल केले. वाहतूक पोलीसदेखील सक्ती करीत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी रिक्षाचालक गणवेश परिधान करीत होते. रत्नागिरी शहरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असतात. दिवसाला रिक्षा व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न कमी आहे. पेट्रोल, बँक हप्ता, देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता रिक्षा चालकांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. खाकी गणवेश ठीक आहे. परंतु पांढरा गणवेश कच्च्या रस्त्यामुळे खराब होतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा गणवेश रद्द करून केवळ खाकी गणवेश करण्यात यावा. (प्रतिनिधी)