शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

नोटा ठेवायच्या कोठे, रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बँकांना पडला प्रश्न ?

By admin | Updated: November 12, 2016 21:37 IST

पाचशे आणि एक हजार रूपयांच्या सध्याच्या नोटा आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिस-या दिवशीही कायम होती.

ऑनलाइन लोकमत 
रत्नागिरी, दि. १२ - पाचशे आणि एक हजार रूपयांच्या सध्याच्या नोटा आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिस-या दिवशीही कायम होती. तीन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँकांमध्ये पाचशे आणि एक हजार रूपयाच्या जवळपास एक हजार कोटी नोटा जमा झाल्या आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत पाठवल्या जाणार असल्या तरी तोपर्यंत त्या ठेवायच्या कोठे, असा प्रश्न बँकांसमोर उभा राहिला आहे. 
पाचशे आणि एक हजार रूपयाच्या सध्याच्या नोटा मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून चलनातून बाद झाल्या. बुधवारी बँका बंद होत्या. गुरूवारी सकाळपासून राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांसमोरील रांगा सुरू झाल्या. ही गर्दी होणार, हे लक्षात घेऊनच एरवी तीन किंवा साडेतीन वाजता बंद होणारा देवघेव व्यवहार सायंकाळी साडेपाच, सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला. मात्र सलग तिसºया दिवशीही बँकांमधील गर्दी कायम होती. 
आजवर बँकांमध्ये होणारी गर्दी ही बºयाचदा पैसे काढण्यासाठीच झाली आहे. यावेळी मात्र बँकेतून पैसे काढणाºयांपेक्षा किंवा पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्याºयांपेक्षा बँकेत पैसे ठेवणाºयांची संख्या चौपट आहे. या नोटा आपल्या खात्यात जमा करण्याचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे बँकांकडील अशा नोटांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मिळून तीन दिवसात पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटांचे अंदाजे एक हजार कोटी रूपये बँकांकडे जमा झाले आहेत. 
आजच्या घडीला या नोटांचे बाजारमूल्य शून्य झाले आहे. मात्र जोपर्यंत या नोटा रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात दिल्या जात नाहीत, तोपर्यंत ती महत्त्वपूर्ण मालमत्ता आहे. त्यामुळे त्या स्ट्राँगरूममध्येच ठेवणे अनिवार्य आहे. लोकांना वितरित करण्यासाठी, एटीएममध्ये भरण्यासाठी म्हणून १00 रूपयांच्या तसेच ५0, २0 आणि १0 रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध झाल्या आहेत. काही प्रमाणात दोन हजार रूपयांच्या नोटाही जिल्ह्यात आल्या आहेत. नव्याने येणाºया किंवा चलनात असलेल्या नोटांंचा ‘स्टॉक’ ठेवण्यासाठी बँकांना जागेची गरज असताना चलनातून बाद झालेल्या नोटांची सातत्याने भर पडत आहे. 
या नोटा रिझर्व्ह बँकेकडून परत नेल्या जाणार आहेत. मात्र देशभरात नव्या नोटांचे तसेच चलनातील इतर नोटांचे वितरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे काम वाढलेले असल्याने जुन्या नोटा परत जाण्याला अजून कालावधी लागू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र तोपर्यंत आधीच मर्यादीत असलेल्या जागांमध्ये या नोटा ठेवायच्या कशा, सांभाळायच्या कशा असा प्रश्न बँकांसमोर उभा राहिला आहे. 
 
पैसे काढण्यापेक्षा पैसे खात्यात भरणाºयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खूप मोठी रक्कम बँकांकडे जमा होत आहे. सर्वच बँकांमधील अधिकारी, कर्मचारी उशिरापर्यंत थांबून खातेदारांना अधिकाधिक सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनपर्यंत मर्यादीत नव्या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र चलनात असलेल्या इतर नोटा खातेदारांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या बँकेची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६पैकी ७0 एटीएम सेंटर्स सुरू झाली आहेत. ती तशीच सुरू ठेवण्यावर आमचा भर असेल. 
- सतीश भाटीया सहाय्यक महाव्यवस्थापक भारतीय स्टेट बँक, रत्नागिरी