शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

कुठे नेऊन ठेवलीय स्वच्छ रत्नागिरी?

By admin | Updated: February 12, 2015 00:33 IST

रत्नागिरी पालिका : मारुती मंदिर परिसराचीच झाली कचराकुंडी, अस्वच्छतेमुळे दुकानदारही हैराण

रत्नागिरी : ८ फेबु्रवारीपासून सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी दरररोज हजारो उमेदवारांचे तांडे शहरात येत आहेत. आयोजकांकडून कोणतेच नियोजन नसल्याने रत्नागिरी शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा, पेपर्स, अपुऱ्या स्वच्छतागृहामुळे जागोजागी केलेली घाण यामुळे मारुती मंदिर परिसराची कचराकुंडी झाली आहे. सैनिक विभाग, जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन न झाल्याने ‘कुठे नेऊन ठेवलीय स्वच्छ रत्नागिरी’, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. आलेल्या व्यक्तिंचा पाहुणचार करणे ही कोकणवासीयांची परंपरा आहे. त्याला अनुसरून रत्नागिरीकर ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी रत्नागिरीत येणाऱ्या उमेदवार तरुणांना संपूर्ण सहकार्य देत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीसाठी तरुण येणार याची कल्पना आयोजकांना असूनही त्यांच्याकडून येणाऱ्या तरुणांच्या निवासाची, त्यांच्या भोजन-पाण्याची, त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणात स्वच्छतागृहांची सोयच करण्यात आली नाही. त्यामुळे मारुती मंदिर परिसरात कचऱ्याचे, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरदिवशी ५ ते १० हजार या प्रमाणात रत्नागिरीत उमेदवार येत असून, दोन दिवसांनंतर होणाऱ्या भरतीसाठीही आधीच तरुण रत्नागिरीत येत आहेत. त्यामुळे दिवसाला १० ते १५ हजार तरुणांना रत्नागिरीतील सुविधांमध्ये सामावणे कठीण बनले आहे. येणाऱ्या तरुणांची निवासाची सोयही नसल्याने त्यांना भर रस्त्यावर, उद्यानांमध्ये वर्तमानपत्रांच्या कागदावर झोपण्याची वेळ आली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी सैनिक भरती कार्यक्रम होता. त्यामुळे मंगळवारी दुपारपासूनच भरती इच्छुक तरुण रत्नागिरीत दाखल झाले होते. अनेकजण सुमो, जीप वा अन्य खासगी गाड्यांमधून रत्नागिरीत आले होते. त्यांची वाहने कुठे पार्क करावीत, ही समस्याही त्यांच्यापुढे होती. त्यामुुळे मारुती मंदिर परिसर, सावरकर नाट्यगृहाचे आवार, उद्यमनगर, आरोग्य मंदिर, शिवाजीनगर यांसारख्या परिसरात त्यांच्या गाड्या जागा मिळेल तिथे पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)रत्नागिरीत उमेदवारांचे आदरातिथ्यभरतीसाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या तरुणांचे पाहुणचाराच्या परंपरेला साजेसे स्वागत रत्नागिरीकरांकडून करण्यात आले आहे. सांगलीतील पलूस येथील पंचशील अकॅडमीतर्फे शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूला असलेल्या हिंदू कॉलनी परिसरात भरतीसाठी आलेल्या हजारो तरुणांना मोफत जेवण व चहा-नाश्ता दिला जात आहे. त्यामुळे हॉटेल्सवर खाद्यपदार्थ अधिक बनविण्याबाबत आलेला अतिरिक्त ताण आता कमी झाला आहे. तसेच रोजगारासाठी आलेल्या या तरुणांची भोजनाचीही चांगली सोय झाली आहे.भाट्ये येथे समुुद्र स्नान सुविधा!सैन्यभरतीसाठी आलेल्या तरुणांना निवासाची व्यवस्था अपुरी आहेच, शिवाय प्रसाधनगृहांची कमतरता आहे. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे. हजारो तरुणांनी आंघोळ तरी करायची कुठे, अशी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर कोणीतरी उतारा दिला तो भाट्ये येथे समुद्रात स्नान करण्याचा. हा उतारा तरुणांनाही भावला असून, गेल्या दोन दिवसांपासून भाट्ये समुद्रावर भरतीसाठी आलेल्या या तरुणांची फौजच समुद्रस्नानाचा आनंद घेताना दिसून येत आहे. मात्र, या समुद्र स्नानाच्यावेळी या तरुणांना काय संरक्षण दिले गेले आहे? भाट्ये येथे पर्यटक बुडाल्याच्या घटना ताज्या असतानाच भरतीसाठी आलेल्या तरुणांची काळजी घेणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून मोफत खिचडीशिवसेनेतर्फे नगरसेवक राहुल पंडित यांनी भरतीसाठी आलेल्या तरुणांना कागदपत्रे सत्यप्रत करून देण्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सोमवारी व मंगळवारी रात्री प्रयत्न केला होता. त्याचे कौतुक झाले होते. त्यानंतर आजपासून (बुधवार) भाजपाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे मारुती मंदिर येथील सर्कलमध्ये मोफत खिचडीची सोय करण्यात आली होती. आज २ हजार विद्यार्थ्यांनी मोफत खिचडीचा लाभ घेतला. १८ फेब्रुुवारीपर्यंत भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना दररोज दुपारी १२ ते २ वाजता या वेळेत मोफत खिचडी देण्यात येणार आहे. या खिचडी वाटपामध्ये नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष संजय पुनसकर तसेच अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. भरतीनंतर स्वच्छता मोहीम ?मारुती मंदिर व रत्नागिरी परिसरात या भरतीसाठी आलेल्या तरुणांंमुळे सर्वत्र कागद, कचरा, फळांच्या साली यांमुळे कचराच कचरा झाला आहे. भरतीनंतर शहराच्या स्वच्छतेची पुन्हा एकदा मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. रत्नागिरीकर एवढी चांगली वागणूक देत असताना भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून मात्र स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. एकाच ठिकाणी कचरा टाकला गेल्यास शहराची स्वच्छता राहील, हे या तरुणांना सांगण्याची वेळ आली आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रत्नागिरीत झालेल्या भरतीप्रक्रियेला कोल्हापुरातून तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक तरुण उपस्थित होते. त्यातील अपात्र तरूणांनी दुपारनंतर परतीचा मार्ग धरला.वृत्तपत्रांचे झाले अंथरुणभरतीला आलेल्या तरुणांना रात्री झोपण्यासाठी अंथरुणे नसल्याने अनेकांनी वृत्तपत्रे जमिनीवर अंथरून झोप काढणे पसंत केले आहे. मात्र, जमिनीवर पसरलेले हे कागद न उचलता तेथेच टाकून जात असल्याने जागोजागी कचरा झाला आहे. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडली आहे. एस्. टी. कॉलनीचे आवार तसेच तेथील फूटपाथवर असंख्य पेपर तसेच पडले होते.कुंपणांतही अस्वच्छता...हिंदू कॉलनीत काहींच्या कुंपणात वास्तव्य केलेल्या भरतीस आलेल्या तरुणांनी घाण करून ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, हे तरुण त्या जागांवरून हटण्यासही तयार नसल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी पालिका, सैन्यभरती आयोजक यांनी या तरुणांची योग्य व्यवस्था करावी व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.