शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

विद्यार्थ्यांना बसविणार कोठे ?

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

शासनाकडून निराशा : नाटळ राजवाडी शाळेचे छप्पर नादुरूस्त

कनेडी : पूर्ण प्राथमिक शाळा नाटळ राजवाडीचे छप्पर नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी कोठे बसविणार, ही समस्या शिक्षक व पालकांना भेडसावत आहे. शासन दरबारी वारंवार दाद मागूनही शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे. पालक आपली मुले शाळेत न पाठविण्याच्या पवित्र्यात आहेत.राजवाडी प्राथमिक शाळा ही केंद्रशाळा असून इतर शाळांच्या सभा तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव याच शाळेत भरविले जातात. सध्या ही शाळा सात खोल्यांची असून पूर्णपणे मोडकळीस आली आहे. गेली दोन वर्षे वारंवार छप्पर दुरूस्तीबाबत शाळा समितीच्या तसेच शिक्षकांकडून शासनास प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. परंतु त्या प्रस्तावांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. एकही प्रस्ताव विचारात घेण्यात आला नसल्याचे शाळा समिती अध्यक्ष रमेश सावंत यांनी सांगितले.या शाळेचा लाभ सहा ते सात वाड्यांना होत आहे. बहुजन समाजवस्तीतील विद्यार्थ्यांना या शाळेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. शाळेत बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. शाळेच्या पडझडीमुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळेत एक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व एक उपशिक्षक अशी पदे भरण्यात आली असून २० च्या पटीत विद्यार्थी संख्या आहे. पूर्वी ही शाळा सातवीपर्यंत होती. परंतु कालांतराने विद्यार्थी संख्या घटत गेली. शासनाने विद्यार्थी पटसंख्येअभावी ही शाळा चौथीपर्यंत करण्याचे आदेश दिले. सात वर्गखोल्यांची शाळा एकदाही दुरूस्त करण्यात आली नाही. परिणामी शाळेची दूरवस्था झाली. दुरूस्तीबाबत शाळा समितीने वारंवार प्रस्ताव पाठविले. परंतु एकाही प्रस्तावाचा विचार शासनाने व लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोक्याचेसध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी सर्व खोल्यांमधून येऊन शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य खराब होत आहे. विद्यार्थ्यांना बसण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पालक, विद्यार्थी व शिक्षक द्विधा अवस्थेत आहेत. पालकांना पाल्यांचा शैक्षणिक नुकसानीबाबत भीती वाटत आहे. शाळेच्या छपराचे वासे, रिप वाळवी लागून खराब झाले आहेत. बहुतांश कौले खाली पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोकादायक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरू होण्यास काही थोडेच दिवस असताना शाळा दुरूस्तीबाबत शासन गप्प बसले आहे. शाळेची डागडुजी केव्हा करणार? की एखादा अपघात झाल्यावर शासनाला जाग येणार? शाळेची डागडुजी शाळा सुरू होण्याअगोदर करावी, अन्यथा एकही मूल शाळेत पाठविणार नाही.- रमेश सावंत शाळा समिती अध्यक्ष