शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना बसविणार कोठे ?

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

शासनाकडून निराशा : नाटळ राजवाडी शाळेचे छप्पर नादुरूस्त

कनेडी : पूर्ण प्राथमिक शाळा नाटळ राजवाडीचे छप्पर नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी कोठे बसविणार, ही समस्या शिक्षक व पालकांना भेडसावत आहे. शासन दरबारी वारंवार दाद मागूनही शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे. पालक आपली मुले शाळेत न पाठविण्याच्या पवित्र्यात आहेत.राजवाडी प्राथमिक शाळा ही केंद्रशाळा असून इतर शाळांच्या सभा तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव याच शाळेत भरविले जातात. सध्या ही शाळा सात खोल्यांची असून पूर्णपणे मोडकळीस आली आहे. गेली दोन वर्षे वारंवार छप्पर दुरूस्तीबाबत शाळा समितीच्या तसेच शिक्षकांकडून शासनास प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. परंतु त्या प्रस्तावांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. एकही प्रस्ताव विचारात घेण्यात आला नसल्याचे शाळा समिती अध्यक्ष रमेश सावंत यांनी सांगितले.या शाळेचा लाभ सहा ते सात वाड्यांना होत आहे. बहुजन समाजवस्तीतील विद्यार्थ्यांना या शाळेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. शाळेत बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. शाळेच्या पडझडीमुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळेत एक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व एक उपशिक्षक अशी पदे भरण्यात आली असून २० च्या पटीत विद्यार्थी संख्या आहे. पूर्वी ही शाळा सातवीपर्यंत होती. परंतु कालांतराने विद्यार्थी संख्या घटत गेली. शासनाने विद्यार्थी पटसंख्येअभावी ही शाळा चौथीपर्यंत करण्याचे आदेश दिले. सात वर्गखोल्यांची शाळा एकदाही दुरूस्त करण्यात आली नाही. परिणामी शाळेची दूरवस्था झाली. दुरूस्तीबाबत शाळा समितीने वारंवार प्रस्ताव पाठविले. परंतु एकाही प्रस्तावाचा विचार शासनाने व लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोक्याचेसध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी सर्व खोल्यांमधून येऊन शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य खराब होत आहे. विद्यार्थ्यांना बसण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पालक, विद्यार्थी व शिक्षक द्विधा अवस्थेत आहेत. पालकांना पाल्यांचा शैक्षणिक नुकसानीबाबत भीती वाटत आहे. शाळेच्या छपराचे वासे, रिप वाळवी लागून खराब झाले आहेत. बहुतांश कौले खाली पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोकादायक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरू होण्यास काही थोडेच दिवस असताना शाळा दुरूस्तीबाबत शासन गप्प बसले आहे. शाळेची डागडुजी केव्हा करणार? की एखादा अपघात झाल्यावर शासनाला जाग येणार? शाळेची डागडुजी शाळा सुरू होण्याअगोदर करावी, अन्यथा एकही मूल शाळेत पाठविणार नाही.- रमेश सावंत शाळा समिती अध्यक्ष