शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

विद्यार्थ्यांना बसविणार कोठे ?

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

शासनाकडून निराशा : नाटळ राजवाडी शाळेचे छप्पर नादुरूस्त

कनेडी : पूर्ण प्राथमिक शाळा नाटळ राजवाडीचे छप्पर नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी कोठे बसविणार, ही समस्या शिक्षक व पालकांना भेडसावत आहे. शासन दरबारी वारंवार दाद मागूनही शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे. पालक आपली मुले शाळेत न पाठविण्याच्या पवित्र्यात आहेत.राजवाडी प्राथमिक शाळा ही केंद्रशाळा असून इतर शाळांच्या सभा तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव याच शाळेत भरविले जातात. सध्या ही शाळा सात खोल्यांची असून पूर्णपणे मोडकळीस आली आहे. गेली दोन वर्षे वारंवार छप्पर दुरूस्तीबाबत शाळा समितीच्या तसेच शिक्षकांकडून शासनास प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. परंतु त्या प्रस्तावांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. एकही प्रस्ताव विचारात घेण्यात आला नसल्याचे शाळा समिती अध्यक्ष रमेश सावंत यांनी सांगितले.या शाळेचा लाभ सहा ते सात वाड्यांना होत आहे. बहुजन समाजवस्तीतील विद्यार्थ्यांना या शाळेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. शाळेत बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. शाळेच्या पडझडीमुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळेत एक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व एक उपशिक्षक अशी पदे भरण्यात आली असून २० च्या पटीत विद्यार्थी संख्या आहे. पूर्वी ही शाळा सातवीपर्यंत होती. परंतु कालांतराने विद्यार्थी संख्या घटत गेली. शासनाने विद्यार्थी पटसंख्येअभावी ही शाळा चौथीपर्यंत करण्याचे आदेश दिले. सात वर्गखोल्यांची शाळा एकदाही दुरूस्त करण्यात आली नाही. परिणामी शाळेची दूरवस्था झाली. दुरूस्तीबाबत शाळा समितीने वारंवार प्रस्ताव पाठविले. परंतु एकाही प्रस्तावाचा विचार शासनाने व लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोक्याचेसध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी सर्व खोल्यांमधून येऊन शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य खराब होत आहे. विद्यार्थ्यांना बसण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पालक, विद्यार्थी व शिक्षक द्विधा अवस्थेत आहेत. पालकांना पाल्यांचा शैक्षणिक नुकसानीबाबत भीती वाटत आहे. शाळेच्या छपराचे वासे, रिप वाळवी लागून खराब झाले आहेत. बहुतांश कौले खाली पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोकादायक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरू होण्यास काही थोडेच दिवस असताना शाळा दुरूस्तीबाबत शासन गप्प बसले आहे. शाळेची डागडुजी केव्हा करणार? की एखादा अपघात झाल्यावर शासनाला जाग येणार? शाळेची डागडुजी शाळा सुरू होण्याअगोदर करावी, अन्यथा एकही मूल शाळेत पाठविणार नाही.- रमेश सावंत शाळा समिती अध्यक्ष