शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

क्वॉरी बंद कधी करणार ?

By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST

विलवडेतील ग्रामस्थांचा आरोप : मालक व नेता, प्रशासनाचे सलोख्याचे संबंध

ओटवणे : तहसीलदार, तलाठी यांनी विलवडे येथील क्रशर क्वॉरीला बंद करण्याचे आदेश देऊनही बंद का केली जात नाही? असा प्रश्न ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून विलवडे येथे पाझर तलाव परिसरात अनधिकृत क्रशर क्वॉरी बिनदिक्कतपणे चालू आहे. या क्वॉरीला ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होत आहे. क्वॉरीमुळे पाझर तलावात माती जाऊन तलावात पाणीसाठा कमी होत चालला आहे. याचबरोबर वरचीवाडी येथील घरांनाही तडे गेले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी तलाठी प्रशांत पास्ते यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. त्यांनी तत्काळ पंचनामा करून क्वॉरी बंद करण्याचे आदेश दिले. पण या क्वॉरीमध्ये बड्या राजकीय व्यक्तींचा हिस्सा असल्याकारणाने ही क्वॉरी चालूच राहिली. यानंतरही काही महिन्यापूर्वी या क्वॉरीला तहसीलदारांकडून सील ठोकण्यात आले होते. तसेच या क्वॉरीजवळ मिळालेला ५० किलो अमोनियासह जेसीबी आणि हत्यारे जप्त करण्यात आली होती, पण राजकीय हस्तक्षेप व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीमुळे या वस्तू परत करण्यात आल्या. विशेष म्हणजे याचा दंडदेखील भरून घेण्यात आला नाही. जिल्ह्यादत काही गांवामध्ये उत्खनास बंदी असतानाही, तसेच ग्रामस्थांचा प्रचंड विरोध असतानाही अशा क्वॉरीना कशी काय परवानगी दिली जाते? अशा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त असून प्रशासनाविरुद्ध लोकायुक्त कार्यालयात तक्रार देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. (वार्ताहर)क्वॉरीमुळे घरांची पडझडगेली दोन वर्ष येथील सामान्य माणसांचा हा लढा सुरू असून क्वॉरीमुळे ग्रामस्थांच्या घरांची पडझड होत आहे. असेच हे सत्र चालू राहिल्यास ऐनवेळी आम्ही कायदा हातात घेऊ, अशी धमकी ग्रामस्थांनी दिली आहे. ओटवणे-विलवडेचे तलाठी प्रशांत पास्ते यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला असून आता तरी शासन अंतिम निर्णय घेतील, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.