शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

पश्चिम घाट दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा

By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST

मधुकर बाचुळकर : कणकवली येथे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

कणकवली : जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात १२० नद्यांचे उगम झाले आहे. या नद्यांवर २ हजार ४८ धरणे असून, हायड्रोइलेक्ट्रीक प्रोजेक्ट उभारण्यात आले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उद्योगधंद्यांना उपयोग होत आहे. तसेच १२०० औषधी, तर ४५०० सपुष्प वनस्पती या भागात आहेत. पश्चिम घाट हा दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. हा परिसर वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींबरोबरच जनतेने आता संघटित होणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानफुलांच्या माहितीसह वामन पंडित यांनी काढलेल्या छायाचित्रांचे ‘रानफूल आणि पतंग’ या विषयावरील प्रदर्शन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. बाचुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कार्यशाळेत ‘पश्चिम घाटातील जैवविविधता’ या विषयावर ते बोलत होते.यावेळी डॉ. बाळकृष्ण गावडे, सचिन देसाई, विजय सावंत, अशोक करंबेळकर, डॉ. अनिल फराकटे, सुरेश कुऱ्हाडे, वामन पंडित आदी उपस्थित होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, पश्चिम घाटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व आहे. पृथ्वीवर समप्रमाणात जैवविविधता पसरलेली नाही. त्यामुळे तिचे जतन करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. कोकणातील जमिनीच्या खाली सोने आहे. त्यामुळे दूरदृष्टीने त्याचा विचार करून येथील जनतेने आपल्या जमिनी विकू नयेत.निसर्गाचा समतोल टिकवायचा असेल तर जंगलमय भाग ३३ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, भारतात तो ९ ते १० टक्केच आहे. मादागास्कर देशात १२ हजार सपुष्प वनस्पती असून, यापैकी ८ हजार वनस्पती फक्त त्याच देशात आहेत. जगात इतरत्र या वनस्पती कुठेही आढळून येत नाहीत. भारतात साडेसतरा हजार सपुष्प वनस्पती आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. नष्ट झालेली वनस्पतीची प्रजात पुन्हा तयार करता येत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गुजरातच्या पायथ्यापासून केरळपर्यंतचा भाग पश्चिम घाटात येतो. १६०० किलोमीटर लांबीचा हा प्रदेश असून सर्वसामान्य जनता जोपर्यंत शासनाला या पश्चिम घाटाचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत शासन ऐकणार नाही. राजकारण्यांच्या मागे असणारी जनता पर्यावरणतज्ज्ञांच्या मागे नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण होणे आवश्यक आहे. देशाच्या एकूण भूभागापैकी फक्त ५ टक्के एवढा भूभाग पश्चिम घाटाने व्यापलेला आहे. हा भाग वगळून शासनाने हवे तर कोठेही उद्योगधंदे उभारावेत. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. पश्चिम घाटांतर्गत महाराष्ट्रात येणाऱ्या भागात लवकर वाढ होणाऱ्या झाडांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र, त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे निलगिरीसारख्या झाडांची लागवड आपण करीत असतो. या लागवडीमुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत.रस्त्याच्या बाजूला तसेच बागेत अनेक विदेशी झाडे लावलेली आढळतात. त्यांचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे आपल्या भागातील झाडांची लागवड अशा ठिकाणी झाल्यास त्यापासून उत्पन्नही मिळू शकेल. अनेक औषधी वनस्पती पश्चिम घाटात असून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ पद्धतीने जनतेमध्ये पश्चिम घाटाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी संघटीतपणे प्रयत्न करावेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखावा, असे आवाहनही त्यांनी केले.दुसऱ्या सत्रात ‘वनस्पतीपासून नैसर्गिक रंगनिर्मिती’ या विषयावर डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शन मंगळवारपर्यंत सुरु राहणार आहे. (वार्ताहर)बायोडायव्हर्सिटी बोर्ड आवश्यकबायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचे रक्षण होण्यासाठी किमान जिल्हा पातळीवर तरी बायोडायव्हर्सिटी बोर्ड स्थापन होणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपल्या भागातील औषधी गुणधर्म असलेल्या तसेच बहुउपयोगी वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करता येईल. तसेच काहीजणांकडून होणारी लुबाडणूकही थांबेल, असे यावेळी डॉ. बाचुळकर यांनी सांगितले.