शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम घाट दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा

By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST

मधुकर बाचुळकर : कणकवली येथे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

कणकवली : जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात १२० नद्यांचे उगम झाले आहे. या नद्यांवर २ हजार ४८ धरणे असून, हायड्रोइलेक्ट्रीक प्रोजेक्ट उभारण्यात आले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उद्योगधंद्यांना उपयोग होत आहे. तसेच १२०० औषधी, तर ४५०० सपुष्प वनस्पती या भागात आहेत. पश्चिम घाट हा दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. हा परिसर वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींबरोबरच जनतेने आता संघटित होणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानफुलांच्या माहितीसह वामन पंडित यांनी काढलेल्या छायाचित्रांचे ‘रानफूल आणि पतंग’ या विषयावरील प्रदर्शन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. बाचुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कार्यशाळेत ‘पश्चिम घाटातील जैवविविधता’ या विषयावर ते बोलत होते.यावेळी डॉ. बाळकृष्ण गावडे, सचिन देसाई, विजय सावंत, अशोक करंबेळकर, डॉ. अनिल फराकटे, सुरेश कुऱ्हाडे, वामन पंडित आदी उपस्थित होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, पश्चिम घाटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व आहे. पृथ्वीवर समप्रमाणात जैवविविधता पसरलेली नाही. त्यामुळे तिचे जतन करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. कोकणातील जमिनीच्या खाली सोने आहे. त्यामुळे दूरदृष्टीने त्याचा विचार करून येथील जनतेने आपल्या जमिनी विकू नयेत.निसर्गाचा समतोल टिकवायचा असेल तर जंगलमय भाग ३३ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, भारतात तो ९ ते १० टक्केच आहे. मादागास्कर देशात १२ हजार सपुष्प वनस्पती असून, यापैकी ८ हजार वनस्पती फक्त त्याच देशात आहेत. जगात इतरत्र या वनस्पती कुठेही आढळून येत नाहीत. भारतात साडेसतरा हजार सपुष्प वनस्पती आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. नष्ट झालेली वनस्पतीची प्रजात पुन्हा तयार करता येत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गुजरातच्या पायथ्यापासून केरळपर्यंतचा भाग पश्चिम घाटात येतो. १६०० किलोमीटर लांबीचा हा प्रदेश असून सर्वसामान्य जनता जोपर्यंत शासनाला या पश्चिम घाटाचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत शासन ऐकणार नाही. राजकारण्यांच्या मागे असणारी जनता पर्यावरणतज्ज्ञांच्या मागे नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण होणे आवश्यक आहे. देशाच्या एकूण भूभागापैकी फक्त ५ टक्के एवढा भूभाग पश्चिम घाटाने व्यापलेला आहे. हा भाग वगळून शासनाने हवे तर कोठेही उद्योगधंदे उभारावेत. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. पश्चिम घाटांतर्गत महाराष्ट्रात येणाऱ्या भागात लवकर वाढ होणाऱ्या झाडांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र, त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे निलगिरीसारख्या झाडांची लागवड आपण करीत असतो. या लागवडीमुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत.रस्त्याच्या बाजूला तसेच बागेत अनेक विदेशी झाडे लावलेली आढळतात. त्यांचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे आपल्या भागातील झाडांची लागवड अशा ठिकाणी झाल्यास त्यापासून उत्पन्नही मिळू शकेल. अनेक औषधी वनस्पती पश्चिम घाटात असून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ पद्धतीने जनतेमध्ये पश्चिम घाटाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी संघटीतपणे प्रयत्न करावेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखावा, असे आवाहनही त्यांनी केले.दुसऱ्या सत्रात ‘वनस्पतीपासून नैसर्गिक रंगनिर्मिती’ या विषयावर डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शन मंगळवारपर्यंत सुरु राहणार आहे. (वार्ताहर)बायोडायव्हर्सिटी बोर्ड आवश्यकबायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचे रक्षण होण्यासाठी किमान जिल्हा पातळीवर तरी बायोडायव्हर्सिटी बोर्ड स्थापन होणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपल्या भागातील औषधी गुणधर्म असलेल्या तसेच बहुउपयोगी वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करता येईल. तसेच काहीजणांकडून होणारी लुबाडणूकही थांबेल, असे यावेळी डॉ. बाचुळकर यांनी सांगितले.