शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पश्चिम घाट दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा

By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST

मधुकर बाचुळकर : कणकवली येथे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

कणकवली : जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात १२० नद्यांचे उगम झाले आहे. या नद्यांवर २ हजार ४८ धरणे असून, हायड्रोइलेक्ट्रीक प्रोजेक्ट उभारण्यात आले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उद्योगधंद्यांना उपयोग होत आहे. तसेच १२०० औषधी, तर ४५०० सपुष्प वनस्पती या भागात आहेत. पश्चिम घाट हा दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. हा परिसर वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींबरोबरच जनतेने आता संघटित होणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानफुलांच्या माहितीसह वामन पंडित यांनी काढलेल्या छायाचित्रांचे ‘रानफूल आणि पतंग’ या विषयावरील प्रदर्शन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. बाचुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कार्यशाळेत ‘पश्चिम घाटातील जैवविविधता’ या विषयावर ते बोलत होते.यावेळी डॉ. बाळकृष्ण गावडे, सचिन देसाई, विजय सावंत, अशोक करंबेळकर, डॉ. अनिल फराकटे, सुरेश कुऱ्हाडे, वामन पंडित आदी उपस्थित होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, पश्चिम घाटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व आहे. पृथ्वीवर समप्रमाणात जैवविविधता पसरलेली नाही. त्यामुळे तिचे जतन करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. कोकणातील जमिनीच्या खाली सोने आहे. त्यामुळे दूरदृष्टीने त्याचा विचार करून येथील जनतेने आपल्या जमिनी विकू नयेत.निसर्गाचा समतोल टिकवायचा असेल तर जंगलमय भाग ३३ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, भारतात तो ९ ते १० टक्केच आहे. मादागास्कर देशात १२ हजार सपुष्प वनस्पती असून, यापैकी ८ हजार वनस्पती फक्त त्याच देशात आहेत. जगात इतरत्र या वनस्पती कुठेही आढळून येत नाहीत. भारतात साडेसतरा हजार सपुष्प वनस्पती आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. नष्ट झालेली वनस्पतीची प्रजात पुन्हा तयार करता येत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गुजरातच्या पायथ्यापासून केरळपर्यंतचा भाग पश्चिम घाटात येतो. १६०० किलोमीटर लांबीचा हा प्रदेश असून सर्वसामान्य जनता जोपर्यंत शासनाला या पश्चिम घाटाचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत शासन ऐकणार नाही. राजकारण्यांच्या मागे असणारी जनता पर्यावरणतज्ज्ञांच्या मागे नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण होणे आवश्यक आहे. देशाच्या एकूण भूभागापैकी फक्त ५ टक्के एवढा भूभाग पश्चिम घाटाने व्यापलेला आहे. हा भाग वगळून शासनाने हवे तर कोठेही उद्योगधंदे उभारावेत. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. पश्चिम घाटांतर्गत महाराष्ट्रात येणाऱ्या भागात लवकर वाढ होणाऱ्या झाडांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र, त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे निलगिरीसारख्या झाडांची लागवड आपण करीत असतो. या लागवडीमुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत.रस्त्याच्या बाजूला तसेच बागेत अनेक विदेशी झाडे लावलेली आढळतात. त्यांचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे आपल्या भागातील झाडांची लागवड अशा ठिकाणी झाल्यास त्यापासून उत्पन्नही मिळू शकेल. अनेक औषधी वनस्पती पश्चिम घाटात असून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ पद्धतीने जनतेमध्ये पश्चिम घाटाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी संघटीतपणे प्रयत्न करावेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखावा, असे आवाहनही त्यांनी केले.दुसऱ्या सत्रात ‘वनस्पतीपासून नैसर्गिक रंगनिर्मिती’ या विषयावर डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शन मंगळवारपर्यंत सुरु राहणार आहे. (वार्ताहर)बायोडायव्हर्सिटी बोर्ड आवश्यकबायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचे रक्षण होण्यासाठी किमान जिल्हा पातळीवर तरी बायोडायव्हर्सिटी बोर्ड स्थापन होणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपल्या भागातील औषधी गुणधर्म असलेल्या तसेच बहुउपयोगी वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करता येईल. तसेच काहीजणांकडून होणारी लुबाडणूकही थांबेल, असे यावेळी डॉ. बाचुळकर यांनी सांगितले.