शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

जनतेकडून खूप काही शिकलो

By admin | Updated: June 27, 2015 00:21 IST

ई. रविंद्रन : पत्रकार संघातर्फे सत्कार समारंभ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात येऊन खूप काही शिकता आले. निसर्गाबरोबरच माणसांचाही लळा लागला. सिंधुदुर्ग सोडून जाताना एक वेगळा अनुभव व अनुभूती घेऊन जात आहे, असे भावनिक उद्गार सिंधुदुर्गचे मावळते जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी काढले.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची नवी मुंबई येथे राजीव गांधी जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. मुख्यालयातील सर्व पत्रकार यांच्या भेटीस गेले होते तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांचा मुख्यालय पत्रकारांच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आपले मनोगत त्यांनी मांडले. ते म्हणाले, सिंधुदुर्गात तीन वर्षांचा कालावधी कसा गेला हे समजले नाही. एक वर्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद व दोन वर्षे जिल्हाधिकारी पद भूषविताना येथील जनतेच्या विविध समस्या जवळून आकलन करता आल्या. जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे भूसंपादन पूर्ण केले. माझ्या कार्यकालात झालेल्या निवडणुका शांततेत पार पडल्या व जवळजवळ १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनातर्फे मोठ्या दिमाखात पर्यटन महोत्सवही साजरा करता आला. सिंधुदुर्गात काम करताना येथील निसर्गाचा जनतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. येथील माणसेही निसर्गासारखीच शुद्ध व निर्मळ आहेत. कायद्याच्या चौकटीत बसून काम करण्याकडे इथल्या जनतेचा कल असतो. त्यामुळे काम करताना कुणी वेगळ्या कामाची भीड घातलेली आठवतच नाही. कधीही अडचणीचे प्रसंग आले तरी येथील कर्मचारी, अधिकारी यांनी सर्वतोपरी मदतीचा हात नेहमीच पुढे केला.नोकरीचा कालावधी ३० ते ३५ वर्षांचा धरला तर सिंधुदुर्गात काढलेली तीन वर्षे आपण कधीच विसरू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, शासनाने दिलेली सर्व कामे नियोजनानुसार पार पडली. मात्र, सिंधुदुर्गसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण करता आले नाही, ही खंत आहे.सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणात बऱ्याच सुधारणा करता आल्या. त्यातील काही प्रस्तावित आहेत. भविष्यात त्या पूर्ण होतील व सिंधुदुर्गनगरी मुख्यालयाचे ठिकाण वेगळ्या दिमाखात वाटचाल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिक, आपले सहकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)