शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जनतेकडून खूप काही शिकलो

By admin | Updated: June 27, 2015 00:21 IST

ई. रविंद्रन : पत्रकार संघातर्फे सत्कार समारंभ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात येऊन खूप काही शिकता आले. निसर्गाबरोबरच माणसांचाही लळा लागला. सिंधुदुर्ग सोडून जाताना एक वेगळा अनुभव व अनुभूती घेऊन जात आहे, असे भावनिक उद्गार सिंधुदुर्गचे मावळते जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी काढले.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची नवी मुंबई येथे राजीव गांधी जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. मुख्यालयातील सर्व पत्रकार यांच्या भेटीस गेले होते तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांचा मुख्यालय पत्रकारांच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आपले मनोगत त्यांनी मांडले. ते म्हणाले, सिंधुदुर्गात तीन वर्षांचा कालावधी कसा गेला हे समजले नाही. एक वर्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद व दोन वर्षे जिल्हाधिकारी पद भूषविताना येथील जनतेच्या विविध समस्या जवळून आकलन करता आल्या. जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे भूसंपादन पूर्ण केले. माझ्या कार्यकालात झालेल्या निवडणुका शांततेत पार पडल्या व जवळजवळ १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनातर्फे मोठ्या दिमाखात पर्यटन महोत्सवही साजरा करता आला. सिंधुदुर्गात काम करताना येथील निसर्गाचा जनतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. येथील माणसेही निसर्गासारखीच शुद्ध व निर्मळ आहेत. कायद्याच्या चौकटीत बसून काम करण्याकडे इथल्या जनतेचा कल असतो. त्यामुळे काम करताना कुणी वेगळ्या कामाची भीड घातलेली आठवतच नाही. कधीही अडचणीचे प्रसंग आले तरी येथील कर्मचारी, अधिकारी यांनी सर्वतोपरी मदतीचा हात नेहमीच पुढे केला.नोकरीचा कालावधी ३० ते ३५ वर्षांचा धरला तर सिंधुदुर्गात काढलेली तीन वर्षे आपण कधीच विसरू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, शासनाने दिलेली सर्व कामे नियोजनानुसार पार पडली. मात्र, सिंधुदुर्गसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण करता आले नाही, ही खंत आहे.सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणात बऱ्याच सुधारणा करता आल्या. त्यातील काही प्रस्तावित आहेत. भविष्यात त्या पूर्ण होतील व सिंधुदुर्गनगरी मुख्यालयाचे ठिकाण वेगळ्या दिमाखात वाटचाल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिक, आपले सहकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)