शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

आम्ही आणलेला निधी कॉँग्रेस हडप करते

By admin | Updated: July 10, 2016 23:55 IST

विनायक राऊत : कोलगाव येथे शिवबंधन मेळावा

सावंतवाडी : राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणला जातो. मात्र, हा निधी काँग्रेच्या ताब्यात जिल्हा परिषद असल्याने तेच हडप करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केले. कोलगाव येथे शिवबंधन पंधरावड्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रकाश परब, एकनाथ नारोजी, कोलगाव सरपंच रश्मी काजरेकर, मायकल डिसोझा, कोलगाव उपसरपंच फ्रान्सिस डिसोझा, बाळू माळकर, देवेंद्र टेमकर, शब्बीर मणियार, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, राज्यशासनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला आहे. ग्रामविकास विभागाचे मंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडे असल्याने सर्व विकासकामे केली. मात्र याचे श्रेय काँग्रेसची मंडळी घेऊ पाहत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. ही जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे खेचून आणली पाहिजे. तरच पुढील काळात विकास निधी आपल्या माध्यमातून खर्च होणार आहे. अन्यथा आम्ही आणलेला निधी काँग्रेस हडप करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. पालकमंत्री केसरकर म्हणाले, रस्त्यावरच्या नेत्याने वा पदाधिकाऱ्याने टीका केली तर त्याला उत्तर देणे मी माझी बांधिलकी समजत नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला पक्षासाठी काम कर, असे कधीही सांगितले नाही. तरीही त्यांनी दिलेले पद हे सामान्य जनतेसाठी वापरून विकास करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकास प्रक्रियेत कुठेही मागे राहता नये, याची खबरदारी घेत आहे, असे सांगत सुखी व समृध्द सिंधुदुर्ग मला घडवायचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला विजय हा नक्की आहे. एकाला पराभूत केले, आता आपल्याला बाकीच्यांना पराभूत करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे मतही आमदार नाईक यांनी माडले. जान्हवी सावंत यांनी शिवसेना औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे इशारे देणाऱ्या राज्यकर्त्यांना आजचा मेळावा ही चपराक आहे. शिवसेना हा जनतेच्या मनात रू जलेला पक्ष आहे. जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, याचा विश्वास असल्यानेच जनता शिवसेनेसोबत आहे. आई जिल्हा परिषद सदस्या, मुलगा पंचायत समिती सदस्य अशा प्रकारे ज्या राणेंनी घराणेशाहीचा आरोप करत शिवसेना सोडली. त्यांच्याच पक्षात घराणेशाही असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. यावेळी कोलगाव सरपंच रश्मी काजरेकर, फ्रान्सिस डिसोझा आदींनी आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)