शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

आम्ही आणलेला निधी कॉँग्रेस हडप करते

By admin | Updated: July 10, 2016 23:55 IST

विनायक राऊत : कोलगाव येथे शिवबंधन मेळावा

सावंतवाडी : राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणला जातो. मात्र, हा निधी काँग्रेच्या ताब्यात जिल्हा परिषद असल्याने तेच हडप करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केले. कोलगाव येथे शिवबंधन पंधरावड्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रकाश परब, एकनाथ नारोजी, कोलगाव सरपंच रश्मी काजरेकर, मायकल डिसोझा, कोलगाव उपसरपंच फ्रान्सिस डिसोझा, बाळू माळकर, देवेंद्र टेमकर, शब्बीर मणियार, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, राज्यशासनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला आहे. ग्रामविकास विभागाचे मंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडे असल्याने सर्व विकासकामे केली. मात्र याचे श्रेय काँग्रेसची मंडळी घेऊ पाहत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. ही जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे खेचून आणली पाहिजे. तरच पुढील काळात विकास निधी आपल्या माध्यमातून खर्च होणार आहे. अन्यथा आम्ही आणलेला निधी काँग्रेस हडप करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. पालकमंत्री केसरकर म्हणाले, रस्त्यावरच्या नेत्याने वा पदाधिकाऱ्याने टीका केली तर त्याला उत्तर देणे मी माझी बांधिलकी समजत नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला पक्षासाठी काम कर, असे कधीही सांगितले नाही. तरीही त्यांनी दिलेले पद हे सामान्य जनतेसाठी वापरून विकास करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकास प्रक्रियेत कुठेही मागे राहता नये, याची खबरदारी घेत आहे, असे सांगत सुखी व समृध्द सिंधुदुर्ग मला घडवायचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला विजय हा नक्की आहे. एकाला पराभूत केले, आता आपल्याला बाकीच्यांना पराभूत करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे मतही आमदार नाईक यांनी माडले. जान्हवी सावंत यांनी शिवसेना औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे इशारे देणाऱ्या राज्यकर्त्यांना आजचा मेळावा ही चपराक आहे. शिवसेना हा जनतेच्या मनात रू जलेला पक्ष आहे. जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, याचा विश्वास असल्यानेच जनता शिवसेनेसोबत आहे. आई जिल्हा परिषद सदस्या, मुलगा पंचायत समिती सदस्य अशा प्रकारे ज्या राणेंनी घराणेशाहीचा आरोप करत शिवसेना सोडली. त्यांच्याच पक्षात घराणेशाही असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. यावेळी कोलगाव सरपंच रश्मी काजरेकर, फ्रान्सिस डिसोझा आदींनी आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)