शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रत्नागिरी-मडगाव रेल्वे बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 7, 2015 23:05 IST

कोकण रेल्वे : भारमान नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून गंभीर दखल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून रात्रीच्या वेळी धावणारी रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर रेल्वे भारमान नसल्याने डबघाईस आली आहे. ३१ मार्च २०१५ला सुरू करण्यात आलेली ही गाडी अवघ्या तीन महिन्यात बंद पडण्याच्या अवस्थेत आली असून, भारमान नसल्याने ही गाडी बंद करण्याचा विचार कोकण रेल्वे व्यवस्थापन गांभीर्याने करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.दादरहून रत्नागिरी येथे मध्यरात्री येणारी पॅसेंजर गाडी पुढे मडगाव - मंगलोेरपर्यंत विस्तारित करण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा विचार होता. मात्र, ही बातमी रत्नागिरीवासीयांना समजताच या प्रस्तावाला तीव्र विरोध सुरू झाला. येथील प्रवाशांबरोबरच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फेही ही गाडी पुढे नेण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे काही काळ याबाबतची फाईल बंद झाली होती. मात्र, त्यानंतर दादरवरून रात्री येणारी दादर पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत आल्यानंतर येथून ती पुढे मडगावला सोडण्यात येऊ लागली, तर मडगाव येथे असलेली दुसरी रेल्वे सायंकाळी ७ वाजता मडगाव स्थानकातून सोडली जात असून, ती रात्री १ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात येते. ही गाडी पहाटे ५.३० वाजता रत्नागिरी - दादर म्हणून सोडली जाते. दादर ते रत्नागिरीपर्यंत धावणारी ही पॅसेंजर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोक या गाडीने प्रवास करतात. रत्नागिरी स्थानकातच ही गाडी ‘फुल्ल’ असते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर या गाडीसाठी असंख्य प्रवासी प्रतीक्षेत असतात. ही पॅसेंजर गाडीही रत्नागिरीकरांसाठी पुरेशी नसल्याने रत्नागिरीहून दादरपर्यंत आणखी एक रेल्वेगाडी सुरू करावी, अशी जुनी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. तसेच चिपळूण - मुंबई रेल्वेही सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून जिल्हावासीयांतून सुरू आहे. या मागण्यांचा अद्यापही विचार झालेला नाही. मात्र, रत्नागिरीसाठी असलेली दादर पॅसेंजर गाडीही पळविण्याचा प्रयत्न झाला. तो यशस्वी झाला नाही म्हणून छुप्या पध्दतीने रात्रीच्या वेळी ही गाडी मडगावपर्यंत पुढे नेली जात आहे. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मडगावपर्यंत जाता यावे, असा उद्देश यामागे होता. या गाडीला उन्हाळी हंगामात कोकणवासीयांची गर्दी असतानाच मडगावकडे जाणारे प्रवासीही गर्दी करीत होते. आता पावसाळ्यात रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी या गाडीला भारमान नसल्याने तीन महिन्यात ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)दादर पॅसेंजर जाणार होती मंगलोरपर्यंत...दादरहून रत्नागिरीपर्यत धावणारी पॅसेंजर गाडी चक्क मंगलोरपर्यंत नेण्याचा घाट प्रथम घातला गेला होता. मात्र, वेळेचे गणित न जमल्याने अखेर मडगावपर्यंत हीच गाडी पुढे नेण्यात येत आहे. दादर - मडगाव असे या गाडीला नाव न देता रत्नागिरी - मडगाव असे नाव देण्यात आले आहे. त्यामागे रत्नागिरीकरांचा रोष नको, हे समीकरण असल्याचीही चर्चा आहे.