शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:35 IST

पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देलाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचलेसमुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत, चुकीच्या पद्धतीने बांधकाम, लाखो रुपये पाण्यात

वेंगुर्ला : पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्वर किनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेली दीड ते दोन वर्षे या वुड हाऊस प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ ८० टक्के काम हे पूर्ण झाले होते.काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यांवर उभारण्यात आलेला पाया हा ढासळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते. शनिवारी रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे रविवारी पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एका बाजूने खचले असून ते समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे.दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच उभादांडा गावचे ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आंगचेकर, ग्रामस्थ डुमिंग डिसोजा यांनी तत्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे पाठविणार आहोत असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. याबाबत धुरी यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे टिष्ट्वटरद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सखोल चौकशी करावीएमटीडीसीमार्फत पर्यटनाच्या नावाखाली पैसे कसे पाण्यात घालविले जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या अगोदर जे जे पकल्प एमटीडीसीने या सागरेश्वर किनारी राबविले आहेत ते किती यशस्वी झाले याचाही खुलासा त्यांनी करावा. शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग