शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:35 IST

पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देलाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचलेसमुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत, चुकीच्या पद्धतीने बांधकाम, लाखो रुपये पाण्यात

वेंगुर्ला : पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्वर किनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेली दीड ते दोन वर्षे या वुड हाऊस प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ ८० टक्के काम हे पूर्ण झाले होते.काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यांवर उभारण्यात आलेला पाया हा ढासळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते. शनिवारी रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे रविवारी पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एका बाजूने खचले असून ते समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे.दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच उभादांडा गावचे ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आंगचेकर, ग्रामस्थ डुमिंग डिसोजा यांनी तत्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे पाठविणार आहोत असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. याबाबत धुरी यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे टिष्ट्वटरद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सखोल चौकशी करावीएमटीडीसीमार्फत पर्यटनाच्या नावाखाली पैसे कसे पाण्यात घालविले जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या अगोदर जे जे पकल्प एमटीडीसीने या सागरेश्वर किनारी राबविले आहेत ते किती यशस्वी झाले याचाही खुलासा त्यांनी करावा. शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग