शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणलोटचे कर्मचारी अद्याप वाऱ्यावरच

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

प्रश्न जैसे थे : देवरूख तहसीलदारांना निवेदन सादर

सचिन मोहिते -- देवरुख--एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) येथे कार्यरत असणाऱ्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तालुका कृषी कार्यालयाने त्यांना सध्या वाऱ्यावरच सोडल्याने स्थानिकांमधून त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या महिन्यापासून आपली व्यथा मांडणाऱ्या त्या आठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी देवरुख तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन आपल्याला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे.एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामायिक मार्गदर्शक सूचना २००८ (सुधारित २०११) नुसार केली आहे. यानुसार हे स्थानिक आठ कर्मचारी कृषितज्ज्ञ, समूह संघटक, उपजीविकातज्ज्ञ अशा पदांवर कार्यरत होते. त्यांनी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली आहे. त्यांची नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचेही निर्देश त्या परिपत्रकात (शासन निर्णयात) असताना संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कामगारांना हेतुपुरस्सर डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हाभरात अन्य तालुक्यांतून प्रकल्प पूर्ण झालेले नसल्याने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा, मुलाखत अशी कोणतीही विनंजीअर्ज न घेता पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्यातच या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून का घेण्यात येत नाही, असा सवाल या आठजणांनी उपस्थित केला आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याने त्या आठही कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंत आपली कैफियत मांडली आहे. यावेळीच त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वेळोवेळी जाण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल तीन-चारवेळा या अधिकाऱ्यांनी अन्य ठिकाणी काम काढून त्यांना सामोरे जाण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि लोकमतच्या वृत्तामुळे त्यांची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली होती. मात्र, संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येकाचे वैयक्तिक विनंती अर्ज मागवले होते. मात्र, यावर या आठजणांनी विनंती अर्जाची गरजच काय, असा सवाल करत नियमाप्रमाणे आम्हाला पुन्हा सामावून घ्या, असे स्पष्ट केले आहे.मात्र, या साऱ्या पार्श्वभूमीवर त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अजूनही तालुका कृषी कार्यालय ठोस भूमिका घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर गुरुवारी देवरुख तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आम्हाला पुन्हा सेवेत घेत नसल्याने या अन्यायाविरोधात आपण तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ. याबाबत तहसीलदार वैशाली माने यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू, अशी खात्री दिली आहे.मनमानी : तीव्र आंदोलनाचा इशाराअनेक दिवसांपासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांबाबत आवाज उठवला, याबाबत आंदोलनेही करण्यात आली. मात्र त्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आता याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.आमदारांचे दुर्लक्षस्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंतही हा विषय नेण्यात आला. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही.