शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाणलोटचे कर्मचारी अद्याप वाऱ्यावरच

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

प्रश्न जैसे थे : देवरूख तहसीलदारांना निवेदन सादर

सचिन मोहिते -- देवरुख--एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) येथे कार्यरत असणाऱ्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तालुका कृषी कार्यालयाने त्यांना सध्या वाऱ्यावरच सोडल्याने स्थानिकांमधून त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या महिन्यापासून आपली व्यथा मांडणाऱ्या त्या आठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी देवरुख तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन आपल्याला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे.एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामायिक मार्गदर्शक सूचना २००८ (सुधारित २०११) नुसार केली आहे. यानुसार हे स्थानिक आठ कर्मचारी कृषितज्ज्ञ, समूह संघटक, उपजीविकातज्ज्ञ अशा पदांवर कार्यरत होते. त्यांनी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली आहे. त्यांची नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचेही निर्देश त्या परिपत्रकात (शासन निर्णयात) असताना संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कामगारांना हेतुपुरस्सर डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हाभरात अन्य तालुक्यांतून प्रकल्प पूर्ण झालेले नसल्याने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा, मुलाखत अशी कोणतीही विनंजीअर्ज न घेता पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्यातच या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून का घेण्यात येत नाही, असा सवाल या आठजणांनी उपस्थित केला आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याने त्या आठही कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंत आपली कैफियत मांडली आहे. यावेळीच त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वेळोवेळी जाण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल तीन-चारवेळा या अधिकाऱ्यांनी अन्य ठिकाणी काम काढून त्यांना सामोरे जाण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि लोकमतच्या वृत्तामुळे त्यांची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली होती. मात्र, संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येकाचे वैयक्तिक विनंती अर्ज मागवले होते. मात्र, यावर या आठजणांनी विनंती अर्जाची गरजच काय, असा सवाल करत नियमाप्रमाणे आम्हाला पुन्हा सामावून घ्या, असे स्पष्ट केले आहे.मात्र, या साऱ्या पार्श्वभूमीवर त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अजूनही तालुका कृषी कार्यालय ठोस भूमिका घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर गुरुवारी देवरुख तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आम्हाला पुन्हा सेवेत घेत नसल्याने या अन्यायाविरोधात आपण तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ. याबाबत तहसीलदार वैशाली माने यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू, अशी खात्री दिली आहे.मनमानी : तीव्र आंदोलनाचा इशाराअनेक दिवसांपासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांबाबत आवाज उठवला, याबाबत आंदोलनेही करण्यात आली. मात्र त्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आता याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.आमदारांचे दुर्लक्षस्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंतही हा विषय नेण्यात आला. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही.